शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे उडाण पुलाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 14, 2014 01:21 IST

गोंदिया राज्य मार्गावर किंडगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक

  यशवंत मानकर आमगाव

आमगाव-गोंदिया राज्य मार्गावर किंडगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित असून जनप्रतिनिधींनी नेहमी याकडे दुर्लक्षितपणा बाळगल्याने नागरिकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. तर प्रतीक्षा केव्हा संपणार याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. आमगाव तालुका हे औद्योगिक व्यवसायाने क्रांतिकारक वाटचाल करीत आहे. बाजारपेठेचा केंद्र असल्याने या ठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमी असते. आमगाव येथील राज्य मार्गावरून सालेकसा, डोंगरगढ तर आमगाव- देवरी ते रायपूर-कलकत्ता हा महामार्ग जोडला गेला आहे. त्यामुळे माल वाहतूक व प्रवासी वाहनांची वर्दळ या मार्गावर सतत असते. परंतु या वाहनांना आमगाव-गोंदिया राज्य मार्गावर असलेल्या किंडगीपार येथील रेल्वे चौकीमुळे प्रत्येक दहा मिनिटाला थांबा घ्यावा लागतो. त्यामुळे आवश्यक असलेली सेवाही प्रभावित होते. या ठिकाणी अनेक वर्षापासून उड्डाण पुलाची मागणी जोर धरत आहे. परंतु जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही समस्या प्रलंबित पडून आहे. किंडगीपार येथील रेल्वे चौकीवर उड्डाण पूल व्हावे यासाठी नागरिकांनी मागणी रेटली आहे. या मागणीला सन २००६ मध्ये रेल्वे विभागाने पुढाकार घेवून सर्वेक्षणही उरकले. परंतु या उड्डाण पुलाचे घोडे कुठे अडले हे सलग सहा वर्षे लोटूनही कुणालाही माहित नाही. या रेल्वे चौकीेला ओलांडून प्रत्येक आढवड्याला दिड ते दोन लाख वाहन मार्गक्रम करतात. परंतु प्रत्येक घडीला रेल्वे मार्गावरील धावत्या गाड्यांमुळे चौकी बंद पडून या ठिकाणी वारंवार वाहनांची कोंडी निर्माण होते. तर वेळेचा अपव्यय ही मोठ्या प्रमाणात होते. या तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्यांसह रेल्वे उड्डाणपुलाची मागणी खा. मारोतराव कोवासे, स्थानिक आ. रामरतन राऊत यांना करण्यात आली. परंतु जनप्रतिनिधींकडून या समस्यांकडे होत असलेला दुर्लक्षितपणा येथील उड्डाण पूल बांधकामाच्या आडी येत आहे. त्यामुळे नागरिकांची या जनप्रतिनिधींमुळे उपेक्षा कायम ठरली आहे. या उड्डाण पुलासह तालुक्याला दुपारी एक प्रवासी वाहतूक गाडी उपलब्ध व्हावी यासाठी सतत संघर्ष सुरू आहे. तर मागणीला प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे रेल्वे समितीलाही रेल्वे विभाग आश्वासनाच्या पलिकडे निर्णय घेताना दिसत नाही. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर अनेक प्रवासी रेल्वे गाड्या धावतात. परंतु सलग सात तास प्रतिक्षा करून प्रवाशांची वाट जोपासावी लागत आहे. या तालुक्याला आमगाव ते नागपूर व नागपूर ते दुर्गपर्यंत दुपारच्या प्रवासी गाड्यांची प्रतिक्षा आहे. एकंदर विकासाची वाटचाल करीत असलेले आमगाव मात्र फक्त वरवरच विकासशील दिसून येत आहे. आत मात्र समस्यांचे अंबार लागले असून त्याकडे जनप्रतिनिधींचेच दुर्लक्ष असल्याचे येथील नागरिकच आता बोलू लागले आहेत. त्यामुळे आमगावसह परिसरातील नागरिकांच्या या मागण्या कोणता विकासाचा महामेरू ठरलेला जनप्रतिनिधी धावून पूर्ण करणार याची प्रतिक्षा नागरिकांना आहे.