शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १४३ गावांवर पाणी टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:44 IST

जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस न बसल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून १४३ गावातील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरुन पुढे आली आहे.

ठळक मुद्देतीन तालुक्यात गंभीर स्थिती : २७२ उपाययोजना, ७१ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस न बसल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून १४३ गावातील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरुन पुढे आली आहे.गोंदिया जिल्ह्यात सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ सरासरीच्या तुलनेत ११४५ मि.मी.पाऊस झाला. तर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर भूजल पातळी अवंलबून असते. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यात केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार अशी शक्यता वर्तविली जात होती. काही प्रमाणात पाणी पुरवठा विभागाच्या अहवालावरुन खरी झाली आहे. जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर चार टप्प्यात पाणी टंचाईचा आराखडा तयार केला जातो. जानेवारी ते मार्च महिन्याच्या तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील एकूण १४३ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.यात १२३ गावे आणि २० वाड्यांचा समावेश आहे. पाणी टंचाईची सर्वाधिक झळ अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण या भागात पावसाची सरासरी देखील कमी असून त्याचाच परिणाम सिंचन प्रकल्पांवर झाला आहे. जिल्ह्यात १४३ गावांमध्ये निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने २७२ उपाय योजना करण्यासाठी ७१ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत पाणी टंचाईची सर्वाधिक समस्या असणाºया ४३ गावांमध्ये ४३ बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. तसेच पाच गावातील नळ योजनांची व २२० बोअरवेल दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधीला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई