शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुसऱ्यांदा सोडणार पुजारीटोलाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 21:57 IST

डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार असल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे.त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या डांगोली येथील वैनगंगा नदीचे पात्र देखील यंदा एप्रिल महिन्यातच कोरडे पडले. त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी डांर्गोलीपासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत झाली. मात्र आता नदीपात्रात चार-पाच दिवसच शहराला पाणी पुरवठा ऐवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण होण्याचीे शक्यता आहे.या समस्येवर मात करण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. कालव्याव्दारे हे पाणी येत्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले तेव्हाच पाणी पोहचावे यासाठी व्यवस्था करण्यात आली. पहिल्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून साडे तीन एमएमक्यु पाणी सोडण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून बाघ सिंचन विभागाकडे १० एमएमक्यु पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा पुजारीटोलाचे पाणी सोडून पाणी टंचाईवर मात केली जात आहे. त्यात आता पावसाळ््यापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून व्यवस्था आली आहे. मात्र यासाठी पाणी सोडण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई