शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जिल्ह्यातील १४३ गावांवर पाणी टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:44 IST

जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस न बसल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून १४३ गावातील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरुन पुढे आली आहे.

ठळक मुद्देतीन तालुक्यात गंभीर स्थिती : २७२ उपाययोजना, ७१ लाख रुपयांची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा परतीचा पाऊस न बसल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. याचा परिणाम भूजल पातळीवर झाला असून १४३ गावातील गावकऱ्यांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची बाब भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालावरुन पुढे आली आहे.गोंदिया जिल्ह्यात सरासरी १३४९ मि.मी.पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ सरासरीच्या तुलनेत ११४५ मि.मी.पाऊस झाला. तर परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर भूजल पातळी अवंलबून असते. मात्र यंदा फेब्रुवारी महिन्यात केवळ २५ ते ३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार अशी शक्यता वर्तविली जात होती. काही प्रमाणात पाणी पुरवठा विभागाच्या अहवालावरुन खरी झाली आहे. जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे उन्हाळ्यात निर्माण होणाºया पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर चार टप्प्यात पाणी टंचाईचा आराखडा तयार केला जातो. जानेवारी ते मार्च महिन्याच्या तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील एकूण १४३ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.यात १२३ गावे आणि २० वाड्यांचा समावेश आहे. पाणी टंचाईची सर्वाधिक झळ अर्जुनी मोरगाव, सालेकसा, देवरी या तालुक्यांना बसण्याची शक्यता आहे. कारण या भागात पावसाची सरासरी देखील कमी असून त्याचाच परिणाम सिंचन प्रकल्पांवर झाला आहे. जिल्ह्यात १४३ गावांमध्ये निर्माण होणारी संभाव्य पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने २७२ उपाय योजना करण्यासाठी ७१ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत पाणी टंचाईची सर्वाधिक समस्या असणाºया ४३ गावांमध्ये ४३ बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. तसेच पाच गावातील नळ योजनांची व २२० बोअरवेल दुरूस्तीची कामे करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधीला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई