शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम,नक्षलग्रस्त भागातील युवकांची रोजगारासाठी भटकंती

By admin | Updated: November 9, 2014 22:33 IST

गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या

केशोरी : गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक विकासापासून कोसोदूर जात आहे. औद्योगिक विकास न होण्याला शासनच जवाबदार असलचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे.या परिसरासाठी घोषित झालेल्या योजना कागदोत्रीच मुरत असल्याची नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. या परिसरात औद्योगिक विकासाची कामे न झाल्यामुळे या भागातील नागरिक औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत आजही आहेत. सुशिक्षीत बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. औद्योगिक विकास होण्याकडे त्यांचे लक्ष केंद्रीत झाले असून बरोजगार युवकांची कामाच्या शोधात मोठ्या शहराकडे भटकंती सुरू आहे. हे परिसर नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असल्याने या परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवावर्ग नक्षलग्रस्त चळवळीकडे वळण्याचे प्रयत्न करू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील लहानमोठे कार्यकर्ते ठेकेदारी क्षेत्रात गुंतलेले आहेत. मात्र औद्योगिक विकासाकडे कोणाचेही लक्ष नाही. लघू उद्योगांतर्गत खासगी मालकीच्या भात गिरण्या व छोटे-मोठे व्यवसाय आहेत. परंतु त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून मॅनपॉवर कमी करून विद्युत बटन दाबण्याच्या प्रकारामुळे मंजूरसंख्या कमी लागत आहे. या प्रकारामुळ दिवसेंदिवस केशोरी परिसरात रोजगाराची समस्या उग्ररूप धारण करू पाहत आहे. या भागत मोहफुलांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापासून अनेक प्रकारचे साहित्य तयार होऊ शकतात. त्याचबरोबर बेहळा, हिरडा, आवळा यासारख्या महत्त्वाच्या औषधीयुक्त झाडांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे छोटेमोठे उद्योग निर्मितीला वेळ लागणार नाही. या भागाचा औद्योगिक विकास झाल्यास फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची समस्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही. या परिसरात इटियाडोह जलाशय आहे. त्या जलाशयाला धरून विद्युत निर्मिती प्लाँट तयार करण्याचा शासनाने नियोजन केला तर या कामावर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळू शकेल. मागील कित्येक दिवसांपासून प्रतागपड हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाले आहे. परंतु अजूनही त्या स्थळाचा विकास झालेला नाही. त्या ठिकाणी मोठ्या उपहारगृहाची तसेच प्रवाशी व पर्यटकांना राहण्याची उत्तम व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. हे स्थळ अजूनही विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते.केशोरी परिसर वनसंपत्तीने व्याप्त आहे. शासनाने वनस्पतीपासून तयार होणाऱ्या औषधींचे कारखाने तयार केल्यास अनेकांच्या हातांना कामे मिळतील व केशोरी परिसराचा औद्योगिक विकास होण्यास विलंब लागणार नाही. माणसाला उपयुक्त असणारे घटक या परिसरात विपूल प्रमाणात आहेत. येथील जंगलात मोहफुले, हिरडा, बेहळा, डिंग, लाटव, टेंभरून, आवळा आदी औषधनिर्मितीत उपयोगी ठरणाऱ्या बाबी मिळत मिळतात. त्यामुळे येथे औषध कारखाने उघडण्याची गरज आहे. या भागात धान व मिरचीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्न घेतले जात नाही. लागूनच इटियाडोह धरण असूनसुध्दा पुरेशा प्रमाणात सिंंचनाची व्यवस्था नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. सिंंचनाची व्यवस्था करून शेतकऱ्यांना दुसरे उत्पन्न घेण्याचे नियोजन कृषी विभागाने करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या भागातील शेतकरी प्रगतीच्या वाटेवर येवू शकणार नाही. तसेच लहान मोठ्या कारखान्यांची निर्मिती झाल्याशिवाय बरोजगारांचा प्रश्न निकाली लागणार नाही. त्यासाठी औद्योगिक विकासाची गरज आहे.