शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीसाठी धडपडणारा शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:13 IST

उन्हाळ्याच्या सुट्यांचा उपभोग घेणे म्हणजे शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असते. बरीच शिक्षक मंडळी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये कुटुंबासह फिरायला जातात तर कुणी इतर कामात गुंतले असतात. परंतु अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अरततोंडी (इळदा) येथील विजयकुमार सखाराम लोथे यांनी उन्हाळ्यांच्या सुट्यांचा सदुपयोग करीत पाणी बचतीसाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवित आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा, हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेऊन लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्याच्या सुट्यात जनजागृती : उपक्रमाचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : उन्हाळ्याच्या सुट्यांचा उपभोग घेणे म्हणजे शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असते. बरीच शिक्षक मंडळी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये कुटुंबासह फिरायला जातात तर कुणी इतर कामात गुंतले असतात. परंतु अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अरततोंडी (इळदा) येथील विजयकुमार सखाराम लोथे यांनी उन्हाळ्यांच्या सुट्यांचा सदुपयोग करीत पाणी बचतीसाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवित आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा, हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेऊन लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.विजयकुमार लोथे असे त्या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्याला दरवर्षी पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते. पाणी टंचाईला प्रशासन जरी जबाबदार असले तरी काही प्रमाणात नागरिक सुध्दा जबाबदार आहे. त्यामुळेच पाणी बचतीसाठी आत्ताच उपाय योजना केली नाही तर भावी पिढीसाठी पाणी शिल्लक राहणार की नाही याबाबत शंका आहे. नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोथे यांची धडपड सुरू आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गावा-गावात जावून पाणी बचत करण्यासंबंधिचे पत्रक तयार करुन येणाऱ्या पिढीसाठी पाणी कसे वाचविता येईल याची जनजागृती करीत लोथे आहेत. त्यांच्या स्वलिखीत कवितेतून संदेश दिला आहे की ‘शोध घेत पाण्याचा, सारेच चालले खोल-खोल’ भूर्गभातून आवाय येतोय, संपली बाबा आता ओल’ वारे माप उपसा करतोय,अडवत नाही पाणी’किती वर्षे वागणार आहेस, असाच वेड्यावानी, निसर्गाने दिल्याशिवाय, भांडे भरता येत नाही, विनाकारण सांडवू नकोस, पाणी तयार करता येत नाही. या कवितेतून नागरिकांना त्यांनी पाणी वाचविण्याचा संदेश दिला आहे.२५-३० वर्षापूर्वी पावसाळ्यात सतत चार महिने पाऊस पडायचा. कधी मुसळधार तर कधी रिमझिम. यामुळे भूर्गभात पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात तयार होत असे. तेव्हा पिण्याच्या पाण्याची आणि शेतीला पाणी देण्याची समस्या नव्हती. त्यावेळी विद्युत मोटारपंप बोटावर मोजण्या इतकी होती. विहिरीतील पाणी विद्युत पंपाद्वारे किंवा मोटारपंपाव्दारे पिकांना पाणी देण्याची पद्धत होती. परंतु अलीकडे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. परिणामी भूगर्भातील संरक्षित पाणी साठ्यावर सुध्दा याचा परिणाम होत आहे.विहिरी, बोअरवेलनी सुध्दा तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक लावण्यास सुरुवात केली.१५०-२०० फुटापर्यंत बोअरवेलच्या सहाय्याने पाण्याचा उपसा केला जात आहे. परिणामी भूृर्गभातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होवू लागली. शुद्ध पाणी मिळण्याचे स्त्रोत कमी झाले. येणाºया काळात पिण्याच्या पाण्याची समस्या समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. लोथे हा मूलमंत्र गावात गावात पोहचून नागरिकांना देत आहे.कमीत कमी पाच वृक्ष लावाअर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रत्येक गावा-गावात जावून पाणी वाचवा, पाणी जीरवा, उन्हाळी धानपीक घेवू नका, ठिबक सिंचन योजनेचा वापर करा, धानपिकापेक्षा कमी पाण्याचे पीक घ्या, आपल्या घरी किमान पाच वृक्ष लावा, वन्यप्राणी व पक्ष्यांचा विचार करा असा संदेश पोहोचवून लोकजागृती करुन लोथे उन्हाळ्यांच्या सुट्यांचा सदुपयोग करीत आहेत.