शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

जिल्ह्यातील तलावांना स्वच्छता अभियानाची प्रतीक्षा

By admin | Updated: December 31, 2014 23:27 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वात पवित्र गंगा नदीच्या स्वच्छतेचा विडा भारत सरकारने उचलला आहे. त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत गोंदिया नगर परिषद व गोंदिया रेल्वे प्रशासनाने

गोंदिया : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वात पवित्र गंगा नदीच्या स्वच्छतेचा विडा भारत सरकारने उचलला आहे. त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत गोंदिया नगर परिषद व गोंदिया रेल्वे प्रशासनाने शहरांतील सरकारी तलावातील घाण हटविण्याचा प्रयत्न करण्याची मागणी परिसरात जोर धरू लागली आहे. तलावातील जमा झालेल्या घाण पाण्याने नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे.नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले तरच विकास घडून शक्तिशाली राष्ट्र बनू शकतो. यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्यावर २ आॅक्टोबरपासून देशभरात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत प्रत्येक लोकप्रतिनिधींनी एकेक गाव दत्तक घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हातात झाडू घेवून गावांची स्वच्छता केली. तसेच कोट्यवधी रूपये खर्च करुन आता गंगा नदीच्या स्वच्छतेचा विडा भारत सरकारने उचलला आहे. त्याचप्रमाणे गोंदिया नगर परिषद व गोंदिया रेल्वे प्रशासनाने शहरातील सरकारी तलावांची सफाई करण्याचा विडा उचलावा, अशी मागणी सर्व स्वतरावरून करण्यात येत आहे.गोंदिया शहरातील सर्वात जुना सरकारी तलाव रेल्वे रुळाला लागून आहे. या तलावात प्रत्येक ऋतूत पाणी जमा असतो. या तलावातील घाण पाण्याच्या दुर्गंधीने येथून वहिवाट करणाऱ्या नागरिकांना तोंडावर रुमाल बांधून जाण्याव्यतिरिक्त पर्याय उरत नाही. त्याच तलावाच्या किनाऱ्यांवर घरे बांधण्यात आली आहेत. या घाण व दुर्गंधयुक्त पाण्याने परिसरातील आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काहीवेळा या तलावातून अज्ञात मृतदेहदेखील काढण्यात आले आहेत.या तलावाचे सोंदर्यीकरण केले तर गोंदिया न.प. व गोंदिया रेल्वे प्रशासनाला प्रतिवर्र्ष लाखो रुपयांचा कर प्राप्त होऊ शकतो. एवढेच नव्हे तर गोंदिया नगर परिषदेंतर्गत सिव्हिल लाईनमधील मामा चौकात असलेला जुना सरकारी तलाव हा कचऱ्याने तुडूंब भरलेला आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या सौंदर्यीकरणासाठी प्रशासन मागील दोन वर्षांपासून कामाला लागला आहे. मात्र, अद्यापपर्यंत सौंदर्यीकरणाचे काम ठप्प पडले आहे. या तलावातील पाणी दुर्गंधीने व्यापलेले आहे. हे तलाव शहराच्या मधोमध असल्याने शहराच्या सौंदर्यात अडथळा निर्माण करीत आहे. या तलावालादेखील स्वच्छ भारत अभियानाची गरज आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकारी तलावांची सफाई केली तर निश्चितरुपाने या तलावांच्या व शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल, एवढे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)