शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पाणी पुरवठा योजनांवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:14 IST

तालुक्यात नवेगावबांध व इटियाडोह हे दोन मोठे जलाशय आहेत. या दोन जलाशयातील पाण्याची पातळी खालावली आहे. या जलाशयांवर चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यावर येत्या आठवडाभरात जलसंकट उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देनवेगावबांध व इटियाडोह रिकामे । जलाशयातील पाण्याची पातळी खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात नवेगावबांध व इटियाडोह हे दोन मोठे जलाशय आहेत. या दोन जलाशयातील पाण्याची पातळी खालावली आहे. या जलाशयांवर चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यावर येत्या आठवडाभरात जलसंकट उद्भवण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.अर्जुनी मोरगाव तालुका तलावांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात लहान मोठे तब्बल ३३३ तलाव आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११७५ मि.मि. असताना गतवर्षी ९५४ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे आधीपासूनच तलाव, बोड्या तहानलेल्याच होत्या. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सिरेगावबांध, रामपूरी, खांबी व गोठणगाव अशा चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत. यापैकी सिरेगावबांध व रामपूरी या नवेगावबांध तलाव तर गोठणगाव व खांबी या इटियाडोह तलावाला जोडल्या आहेत. या चारही पाणी पुरवठा योजनांद्वारे तालुक्यातील तब्बल ५४ गावांना पाणी पुरवठा होतो.या योजनांच्या मार्फतीने दररोज प्रती कुटुंब ५०० लिटर प्रमाणे सुमारे ५००० कुटुंबाना नियमितपणे पाणी पुरवठा सुरु आहे.मात्र पर्जन्यमान कमी असल्याने तलावातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे या दोन्ही तलावात पाणी पुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या विहिरीत कालव्याद्वारे येणारे पाणी हे येत्या चार दिवसात बंद होऊन पाणी पुरवठा योजना बंद पडतील. तालुक्यात भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. खबरदारीसाठी प्रशासनाने तातडीने कालव्याचा उपसा करणे गरजेचे आहे.जेणेकरुन चारही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीत राहतील, असा पत्रव्यवहार जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केला होता. मात्र यावर अद्यापही कुठल्याच उपाययोजना झाल्या नाहीत. येत्या चार दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर भिषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती आहे.२००७ मध्ये या पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या आहेत. पहिल्यांदाच एवढी भयावह परिस्थिती अनुभवयास येत आहे. शुक्रवारी बिडटोला व सावरटोला येथे केवळ एक दिवस योजनेचे पाणी बंद होते. तेव्हा गावकऱ्यांनी अक्षरश: बैलबंडी व ट्रॅक्टर लावून शेतातून पाणी आणले. पाणी पुरवठा योजना बंद पडली तर अर्जुनी मोरगाव येथे अभूतपूर्व जलसंकट उदभवू शकते.नळ योजना सुरू असतानाही येथे काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.येथील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी पुरवठा झाला नाही तर जलसंकटाचा सामना करावा लागणार हे निश्चित.- किशोर तरोणे, जि.प. सदस्य

टॅग्स :Itiadoh Projectइटियाडोह प्रकल्प