शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पाण्यासाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:02 IST

शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र या दरम्यान कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचलेच नाही.

ठळक मुद्देमजीप्रा म्हणते पाणी पोहचेल : पुजारीटोलाचे पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र या दरम्यान कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचलेच नाही. आता कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात शहराला नियमित पाणी पुरवठा होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना पुन्हा वेट अ‍ॅन्ड वॉच करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. तर वैनगंगा नदीचे पात्र देखील मार्च महिन्यातच कोरडे पडले.त्याचा शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना केवळ एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र तो देखील नियमित होत नसून पाच ते दहा मिनिटे पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी उशीरा जाग आल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा भर पडली. आठ दिवसांपूर्वी शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडून ते कालव्याव्दारे डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोऱ्याजवळ कालवा फुटल्याने पाणी पोहचण्यास विलंब झाला. त्यानंतर रविवारी (दि.१५) पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले. सध्या स्थितीत धरणातून १०० क्यूसेक पाणी सोडले जात असून हे पाणी डांर्गोलीपर्यंत पोहचण्यास दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुजारीटोला धरणातून सोडलेले पाणी सध्या आमगाव तालुक्यातील सुपलीपारपर्यंत पोहचले आहे. डांर्गोलीपासून हे अंतर ४० कि.मी.असून तिथपर्यंत पाणी पोहचण्यास दोन दिवस लागू शकतो. त्यामुळे शहरवासीयांना किमान दोन तीन दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.सिरपूर व इडियाडोह जलाशयांचे पाणी सोडलेशहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सडक अर्जुनी, तिरोडा, गोरेगाव तालुक्यातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जनावरांना सुध्दा पिण्यासाठी तलाव, बोडयामध्ये पाणी नसल्याने पशुपालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या पाहता सिरपूर जलाशयातून ६६७ क्यूसेक व इडियाडोह जलाशयातून १३० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.