शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

वारकरीटोला येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वारकरीटोला या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली ...

ठळक मुद्देकोटरा ग्रामपंचायत : टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वारकरीटोला या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी गावातील महिलांना सकाळपासूनच पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे.प्रशासन एकीकडे पाणी समस्यासंदर्भात विविध उपाययोजना करीत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र यानंतरही काही गावात पाणी टंचाईची समस्या कायम आहे.त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्यास शासनाला यश आले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कामयस्वरुपी सोडविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यात यावर्षी पाणी टंचाईची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. तलाव, बोडी, धरण, प्रकल्पातील पाण्याची पातळी खोलवर गेली. या भागातील नागरिकांना मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. विहिरीचे स्त्रोत आटल्याने अन्य ठिकाणाहून पाणी विहिरीत टाकण्यात आले. मात्र टाकण्यात आलेले पाणी पिण्यायोग्य नाही. सदर पाण्याचा रंग लालसर असून पाण्यात विविध प्रकारचे जंतू आढळली. त्यामुळे गावकरी पाण्याचा शोधाशोध करुन आपली गरज पूर्ण करीत आहे. गावामध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने पाणी टंचाई संदर्भातील प्रस्ताव सालेकसा पंचायत समिती कार्यालयात पडून आहे. या प्रस्तावावर तातडीने निर्णय यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. पाणी टंचाईमुळे शेतकºयांना जनावरे पाळणे सुध्दा कठिण झाले आहे. कोटरा येथील निवासी असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांची विचारणा केली असता वारकरीटोला गावासाठी उत्तम स्थायी व्यवस्था व्हावी याकरिता प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई