शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

दुसऱ्यांदा सोडणार पुजारीटोलाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 21:57 IST

डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार असल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे.त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या डांगोली येथील वैनगंगा नदीचे पात्र देखील यंदा एप्रिल महिन्यातच कोरडे पडले. त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी डांर्गोलीपासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत झाली. मात्र आता नदीपात्रात चार-पाच दिवसच शहराला पाणी पुरवठा ऐवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरात पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण होण्याचीे शक्यता आहे.या समस्येवर मात करण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.११) पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. कालव्याव्दारे हे पाणी येत्या डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविले जाणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले तेव्हाच पाणी पोहचावे यासाठी व्यवस्था करण्यात आली. पहिल्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून साडे तीन एमएमक्यु पाणी सोडण्यात आले. तर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून बाघ सिंचन विभागाकडे १० एमएमक्यु पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा पुजारीटोलाचे पाणी सोडून पाणी टंचाईवर मात केली जात आहे. त्यात आता पावसाळ््यापर्यंत शहराची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून व्यवस्था आली आहे. मात्र यासाठी पाणी सोडण्याची गरज आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई