शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:19 IST

शेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी यातील घोळ अद्यापही संपलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी बँकाना प्राप्त झाली.

ठळक मुद्दे९२ शेतकऱ्यांचे पैसे मागविले परत : कर्जमाफीचा घोळ कायम

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी यातील घोळ अद्यापही संपलेला नाही. गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी बँकाना प्राप्त झाली. मात्र त्यापैकी केवळ ११ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम झाली असून ८ हजार शेतकऱ्यांना बँकानी अद्यापही प्रतीक्षेत ठेवले आहे.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. यातंर्गत जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी प्राथमिक स्वरुपात कर्जमाफीस पात्र ठरले होते. मात्र त्यानंतर शासनाने कर्जमाफीचा लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळू नये, यासाठी चावडी वाचन आणि कर्जमाफीच्या याद्यांची पडताळणी करण्यासाठी ग्रीन, येलो आणि रेड याद्यांचा निकष लावला. मात्र यानंतरही बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक जुळत नसल्याने यातील घोळ वाढला. परिणामी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला तरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. याद्यांमधील घोळ टाळण्यासाठी मुंबई येथील आयटी विभागाची मदत घेण्यात आली. मात्र या विभागाने कर्जमाफीच्या प्रक्रियेतील गुंता अधिक वाढविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण कर्जमाफीकरिता पात्र ठरलेल्या ७३ हजार शेतकऱ्यांपैकी शासनाने २६८० ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची यादी व त्यासाठी १० कोटी ४२ लाख २९ हजार ३३७ रुपयांचा निधी जिल्हा बँकेला उपलब्ध करुन दिला. त्यानंतर पुन्हा १६ हजार ५३६ ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची दुसरी यादी व ५९ कोटी २६ लाख १५ हजार ५१२ रुपयांचा निधी जिल्हा बँकेला उपलब्ध करुन दिला. एकूण १९ हजार ३३४ शेतकऱ्यांपैकी शनिवार (दि.२) पर्यंत ११ हजार ७१९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. तर ग्रीन यादीतील ८ हजार शेतकºयांना अद्यापही रक्कम जमा होण्याची प्रतीक्षाच आहे.त्या शेतकऱ्याची रक्कम परत मागविलीमुंबई आयटी विभाग आणि शासनाने जिल्ह्यातील ग्रीेन यादीतील शेतकऱ्याची यादी जिल्हा बँकेला पाठविली. त्यासाठी निधी देखील उपलब्ध करुन दिला होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच शासनाने ग्रीन यादीतील त्या ९२ शेतकऱ्याच्या बँक खात्यावर रक्कम जमा न करण्याचे निर्देश जिल्हा बँकेला दिले. तसेच ३४ लाख १३ हजार ४२८ रुपयांची रक्कम सुध्दा शासनाने परत मागविल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली.आता बँक स्तरावर खाते तपासणी मोहीमशेतकरी कर्जमाफीवरुन राज्य सरकार दररोज एक नवीन निकष लावत आहे. आयटी विभागाची मदत घेऊन देखील कर्जमाफीच्या याद्यांमधील घोळ संपलेल्या नाही. त्यामुळे आता शनिवार (दि.२) पासून ग्रीन यादीतील शेतकºयांचे बँक खाते आणि आधार क्रमांक तपासणीची मोहीम सुरू केली आहे.तिसरी यादी येणार मंगळवारीकर्जमाफीकरिता पात्र ठरलेल्या ग्रीन यादीतील शेतकऱ्यांची तिसरी यादी मंगळवारी (दि.५) रोजी येण्याची शक्यता आहे. मात्र बँकाना आधी प्राप्त झालेल्या याद्यांमधील ८ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही रक्कम जमा झालेली नाही. तर तिसऱ्या यादीतील रक्कम केव्हा जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर या सर्व प्रक्रियेमुळे बँकेचे कर्मचारी तणावात असल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांची पायपीट कायमकर्जमाफीची घोषणा होवून चार महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही कर्जमाफीची रक्कम बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. जोपर्यंत खाते शून्य होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नवीन कर्जाची उचल करता येत नाही. यंदा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. मात्र बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना बँकेच्या पायºया झिजवाव्या लागत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी