शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पाणी पुरवठा योजनांवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:14 IST

तालुक्यात नवेगावबांध व इटियाडोह हे दोन मोठे जलाशय आहेत. या दोन जलाशयातील पाण्याची पातळी खालावली आहे. या जलाशयांवर चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यावर येत्या आठवडाभरात जलसंकट उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देनवेगावबांध व इटियाडोह रिकामे । जलाशयातील पाण्याची पातळी खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात नवेगावबांध व इटियाडोह हे दोन मोठे जलाशय आहेत. या दोन जलाशयातील पाण्याची पातळी खालावली आहे. या जलाशयांवर चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यावर येत्या आठवडाभरात जलसंकट उद्भवण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.अर्जुनी मोरगाव तालुका तलावांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात लहान मोठे तब्बल ३३३ तलाव आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११७५ मि.मि. असताना गतवर्षी ९५४ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे आधीपासूनच तलाव, बोड्या तहानलेल्याच होत्या. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सिरेगावबांध, रामपूरी, खांबी व गोठणगाव अशा चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत. यापैकी सिरेगावबांध व रामपूरी या नवेगावबांध तलाव तर गोठणगाव व खांबी या इटियाडोह तलावाला जोडल्या आहेत. या चारही पाणी पुरवठा योजनांद्वारे तालुक्यातील तब्बल ५४ गावांना पाणी पुरवठा होतो.या योजनांच्या मार्फतीने दररोज प्रती कुटुंब ५०० लिटर प्रमाणे सुमारे ५००० कुटुंबाना नियमितपणे पाणी पुरवठा सुरु आहे.मात्र पर्जन्यमान कमी असल्याने तलावातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे या दोन्ही तलावात पाणी पुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या विहिरीत कालव्याद्वारे येणारे पाणी हे येत्या चार दिवसात बंद होऊन पाणी पुरवठा योजना बंद पडतील. तालुक्यात भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. खबरदारीसाठी प्रशासनाने तातडीने कालव्याचा उपसा करणे गरजेचे आहे.जेणेकरुन चारही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीत राहतील, असा पत्रव्यवहार जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केला होता. मात्र यावर अद्यापही कुठल्याच उपाययोजना झाल्या नाहीत. येत्या चार दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर भिषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती आहे.२००७ मध्ये या पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या आहेत. पहिल्यांदाच एवढी भयावह परिस्थिती अनुभवयास येत आहे. शुक्रवारी बिडटोला व सावरटोला येथे केवळ एक दिवस योजनेचे पाणी बंद होते. तेव्हा गावकऱ्यांनी अक्षरश: बैलबंडी व ट्रॅक्टर लावून शेतातून पाणी आणले. पाणी पुरवठा योजना बंद पडली तर अर्जुनी मोरगाव येथे अभूतपूर्व जलसंकट उदभवू शकते.नळ योजना सुरू असतानाही येथे काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.येथील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी पुरवठा झाला नाही तर जलसंकटाचा सामना करावा लागणार हे निश्चित.- किशोर तरोणे, जि.प. सदस्य

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्प