शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

प्रभाग क्रमांक ४ मध्ये पाणी पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:00 IST

अर्जुनी नगरपंचायत होऊन ५ वर्षे झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सध्या नवतपा सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली अख्खे जग आहे. अशा परिस्थितीत पिलाबोडी परिसरातील महिला डोक्यावर गुंड घेऊन चक्क राज्यमार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.

ठळक मुद्दे४ वर्षांपासून बोअरवेल नादुरूस्त : नगरपंचायत कुंभकर्णी झोपेत, नागरिकांचे मात्र हाल

राधेश्याम भेंडारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शहरातील प्रभाग क्रमांक- ४ मधील पिलाबोडी परिसरातील बोअरवेल मागील ४ वर्षांपासून नादुरूस्त आहे. यामुळे येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी राज्यमार्ग ओलांडून पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही नगरपंचायतचे याकडे दुर्लक्ष असल्याने प्रभागवासी मात्र पाण्यासाठी तडफडत आहेत.अर्जुनी नगरपंचायत होऊन ५ वर्षे झाली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. सध्या नवतपा सुरू असून कोरोनाच्या सावटाखाली अख्खे जग आहे. अशा परिस्थितीत पिलाबोडी परिसरातील महिला डोक्यावर गुंड घेऊन चक्क राज्यमार्ग ओलांडून पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. एकीकडे कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्स ठेवण्यास प्रशासन सांगत आहे, तर दुसरीकडे पाण्यासाठी विशिष्ट बोअरवेलवर गर्दी होत असल्याचे चित्र आहे.या परिसरात सुमारे ३० कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्या सोयीकरिता बोअरवेल आहेत. मात्र गेल्या चार वर्षांपासून ते नादुरूस्त आहेत. त्यातून कधी गढूळ पाणी येते, तर कधी पाणीच येत नाही अशी अवस्था आहे. यापुर्वी याच समस्येला घेवून काही महिलांनी नगरपंचायतवर आक्रोश मोर्चा काढला होता. तेव्हा लवकरच समस्या दूर करण्याचे आश्वास नगर पंचायतने देऊन वेळ मारुन नेल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. स्थानिक महिलांनी वारंवार बोअरवेल दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र नगरपंचायत अधिकारी आणि पदाधिकारी यांनी ढुंकूनही बघितले नाही, अशी तक्रार महिलांनी केली. आता तरी नगरपंचायत प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देईल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी आहे.चार वर्षांपासून पायपीट सुरु आहे.आम्ही अनेकदा नगरपंचायतला जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी नवीन बोअरवेल तयार करुन द्या किंवा जुना दुरु स्त करण्याची मागणी केली. मात्र आमच्या मागण्यांकडे कुणीच लक्ष देत नाही. जीव मुठीत धरून दूरवरून पाणी आणावे लागते.- आशा इस्कापे------------------गरिबाला न्याय नाही!नगरसेवक व नगरपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनेकदा भेटून बोअरवेल दुरुस्ती करा अशी मागणी केली. बोअरवेल बंद असल्याने एकाच ठिकाणी गर्दी करावी लागते. पाण्यासाठी भरपुर वेळ वाया जातोे.गरिबाला न्याय नाही.- शीला मेश्राम------------------नवीन जागा शोधून ४ महिने झाले४ महिन्यांपूर्वी नवीन बोअरवेल खोदण्यासाठी जागा बघून गेले.आम्हाला बरे वाटले होते. उन्हाळा संपत आला मात्र पाणी नाही मिळाले.-रायवंता बंसोड------------------लवकरच दुरूस्ती होईल जाधवपाणीटंचाई होऊ नये म्हणून नगरातील सर्व बोअरवेल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. १३ नादुरूस्त बोअरवेलची माहिती मिळाली आहे.लवकरच योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.- शिल्पाराणी जाधवमुख्याधिकारी, नगर पंचायत, अर्जुनी-मोरगाव

टॅग्स :Waterपाणी