शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

बिरसी प्रकल्पग्रस्त आठ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:11 IST

तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे आठ वर्षांचा कालावधी लोटूनही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना धोका पत्कारुन जीर्ण घरांमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देजीर्ण घरांमध्ये वास्तव्य : प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष

विजेंद्र मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्क्नखातीया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे आठ वर्षांचा कालावधी लोटूनही पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना धोका पत्कारुन जीर्ण घरांमध्ये वास्तव्य करावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मागील आठ वर्षांपासून बिरसी येथे राहणारे नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहे.मात्र प्रशासनाकडून त्यांना केवळ आश्वासनाचे गाजर दिले जात असल्याचे चित्र आहे. पुनर्वसन होणार असल्याने त्यांना जीर्ण घरांची दुरूस्ती सुध्दा करता येत असून त्याच घरांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. तालुक्यातील बिरसी येथे विमानतळ उभारण्यासाठी भारतीय विमान प्राधिकरणाने या परिसरातील जमिनी संपादित केल्या. येथील गावकऱ्यांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुध्दा सुरू आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच पुनर्वसनासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.मात्र आठ वर्षांचा कालावधी लोटूनही पुनर्वसन करण्यात आले नसल्याने प्रकल्पग्रस्तांतमध्ये रोष व्याप्त आहे.घरे जीर्ण झाली असल्यामुळे अनेकदा त्यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागते. मात्र प्रशासनाकडून प्रक्रिया सुरु असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचे काम सुरू आहे.खात्यात अद्यापही निधी नाहीयेथील प्रकल्पग्रस्तांना घराचे बांधकाम करण्यासाठी शासनाच्या वतीने पुनर्वसन पॅकेज म्हणून ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले. याची यादी ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आली आहे. मात्र अद्यापही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. तर दिवसेंदिवस रेती, विटा, सिमेंटचे लोखंडाचे भाव वाढत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना महागाईचा सुध्दा फटका सहन करावा लागत आहे.बिरसी विमानतळाच्या जमिनीवर काही अनाधिकृत अतिक्रमण आहे. जेव्हापर्यंत ते अतिक्रमण हटविण्यात येत नाही तेव्हापर्यंत पुनर्वसन करणे कठीण आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्राधिकरणातर्फे नोटीस बजाविण्यात आली.-सचिन बी.खंगार, बिरसी विमानतळ संचालक.