शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड कार्यक्रमाला प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 23:51 IST

वृक्ष लागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला आता १२ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र नगर परिषदेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही.

ठळक मुद्देन.प.ला १२ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दिष्ट : मंजुरीसाठी कामे अडकली

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वृक्ष लागवड अभियानांतर्गत नगर परिषदेला आता १२ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र नगर परिषदेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नगर परिषदेकडून आता कुठले पाऊल उचलले जाते अथवा प्रशासकीय मंजुरीची वाट बघितली जाते याकडे याकडे लक्ष लागले असून या अभियानावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.घटत चाललेल्या वृक्षांच्या संख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून बदलते वातावरण हे त्याचे सूचक आहेत. अशात पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड हाच त्यावर एकमात्र उपाय आहे. वृक्ष लागवडीचे गांभीर्य लक्षात घेत शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहिम राबविली जात आहे. शासनाने यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत नगर विकास विभागाकडून ‘अ’ वर्ग नगर परिषदांना १२ हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले आहे. यासाठी नगर परिषदेने १.५० कोटींचे अंदाजपत्रक तयार करुन तसा प्रस्ताव लागवड अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. मात्र लागवड अधिकाºयांची नव्हे तर विभागीय वन अधिकाºयांची मंजुरी लागत असल्याने प्रस्ताव विभागीय वन अधिकाºयांकडे पाठविण्यात आला. नगर परिषदेच्या या प्रस्तावाला जून महिन्यात विभागीय वन अधिकाºयांकडून तांत्रीक मंजुरी मिळाली. त्यानंतर आता हा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. अशात प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी पुन्हा किती दिवस लागतात. यावरच हा उपक्रम अवलंबून आहे. विशेष म्हणजे, प्रशासकीय मंजुरीअभावी वृक्ष लागवड कार्यक्रम अडकला आहे. वृक्ष लागवड अभियानांतर्गत खड्डे खोदण्यापासून लावलेल्या रोपट्यांचे पुढील तीन वर्षांसाठी संगोपन असा हा कार्यक्रम असल्याने नगर परिषद एखाद्या संस्थेला हे काम देण्यास इच्छूक आहे. यासाठी निविदा काढावी लागणार असून प्रशासकीय मंजुरी अभावी निविदा काढता येणार नाही.जिल्हाधिकाऱ्यांचे टार्गेट वगळलेवृक्ष लागवड अभियानांतर्गत नगर विकास विभागाकडून नगर परिषदेला १० हजार वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ३५ हजार रोपट्यांची वाढ करून टार्गेट वाढवून दिले होते. दरम्यान विभागीय वन अधिकाऱ्यांसोबत नगर परिषद अधिकाऱ्यांच्ी बैठक झाली ््असता हा विषय मांडण्यात आला. यावर नगर परिषदेला जिल्हाधिकाऱ्यांनी वाढवून दिलेले ३५ हजार रोपट्यांचे टार्गेट वगळण्यात आले. तर यावर फक्त दोन हजार रोपट्यांची वाढ करून हे टार्गेट १२ हजार रोपट्यांचे करण्यात आले आहे.