शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

सरपंच व्हायचे,मग सातवा वर्ग उत्तीर्ण आहात का ? करा खात्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार नसून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. सरपंच पदासाठी अद्यापही आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही.

ठळक मुद्देनिवडणूक विभागाची अट : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायत निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आता सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाणार असून निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंच निवडला जाणार आहे. सरपंचपदी विराजमान होण्यासाठी सदस्य सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्या शिवाय त्याला सरपंच होता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे होणाऱ्या उमेदवाराला किमान सातवा वर्ग पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आधी सातवा वर्ग उत्तीर्ण आहे किंवा नाही याची खात्री करावी लागणार आहे. राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार नसून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. सरपंच पदासाठी अद्यापही आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत थोडा उत्साह कमी दिसून येत आहे. तर गुरुवारी (दि.२४) राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहणारा उमेदवार किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असण्याची अट जाहीर केली आहे. सातवा वर्ग उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याचा पुरावा जोडावा लागणार आहे. म्हणजे सरपंच व्हायचे असले तर सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना सुध्दा उमेदवारी देताना याची खात्री करावी लागणार आहे. १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींचे महत्व फार वाढले आहे. तर विविध योजना सुध्दा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच हा सुशिक्षित असल्यास गावाचा कायपालट होवू शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी लागू केलेली सातवा वर्ग उत्तीर्ण असल्याची अट फार कमी किमान १२ वर्ग उत्तीर्ण असल्याची अट ठेवणे आवश्यक होते असा सृूर नागरिकांमध्ये आहे. 

केवळ दोन उमेदवारांनी दाखल केले अर्जजिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मागील दोन दिवसात तिरोडा तालुक्यात १ आणि सालेकसा तालुक्यातील १ उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १६३४ जागांसाठी ३ लाख ३८ हजार मतदार करणार मतदान १८९ ग्रामपंचायतींच्या १६३४ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार ४०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यंदा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने निवडणुकीबाबत उमेदवारांमध्ये अनुउत्साह दिसून येत आहे.

 

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक