शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

विजेच्या लपंडावाने पाणीटंचाई

By admin | Updated: April 28, 2017 02:11 IST

येथील नागरिकांना वीज वितरणच्या अवकृपेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

दुर्लक्ष : कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने उपकरणात बिघाड चिकणी(जामणी) : येथील नागरिकांना वीज वितरणच्या अवकृपेमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विजेच्या लपंडावामुळे नळयोजनेच्या मोटरपंपात बिघाड येऊन चार दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हात नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. येथे विजेचा दाब कमीअधिक होत असतो. त्यात वारंवार वीज खंडित होऊन पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेच्या पंप जळाला. त्यामुळे पाण्याची टाकी भरली नसून चार दिवसांपासून नळाला पाणी नव्हते. ग्रामपंचायतने त्वरीर दुरुस्ती करुन पाणी पुरवठा सुरळीत केला.(वार्ताहर) वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने ग्रामस्थ त्रस्त विरूळ (आकाजी) - वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. परिसरातील वीज पुरवठा वेळीअवेळी खंडित होतो. त्यामुळे भारनियमन नसताना ग्रामस्थांना उकाडा सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. वीज वितरण कंपनीच्या बेताल कारभाराचा फटका येथील ग्रामस्थांना सहन करावा लागत असून येथील कार्यालयात कर्मचारी संख्या कमी आहे. अशात यंत्रणेत काही बिघाड झाल्यास दोन-तीन तास तो सुरळीत होत नाही. विरूळ येथील वायरमन सेवानिवृत्त झाल्यावर येथे अन्य कर्मचारी देण्यात आलेला नाही. त्यामुळे साधारण बिघाड झाल्यावर अन्य गावातून कर्मचारी येण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागते. येथील वीज पुरवठा कधीही खंडित होत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याबाबत अभियंता कळसकर यांना निवेदन सादर करण्यात आले.(वार्ताहर)