शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जिल्ह्यातील १४३ गावांवर पाणी टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:44 IST

जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस न बसल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून १४३ गावातील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरुन पुढे आली आहे.

ठळक मुद्देतीन तालुक्यात गंभीर स्थिती : २७२ उपाययोजना, ७१ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस न बसल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून १४३ गावातील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरुन पुढे आली आहे.गोंदिया जिल्ह्यात सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ सरासरीच्या तुलनेत ११४५ मि.मी.पाऊस झाला. तर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर भूजल पातळी अवंलबून असते. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यात केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार अशी शक्यता वर्तविली जात होती. काही प्रमाणात पाणी पुरवठा विभागाच्या अहवालावरुन खरी झाली आहे. जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर चार टप्प्यात पाणी टंचाईचा आराखडा तयार केला जातो. जानेवारी ते मार्च महिन्याच्या तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील एकूण १४३ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.यात १२३ गावे आणि २० वाड्यांचा समावेश आहे. पाणी टंचाईची सर्वाधिक झळ अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण या भागात पावसाची सरासरी देखील कमी असून त्याचाच परिणाम सिंचन प्रकल्पांवर झाला आहे. जिल्ह्यात १४३ गावांमध्ये निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने २७२ उपाय योजना करण्यासाठी ७१ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत पाणी टंचाईची सर्वाधिक समस्या असणाºया ४३ गावांमध्ये ४३ बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. तसेच पाच गावातील नळ योजनांची व २२० बोअरवेल दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधीला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई