शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

विहिरीतील गाळामुळे पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:21 IST

येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष भोवले : शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.आमगाववासीयांना मागील महिनाभरापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शहराला पाणी पुरवठा करणाºया विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मागील तीन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूूर्वीच स्थानिक प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज होती. पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा उपसा करण्याची गरज होती. मात्र याकडे दुर्लक्ष करीत वेळ मारून नेल्याने त्याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु वाढीव पाणी पुरवठा योजनेची क्षमता चार लाख लिटर आहे.मात्र शहराला सध्या केवळ २ लाख ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दररोज जवळपास दीड लाख लिटर पाणी शहरवासीयांना कमी मिळत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.गाळाचा उपसा करण्याकडे दुर्लक्षबाघ नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजनेची विहीर आता कालबाह्य झाली असून त्यातील गाळाचा स्थानिक प्रशासनाने अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पाणी टाकीची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यातच विहिरीतील गाळामुळे तीन दिवसांपासून शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रशासनाने वेळीच उपाय योजना केली असती तर शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले नसते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई