शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जव्हारला पावसाची प्रतिक्षा

By admin | Updated: June 23, 2016 02:51 IST

तालुक्यात बहुतांश शेतकऱ्याना पाऊस नसल्यामुळे पेरण्या लांबवाव्या लागल्या आहेत. १०० % आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे

हुसेन मेमन,  जव्हारतालुक्यात बहुतांश शेतकऱ्याना पाऊस नसल्यामुळे पेरण्या लांबवाव्या लागल्या आहेत. १०० % आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे पालन पोषण शेतीवर अवलंबून आहे.दरवर्षा प्रमाणे जव्हार तालुक्यात ६ ते ७ जून च्या दरम्यान पावसाने आगमन होते. त्यामुळे शेतकरी यापूर्वीच जमीनीची नांगरणी, मशागत, खते, बी-बियाणे इत्यादीची खरेदी करून पूर्ण तयारीत असतो, मात्र निर्सगाच्या लहरीपणामुळे यंदा पाऊस जून संपत आला तरी पुरेसा पडलेला नाही त्यामुळे यंदा शेती होणार की नाही? असा प्रश्न पडला आहे. बहुतांश शेतकरी छोट्याखानी आपल्याला पुरेल इतकेच भात व नागली पिक घेत असतात आणि त्याच पिकात वर्षभर आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करीत असतात, परंतू पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातून भाताचे बियाणे खरेदी करावे लागत आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानही होत आहे. भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्हयातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांची पावसा अभावी चिंता वाढत चाललेली आहे. वेळीच पाऊस पडत पसल्यामुळे पेरण्या लाब्ांणीवर जाणार आणि याचा दुष्परीणाम पिक काढते वेळी पडणार आहे, म्हणून शेतीची लागवड करावयाची की नाही? असा गंभीर प्रश्न छोट्या शेतकऱ्यांना पडला आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी बि-बियाणे खरेदी करून ठेवलेले आहेत, परंतू पाऊस नसल्यामुळे बियाणे पडूनच आहे, महिन्या दोन महिन्यापूर्वीच भाव कमी असतांना खरेदी केलेले बियाणे इतक्या उशीरापर्यंत टिकेल की नाही अशीही शंका शेतकऱ्यांना सतावते आहे, त्यामुळे खरेदी केलेले बियाणे फुकट जाते की काय? आणि पुन्हा बियाणे खरेदी करतांना बाजारभाव चढलेला असेल तर तोही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसणार आहे.