शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मोहफुलांवरून बंदी उठविल्याने प्रक्रिया उद्योगाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:28 IST

अर्जुनी माेरगाव : राज्य शासनाने मोहफुुलावरील उत्पादन शुल्क विभागाचे निर्बंध उठविले. त्यामुळे मोहफूल संकलन करून विक्री करणे सोयीचे झाले ...

अर्जुनी माेरगाव : राज्य शासनाने मोहफुुलावरील उत्पादन शुल्क विभागाचे निर्बंध उठविले. त्यामुळे मोहफूल संकलन करून विक्री करणे सोयीचे झाले आहे. यामुळे बाजारपेठ खुली झाली. मोहफुलाला अपेक्षित दर मिळेल व परप्रांतातून चोरीने मोहफूल येणार नाही. यामुळे स्थानिक मोहफूल संकलित करणाऱ्यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळेल. त्यामुळे मोहफूल उपलब्ध असणाऱ्या परिसरात मोहफूल प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील जंगलात व शेताच्या बांधावर अनेक मोहफुलांची झाडे दिसतात. जिल्ह्यातील सालेकसा, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, देवरी या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची झाडे आहेत. यापूर्वी बंदी असल्यामुळे या फुलांची कमी किमतीत विक्री करावी लागत होती. जंगलव्याप्त परिसरात फुलांची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. आदिवासीबांधव फुले जमा करण्याचे काम करतात. त्यांच्याकडून अत्यल्प दरात खरेदी केली जात होती. नाईलाजाने त्यांना कमी किमतीत विक्री करावी लागत होती. दरवर्षी मार्च ते मे दरम्यान वृक्ष बहरतो. एका मोहवृक्षापासून सुमारे ४० ते ५० किलोग्रॅम व मोहफुले प्राप्त होतात. आतापर्यंत दारू गाळप करण्याकरिता मोह फुलांचा उपयोग केला जात होता. परप्रांतातून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती. बाजारपेठ बंद असल्यामुळे काही व्यावसायिकांचे चांगलेच फावत होते. आता बाजारपेठ खुली झाल्याने व मोहफुलांनासुद्धा चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शासनाने या दिशेने पाऊल टाकून मोहफुलावर आधारित उद्योग स्थापन करण्याची गरज आहे.

बॉक्स

मोहफुलाला सुगीचे दिवस

मोहफुलापासून दारू तयार करण्यात येत होती. परंतु मोहफुलाच्या औषधीकरिता पशुखाद्य, शीतपेय, इंधनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात मोहफुलाची मागणी व त्याचा भाव येथे अधिक येणार आहे.

प्रक्रिया उद्योग व संशोधनाची गरज

ऊस, संत्रा, धान्य, द्राक्षे, काजू यापासून दारू तयार केली जाते. त्यांच्या कारखान्यांना शासनाची मान्यता आहे. त्याचप्रमाणे मोहफुलापासून दारू तयार करणे व औषधात वापर होण्याकरिता प्रक्रिया उद्योगाची व त्यावर संशोधन करण्याची गरज आहे. मोहफूल हे औषधीयुक्त असल्यामुळे मोहफूल वृक्ष लागवड चळवळ राबविण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत मिळणार आहे. आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया उद्योग लवकर सुरू होण्याची गरज आहे. आर्थिक विकासाला अधिक चालना मिळेल.