शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

दुर्गम,नक्षलग्रस्त भागातील युवकांची रोजगारासाठी भटकंती

By admin | Updated: November 9, 2014 22:33 IST

गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या

केशोरी : गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक विकासापासून कोसोदूर जात आहे. औद्योगिक विकास न होण्याला शासनच जवाबदार असलचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे.या परिसरासाठी घोषित झालेल्या योजना कागदोत्रीच मुरत असल्याची नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. या परिसरात औद्योगिक विकासाची कामे न झाल्यामुळे या भागातील नागरिक औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत आजही आहेत. सुशिक्षीत बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. औद्योगिक विकास होण्याकडे त्यांचे लक्ष केंद्रीत झाले असून बरोजगार युवकांची कामाच्या शोधात मोठ्या शहराकडे भटकंती सुरू आहे. हे परिसर नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असल्याने या परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवावर्ग नक्षलग्रस्त चळवळीकडे वळण्याचे प्रयत्न करू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील लहानमोठे कार्यकर्ते ठेकेदारी क्षेत्रात गुंतलेले आहेत. मात्र औद्योगिक विकासाकडे कोणाचेही लक्ष नाही. लघू उद्योगांतर्गत खासगी मालकीच्या भात गिरण्या व छोटे-मोठे व्यवसाय आहेत. परंतु त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून मॅनपॉवर कमी करून विद्युत बटन दाबण्याच्या प्रकारामुळे मंजूरसंख्या कमी लागत आहे. या प्रकारामुळ दिवसेंदिवस केशोरी परिसरात रोजगाराची समस्या उग्ररूप धारण करू पाहत आहे. या भागत मोहफुलांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापासून अनेक प्रकारचे साहित्य तयार होऊ शकतात. त्याचबरोबर बेहळा, हिरडा, आवळा यासारख्या महत्त्वाच्या औषधीयुक्त झाडांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे छोटेमोठे उद्योग निर्मितीला वेळ लागणार नाही. या भागाचा औद्योगिक विकास झाल्यास फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची समस्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही. या परिसरात इटियाडोह जलाशय आहे. त्या जलाशयाला धरून विद्युत निर्मिती प्लाँट तयार करण्याचा शासनाने नियोजन केला तर या कामावर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळू शकेल. मागील कित्येक दिवसांपासून प्रतागपड हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाले आहे. परंतु अजूनही त्या स्थळाचा विकास झालेला नाही. त्या ठिकाणी मोठ्या उपहारगृहाची तसेच प्रवाशी व पर्यटकांना राहण्याची उत्तम व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. हे स्थळ अजूनही विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते.केशोरी परिसर वनसंपत्तीने व्याप्त आहे. शासनाने वनस्पतीपासून तयार होणाऱ्या औषधींचे कारखाने तयार केल्यास अनेकांच्या हातांना कामे मिळतील व केशोरी परिसराचा औद्योगिक विकास होण्यास विलंब लागणार नाही. माणसाला उपयुक्त असणारे घटक या परिसरात विपूल प्रमाणात आहेत. येथील जंगलात मोहफुले, हिरडा, बेहळा, डिंग, लाटव, टेंभरून, आवळा आदी औषधनिर्मितीत उपयोगी ठरणाऱ्या बाबी मिळत मिळतात. त्यामुळे येथे औषध कारखाने उघडण्याची गरज आहे. या भागात धान व मिरचीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्न घेतले जात नाही. लागूनच इटियाडोह धरण असूनसुध्दा पुरेशा प्रमाणात सिंंचनाची व्यवस्था नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. सिंंचनाची व्यवस्था करून शेतकऱ्यांना दुसरे उत्पन्न घेण्याचे नियोजन कृषी विभागाने करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या भागातील शेतकरी प्रगतीच्या वाटेवर येवू शकणार नाही. तसेच लहान मोठ्या कारखान्यांची निर्मिती झाल्याशिवाय बरोजगारांचा प्रश्न निकाली लागणार नाही. त्यासाठी औद्योगिक विकासाची गरज आहे.