शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शहरात पाणी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 20:37 IST

डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्राजवळ उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली.

ठळक मुद्देपाणी टंचाईची समस्या गंभीर : प्रशासनाचे दुर्लक्ष भोवलेडांगोर्लीत केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्राजवळ उभारलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र यंदा वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरातील पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली. नदीच्या पात्रात केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याने शहरात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रालगत उभारण्यात आलेल्या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. या योजनेमुळे शहरातील दोन लाखांवर नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने व यंदा वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना दिवसातून केवळ एकच वेळ पाणीे पुरवठा केला जात आहे. त्यामुळे कधी नव्हे ती पाणी टंचाईची गंभीर समस्या शहरात निर्माण झाली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने डांगोर्लीजवळ वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाणी पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न केला. मात्र मजीप्राचा हा प्रयत्न देखील फसल्याचे चित्र आहे.वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे यंदा पाणी टंचाईची समस्या गंभीर होणार ही बाब मजीप्रा आणि जिल्हा प्रशासनाला चांगली ठाऊक असताना सुध्दा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आता शहरवासीयांना भोगावे लागणार असून शहरात आता पाणी पेटण्याची शक्यता आहे.अल्प पाणीसाठा असल्याची बाब जिल्हा प्रशासन आणि मजीप्राच्या अधिकाऱ्यांना चांगली ठाऊक होती. मात्र या दोन्ही विभागांच्या वेळकाढू धोरणाचा फटका आता शहरवासीयांना सहन करावा लागणार आहे. शहरातील पाणी टंचाईचा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर गुरूवारी (दि.५) जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेला भेट देवून पाहणी केली. तसेच मजीप्राने पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या बंधाऱ्याची पाहणी करुन पाणी टंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती आहे.आठ दिवसांत उपाययोजना करणे अशक्यपुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याव्दारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे काम सहज शक्य व आठ दिवसात पूर्ण होणारे नाही.त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र संकटाला सामोरे जाणे अटळ आहे. आता हे दोन्ही विभाग यावर काय उपाययोजना करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.पर्यायी साधनाचा अभावशहराला महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाकडून होणारा पाणी पुरवठा बंद झाल्यास त्याला पर्यायी व्यवस्था शहरात नाही. शहरात बोअरवेल व विहिरींची संख्या सुध्दा फारशी नाही. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकारजिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेला संभाव्य पाणी टंचाईचा अहवाल यावरुन प्रशासनाने वेळीच उपाय योजना सुरू करण्याची गरज होती. मात्र तसे न करता केवळ पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पुजारीटोला धरणातून पाणी पुरवठा करण्याचा अ‍ॅक्शन प्लॉन तयार केला होता. पण प्रत्यक्षात त्यावर कुठलीच उपाय योजना केली नाही. त्यामुळे आता जेव्हा केवळ आठ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याची बाब पुढे आल्यानंतर मजीप्रा आणि जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे. परिस्थितीचे गांर्भीय ओळखून वेळीच उपाय योजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती.

टॅग्स :Waterपाणी