शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

प्रभाग क्रमांक ४ मध्ये पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

अर्जुनी नगरपंचायत होऊन ५ वर्षे झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सध्या नवतपा सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली अख्खे जग आहे. अशा परिस्थितीत पिलाबोडी परिसरातील महिला डोक्यावर गुंड घेऊन चक्क राज्यमार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.

ठळक मुद्दे४ वर्षांपासून बोअरवेल नादुरूस्त : नगरपंचायत कुंभकर्णी झोपेत, नागरिकांचे मात्र हाल

राधेश्याम भेंडारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शहरातील प्रभाग क्रमांक- ४ मधील पिलाबोडी परिसरातील बोअरवेल मागील ४ वर्षांपासून नादुरूस्त आहे. यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी राज्यमार्ग ओलांडून पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही नगरपंचायतचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रभागवासी मात्र पाण्यासाठी तडफडत आहेत.अर्जुनी नगरपंचायत होऊन ५ वर्षे झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सध्या नवतपा सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली अख्खे जग आहे. अशा परिस्थितीत पिलाबोडी परिसरातील महिला डोक्यावर गुंड घेऊन चक्क राज्यमार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. एकीकडे कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्स ठेवण्यास प्रशासन सांगत आहे, तर दुसरीकडे पाण्यासाठी विशिष्ट बोअरवेलवर गर्दी होत असल्याचे चित्र आहे.या परिसरात सुमारे ३० कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्या सोयीकरिता बोअरवेल आहेत. मात्र गेल्या चार वर्षांपासून ते नादुरूस्त आहेत. त्यातून कधी गढूळ पाणी येते, तर कधी पाणीच येत नाही अशी अवस्था आहे. यापुर्वी याच समस्येला घेवून काही महिलांनी नगरपंचायतवर आक्रोश मोर्चा काढला होता. तेव्हा लवकरच समस्या दूर करण्याचे आश्वास नगर पंचायतने देऊन वेळ मारुन नेल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. स्थानिक महिलांनी वारंवार बोअरवेल दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र नगरपंचायत अधिकारी आणि पदाधिकारी यांनी ढुंकूनही बघितले नाही, अशी तक्रार महिलांनी केली. आता तरी नगरपंचायत प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देईल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे.चार वर्षांपासून पायपीट सुरु आहे.आम्ही अनेकदा नगरपंचायतला जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी नवीन बोअरवेल तयार करुन द्या किंवा जुना दुरु स्त करण्याची मागणी केली. मात्र आमच्या मागण्यांकडे कुणीच लक्ष देत नाही. जीव मुठीत धरून दूरवरून पाणी आणावे लागते.- आशा इस्कापे------------------गरिबाला न्याय नाही!नगरसेवक व नगरपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेकदा भेटून बोअरवेल दुरुस्ती करा अशी मागणी केली. बोअरवेल बंद असल्याने एकाच ठिकाणी गर्दी करावी लागते. पाण्यासाठी भरपुर वेळ वाया जातोे.गरिबाला न्याय नाही.- शीला मेश्राम------------------नवीन जागा शोधून ४ महिने झाले४ महिन्यांपूर्वी नवीन बोअरवेल खोदण्यासाठी जागा बघून गेले.आम्हाला बरे वाटले होते. उन्हाळा संपत आला मात्र पाणी नाही मिळाले.-रायवंता बंसोड------------------लवकरच दुरूस्ती होईल जाधवपाणीटंचाई होऊ नये म्हणून नगरातील सर्व बोअरवेल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. १३ नादुरूस्त बोअरवेलची माहिती मिळाली आहे.लवकरच योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.- शिल्पाराणी जाधवमुख्याधिकारी, नगर पंचायत, अर्जुनी-मोरगाव

टॅग्स :Waterपाणी