शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
6
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
7
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
8
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
9
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
10
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
11
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
12
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
13
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
14
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
15
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
16
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
17
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
18
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
19
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
20
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
Daily Top 2Weekly Top 5

शॅम्पू-सोड्याने सुरू आहे बसेसची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST

कपिल केकत (लोकमत विशेष) गोंदिया : बसमध्ये प्रवासादरम्यान बाधितामुळे अन्य प्रवाशाला धोका होऊ शकतो. अशात प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने बसेस ...

कपिल केकत (लोकमत विशेष)

गोंदिया : बसमध्ये प्रवासादरम्यान बाधितामुळे अन्य प्रवाशाला धोका होऊ शकतो. अशात प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने बसेस स्वच्छ ठेवण्यासाठी व कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बसेसच्या धुलाईची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत गोंदिया आगारातही शॅम्पू-सोड्याने बसेसची धुलाई सुरू करण्यात आली असल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखता यावा, यासाठी राज्य शासनाने लालपरीची चाके थांबविली होती. मात्र, अनलॉकअंतर्गत जिल्हांतर्गत व नंतर आंतरजिल्हा परवानगी देत लालपरीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या प्रवासादरम्यान बाधित व्यक्ती बसलेल्या जागेवरून अन्य प्रवाशालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमका हाच धसका घेऊन कित्येक नागरिक एसटीचा प्रवास टाळत असल्याचे म्हणणेही वावगे ठरणार नाही. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा, तसेच आपल्या बसेसमधून प्रवास करणारा प्रवासी सुरक्षित राहावा, या दृष्टीने आता परिवहन महामंडळाने बसेस धुलाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

आतापर्यंत बसेसचे सॅनिटायझेशन, तसेच पाणी मारून धुलाई केली जात होती. मात्र, या विशेष मोहिमेंतर्गत बसेसची शॅम्प-सोड्याने चांगली घासून-घासून सफाई करायची आहे, जेणेकरून बसच्या आतमधील व बाहरेचा भाग स्वच्छ होऊन कोरोना विषाणूंचा नाश, तसेच बसमधून येणारा वास व दुर्गंधही नाहीसा होणार. यानुसार, गोंदिया आगारातही मागील ३-४ दिवसांपासून बसेस धुलाईचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

----------------------

दररोज ४ बसेसची धुलाई

गोंदिया आगाराकडे ७१ बसेस आहेत. महामंडळाच्या या उपक्रमांतर्गत आगाराकडून मागील ३-४ दिवसांपासून दररोज ४ बसेसची धुलाई केली जात आहे. यासाठी आगाराने शॅम्पू-साबण व धुलाईचे अन्य साहित्य आणले आहेत. धुलाईसाठी वर्कशॉपमधील ५ कर्मचारी लावण्यात आले असून, आत व बाहेरून बसेसची बारकाईने धुलाई केली जात आहे.

----------------------------------

नागरिकांच्या मनातील भीती दूर होणार

परिवहन महामंडळाने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे बसेसमध्ये प्रवास करायला घेऊन नागरिकांत असलेली भीती दूर होणार आहे. स्वच्छ बसेसमधून प्रवास करताना प्रवासी बिनधास्त राहणार, शिवाय यातून महामंडळाचीही प्रतिमा उंचावणार आहे.