शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा सोडणार पुजारीटोलाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 21:57 IST

डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार असल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे.त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या डांगोली येथील वैनगंगा नदीचे पात्र देखील यंदा एप्रिल महिन्यातच कोरडे पडले. त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी डांर्गोलीपासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत झाली. मात्र आता नदीपात्रात चार-पाच दिवसच शहराला पाणी पुरवठा ऐवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण होण्याचीे शक्यता आहे.या समस्येवर मात करण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. कालव्याव्दारे हे पाणी येत्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले तेव्हाच पाणी पोहचावे यासाठी व्यवस्था करण्यात आली. पहिल्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून साडे तीन एमएमक्यु पाणी सोडण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून बाघ सिंचन विभागाकडे १० एमएमक्यु पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा पुजारीटोलाचे पाणी सोडून पाणी टंचाईवर मात केली जात आहे. त्यात आता पावसाळ््यापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून व्यवस्था आली आहे. मात्र यासाठी पाणी सोडण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई