शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:02 IST

शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र या दरम्यान कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचलेच नाही.

ठळक मुद्देमजीप्रा म्हणते पाणी पोहचेल : पुजारीटोलाचे पाणी सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी आठ दिवसांपूर्वी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले होते. मात्र या दरम्यान कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे हे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचलेच नाही. आता कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात शहराला नियमित पाणी पुरवठा होईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना पुन्हा वेट अ‍ॅन्ड वॉच करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्प आणि तलावांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. तर वैनगंगा नदीचे पात्र देखील मार्च महिन्यातच कोरडे पडले.त्याचा शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. मागील महिनाभरापासून शहरवासीयांना केवळ एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र तो देखील नियमित होत नसून पाच ते दहा मिनिटे पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी उशीरा जाग आल्याने पाणी टंचाईच्या समस्येत पुन्हा भर पडली. आठ दिवसांपूर्वी शहरातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणाचे पाणी सोडून ते कालव्याव्दारे डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र सालेकसा तालुक्यातील आंभोऱ्याजवळ कालवा फुटल्याने पाणी पोहचण्यास विलंब झाला. त्यानंतर रविवारी (दि.१५) पुन्हा पुजारीटोला धरणातून पाणी सोडण्यात आले. सध्या स्थितीत धरणातून १०० क्यूसेक पाणी सोडले जात असून हे पाणी डांर्गोलीपर्यंत पोहचण्यास दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पुजारीटोला धरणातून सोडलेले पाणी सध्या आमगाव तालुक्यातील सुपलीपारपर्यंत पोहचले आहे. डांर्गोलीपासून हे अंतर ४० कि.मी.असून तिथपर्यंत पाणी पोहचण्यास दोन दिवस लागू शकतो. त्यामुळे शहरवासीयांना किमान दोन तीन दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.सिरपूर व इडियाडोह जलाशयांचे पाणी सोडलेशहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सडक अर्जुनी, तिरोडा, गोरेगाव तालुक्यातील गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जनावरांना सुध्दा पिण्यासाठी तलाव, बोडयामध्ये पाणी नसल्याने पशुपालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या पाहता सिरपूर जलाशयातून ६६७ क्यूसेक व इडियाडोह जलाशयातून १३० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.