शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग क्रमांक ४ मध्ये पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

अर्जुनी नगरपंचायत होऊन ५ वर्षे झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सध्या नवतपा सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली अख्खे जग आहे. अशा परिस्थितीत पिलाबोडी परिसरातील महिला डोक्यावर गुंड घेऊन चक्क राज्यमार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.

ठळक मुद्दे४ वर्षांपासून बोअरवेल नादुरूस्त : नगरपंचायत कुंभकर्णी झोपेत, नागरिकांचे मात्र हाल

राधेश्याम भेंडारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शहरातील प्रभाग क्रमांक- ४ मधील पिलाबोडी परिसरातील बोअरवेल मागील ४ वर्षांपासून नादुरूस्त आहे. यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी राज्यमार्ग ओलांडून पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही नगरपंचायतचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रभागवासी मात्र पाण्यासाठी तडफडत आहेत.अर्जुनी नगरपंचायत होऊन ५ वर्षे झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सध्या नवतपा सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली अख्खे जग आहे. अशा परिस्थितीत पिलाबोडी परिसरातील महिला डोक्यावर गुंड घेऊन चक्क राज्यमार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. एकीकडे कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्स ठेवण्यास प्रशासन सांगत आहे, तर दुसरीकडे पाण्यासाठी विशिष्ट बोअरवेलवर गर्दी होत असल्याचे चित्र आहे.या परिसरात सुमारे ३० कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्या सोयीकरिता बोअरवेल आहेत. मात्र गेल्या चार वर्षांपासून ते नादुरूस्त आहेत. त्यातून कधी गढूळ पाणी येते, तर कधी पाणीच येत नाही अशी अवस्था आहे. यापुर्वी याच समस्येला घेवून काही महिलांनी नगरपंचायतवर आक्रोश मोर्चा काढला होता. तेव्हा लवकरच समस्या दूर करण्याचे आश्वास नगर पंचायतने देऊन वेळ मारुन नेल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. स्थानिक महिलांनी वारंवार बोअरवेल दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र नगरपंचायत अधिकारी आणि पदाधिकारी यांनी ढुंकूनही बघितले नाही, अशी तक्रार महिलांनी केली. आता तरी नगरपंचायत प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देईल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे.चार वर्षांपासून पायपीट सुरु आहे.आम्ही अनेकदा नगरपंचायतला जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी नवीन बोअरवेल तयार करुन द्या किंवा जुना दुरु स्त करण्याची मागणी केली. मात्र आमच्या मागण्यांकडे कुणीच लक्ष देत नाही. जीव मुठीत धरून दूरवरून पाणी आणावे लागते.- आशा इस्कापे------------------गरिबाला न्याय नाही!नगरसेवक व नगरपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेकदा भेटून बोअरवेल दुरुस्ती करा अशी मागणी केली. बोअरवेल बंद असल्याने एकाच ठिकाणी गर्दी करावी लागते. पाण्यासाठी भरपुर वेळ वाया जातोे.गरिबाला न्याय नाही.- शीला मेश्राम------------------नवीन जागा शोधून ४ महिने झाले४ महिन्यांपूर्वी नवीन बोअरवेल खोदण्यासाठी जागा बघून गेले.आम्हाला बरे वाटले होते. उन्हाळा संपत आला मात्र पाणी नाही मिळाले.-रायवंता बंसोड------------------लवकरच दुरूस्ती होईल जाधवपाणीटंचाई होऊ नये म्हणून नगरातील सर्व बोअरवेल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. १३ नादुरूस्त बोअरवेलची माहिती मिळाली आहे.लवकरच योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.- शिल्पाराणी जाधवमुख्याधिकारी, नगर पंचायत, अर्जुनी-मोरगाव

टॅग्स :Waterपाणी