शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

शहरात पाणी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:37 IST

डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्राजवळ उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली.

ठळक मुद्देपाणी टंचाईची समस्या गंभीर : प्रशासनाचे दुर्लक्ष भोवलेडांगोर्लीत केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्राजवळ उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली. नदीच्या पात्रात केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याने शहरात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेमुळे शहरातील दोन लाखांवर नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने व यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना दिवसातून केवळ एकच वेळ पाणीे पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ती पाणी टंचाईची गंभीर समस्या शहरात निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने डांगोर्लीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाणी पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न केला. मात्र मजीप्राचा हा प्रयत्न देखील फसल्याचे चित्र आहे.वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे यंदा पाणी टंचाईची समस्या गंभीर होणार ही बाब मजीप्रा आणि जिल्हा प्रशासनाला चांगली ठाऊक असताना सुध्दा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आता शहरवासीयांना भोगावे लागणार असून शहरात आता पाणी पेटण्याची शक्यता आहे.अल्प पाणीसाठा असल्याची बाब जिल्हा प्रशासन आणि मजीप्राच्या अधिकाऱ्यांना चांगली ठाऊक होती. मात्र या दोन्ही विभागांच्या वेळकाढू धोरणाचा फटका आता शहरवासीयांना सहन करावा लागणार आहे. शहरातील पाणी टंचाईचा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर गुरूवारी (दि.५) जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेला भेट देवून पाहणी केली. तसेच मजीप्राने पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या बंधाऱ्याची पाहणी करुन पाणी टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती आहे.आठ दिवसांत उपाययोजना करणे अशक्यपुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम सहज शक्य व आठ दिवसात पूर्ण होणारे नाही.त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र संकटाला सामोरे जाणे अटळ आहे. आता हे दोन्ही विभाग यावर काय उपाययोजना करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.पर्यायी साधनाचा अभावशहराला महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाकडून होणारा पाणी पुरवठा बंद झाल्यास त्याला पर्यायी व्यवस्था शहरात नाही. शहरात बोअरवेल व विहिरींची संख्या सुध्दा फारशी नाही. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकारजिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेला संभाव्य पाणी टंचाईचा अहवाल यावरुन प्रशासनाने वेळीच उपाय योजना सुरू करण्याची गरज होती. मात्र तसे न करता केवळ पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पुजारीटोला धरणातून पाणी पुरवठा करण्याचा अ‍ॅक्शन प्लॉन तयार केला होता. पण प्रत्यक्षात त्यावर कुठलीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे आता जेव्हा केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याची बाब पुढे आल्यानंतर मजीप्रा आणि जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. परिस्थितीचे गांर्भीय ओळखून वेळीच उपाय योजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती.

टॅग्स :Waterपाणी