शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतील गाळामुळे पाणी पुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:21 IST

येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष भोवले : शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे.आमगाववासीयांना मागील महिनाभरापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शहराला पाणी पुरवठा करणाºया विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने मागील तीन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूूर्वीच स्थानिक प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज होती. पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा उपसा करण्याची गरज होती. मात्र याकडे दुर्लक्ष करीत वेळ मारून नेल्याने त्याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. परंतु वाढीव पाणी पुरवठा योजनेची क्षमता चार लाख लिटर आहे.मात्र शहराला सध्या केवळ २ लाख ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. दररोज जवळपास दीड लाख लिटर पाणी शहरवासीयांना कमी मिळत असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.गाळाचा उपसा करण्याकडे दुर्लक्षबाघ नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र पाणी पुरवठा योजनेची विहीर आता कालबाह्य झाली असून त्यातील गाळाचा स्थानिक प्रशासनाने अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पाणी टाकीची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यातच विहिरीतील गाळामुळे तीन दिवसांपासून शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. प्रशासनाने वेळीच उपाय योजना केली असती तर शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले नसते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई