शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ योजनांना ‘करंट’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:04 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली.

ठळक मुद्देसालेकसा तालुक्यात सर्वाधिक योजना : उन्हाळ्यात पाणी पेटणार

कपिल केकत।आॅनलाईन लोकमतगोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. मात्र पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतरही वीज जोडणी अभावी त्या कार्यान्वीत झालेल्या नाही. जिल्ह्यातील नऊ पाणी पुरवठा योजना ‘करंट’ च्या प्रतीक्षेत असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्प देखील कोरडे पडले आहे. तर डिसेंबर महिन्यातच भूजल पातळी २ मिटरने खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आत्तापासूनच पाणी टंचाईची समस्या भेडसावू लागली आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागू नये, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावात पाण्याची सोय केली जात आहे. यात प्रत्येक गावाला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना देण्यावर शासनाचा भर आहे. गावाची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना असल्यास त्यातूनच गावकºयांना पाण्याचा पुरवठा होईल. त्यांना दुसºया साधनावर अवलंबून राहावे लागणार नाही.यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातंर्गत पाणी पुरवठा योजना उभारण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ३२१ योजना तयार करण्यात आल्या आहेत.या योजनांतून संपूर्ण गावाला पाण्याची सोय केली जाते. मात्र आजही जिल्ह्यातील नऊ पाणी पुरवठा योजना विद्युत जोडणी अभावी केवळ शोभेच्या ठरत आहेत. वीज नसल्यामुळे या योजनांतून पाणी पुरवठा होणे शक्य नाही.दोन तीन महिन्यांवर उन्हाळा असल्याने या योजना कार्यान्वीत करणे गरजेचे आहे. मात्र त्यांना कधी वीज जोडणी मिळते, यावर सर्व काही अवलंबून आहे. तोपर्यंत या गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती कायम राहणार आहे.उन्हाळ्यापूर्वी वीज जोडणीची गरजवीज जोडणी अभावी बंद असलेल्या योजनांत गोंदिया तालुक्यातील तीन, तिरोडा तालुक्यातील एक, आमगाव तालुक्यातील दोन तर सालकेसा तालुक्यातील तीन तीन योजनांचा समावेश आहे. उन्हाळा सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी यंदा पाण्याची टंचाई समस्या गंभीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नळ योजनाच आधार देणार आहे. बंद असलेल्या योजनांना उन्हाळ््यापूर्वीच वीज जोडणी देणे गरजेचे आहे. अन्यथा ग्रामीण भागात पाणी पेटण्याची शक्यता आहे.