शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

दुर्गम,नक्षलग्रस्त भागातील युवकांची रोजगारासाठी भटकंती

By admin | Updated: November 9, 2014 22:33 IST

गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या

केशोरी : गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी/मोर तालुका विस्ताराने मोठा आहे. त्यात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेला केशोरी परिसर. या भागाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे औद्योगिक विकासापासून कोसोदूर जात आहे. औद्योगिक विकास न होण्याला शासनच जवाबदार असलचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे.या परिसरासाठी घोषित झालेल्या योजना कागदोत्रीच मुरत असल्याची नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. या परिसरात औद्योगिक विकासाची कामे न झाल्यामुळे या भागातील नागरिक औद्योगिक विकासाच्या प्रतीक्षेत आजही आहेत. सुशिक्षीत बेरोजगारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. औद्योगिक विकास होण्याकडे त्यांचे लक्ष केंद्रीत झाले असून बरोजगार युवकांची कामाच्या शोधात मोठ्या शहराकडे भटकंती सुरू आहे. हे परिसर नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील असल्याने या परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवावर्ग नक्षलग्रस्त चळवळीकडे वळण्याचे प्रयत्न करू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील लहानमोठे कार्यकर्ते ठेकेदारी क्षेत्रात गुंतलेले आहेत. मात्र औद्योगिक विकासाकडे कोणाचेही लक्ष नाही. लघू उद्योगांतर्गत खासगी मालकीच्या भात गिरण्या व छोटे-मोठे व्यवसाय आहेत. परंतु त्यामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून मॅनपॉवर कमी करून विद्युत बटन दाबण्याच्या प्रकारामुळे मंजूरसंख्या कमी लागत आहे. या प्रकारामुळ दिवसेंदिवस केशोरी परिसरात रोजगाराची समस्या उग्ररूप धारण करू पाहत आहे. या भागत मोहफुलांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यापासून अनेक प्रकारचे साहित्य तयार होऊ शकतात. त्याचबरोबर बेहळा, हिरडा, आवळा यासारख्या महत्त्वाच्या औषधीयुक्त झाडांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे छोटेमोठे उद्योग निर्मितीला वेळ लागणार नाही. या भागाचा औद्योगिक विकास झाल्यास फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची समस्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही. या परिसरात इटियाडोह जलाशय आहे. त्या जलाशयाला धरून विद्युत निर्मिती प्लाँट तयार करण्याचा शासनाने नियोजन केला तर या कामावर अनेक सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळू शकेल. मागील कित्येक दिवसांपासून प्रतागपड हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाले आहे. परंतु अजूनही त्या स्थळाचा विकास झालेला नाही. त्या ठिकाणी मोठ्या उपहारगृहाची तसेच प्रवाशी व पर्यटकांना राहण्याची उत्तम व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. हे स्थळ अजूनही विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते.केशोरी परिसर वनसंपत्तीने व्याप्त आहे. शासनाने वनस्पतीपासून तयार होणाऱ्या औषधींचे कारखाने तयार केल्यास अनेकांच्या हातांना कामे मिळतील व केशोरी परिसराचा औद्योगिक विकास होण्यास विलंब लागणार नाही. माणसाला उपयुक्त असणारे घटक या परिसरात विपूल प्रमाणात आहेत. येथील जंगलात मोहफुले, हिरडा, बेहळा, डिंग, लाटव, टेंभरून, आवळा आदी औषधनिर्मितीत उपयोगी ठरणाऱ्या बाबी मिळत मिळतात. त्यामुळे येथे औषध कारखाने उघडण्याची गरज आहे. या भागात धान व मिरचीशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्न घेतले जात नाही. लागूनच इटियाडोह धरण असूनसुध्दा पुरेशा प्रमाणात सिंंचनाची व्यवस्था नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागतो. सिंंचनाची व्यवस्था करून शेतकऱ्यांना दुसरे उत्पन्न घेण्याचे नियोजन कृषी विभागाने करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या भागातील शेतकरी प्रगतीच्या वाटेवर येवू शकणार नाही. तसेच लहान मोठ्या कारखान्यांची निर्मिती झाल्याशिवाय बरोजगारांचा प्रश्न निकाली लागणार नाही. त्यासाठी औद्योगिक विकासाची गरज आहे.