शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील गाळामुळे पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:21 IST

येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष भोवले : शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.आमगाववासीयांना मागील महिनाभरापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शहराला पाणी पुरवठा करणाºया विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मागील तीन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूूर्वीच स्थानिक प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज होती. पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा उपसा करण्याची गरज होती. मात्र याकडे दुर्लक्ष करीत वेळ मारून नेल्याने त्याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु वाढीव पाणी पुरवठा योजनेची क्षमता चार लाख लिटर आहे.मात्र शहराला सध्या केवळ २ लाख ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दररोज जवळपास दीड लाख लिटर पाणी शहरवासीयांना कमी मिळत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.गाळाचा उपसा करण्याकडे दुर्लक्षबाघ नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजनेची विहीर आता कालबाह्य झाली असून त्यातील गाळाचा स्थानिक प्रशासनाने अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पाणी टाकीची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यातच विहिरीतील गाळामुळे तीन दिवसांपासून शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रशासनाने वेळीच उपाय योजना केली असती तर शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले नसते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई