शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

६४ गावांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: July 21, 2014 00:15 IST

आमगाव तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे योग्य नियोजनाअभावी कुचकामी ठरत आहे. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी

यशवंत मानकर - आमगावआमगाव तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे योग्य नियोजनाअभावी कुचकामी ठरत आहे. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकाच्या आरोग्याला धोका आहे. मात्र प्रशासन याकडे पाठ दाखवित आहे.आमगाव तालुक्यात ६४ ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा यासाठी शासन स्तरावर प्रभावी उपाययोजना अंमलात आणत आहेत. परंतु योग्य नियोजनाअभावी योजनांचा योग्य लाभ नागरिकांना मिळत नाही. तालुक्यात १ लाख २० हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्रीय योजना नसल्याने नागरिकांना कासवगतीने चालणारी खंडित पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे.तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गाव पातळीवर जलकुंभ उभारण्यात आले. परंतु या जलकुंभांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आले नाही.नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी शासनाने ४८ गावांची बनगाव प्रादेश्कि पाणी पुरवठा योजना नागरिकांच्या पदरी घालण्यात आली. परंतु योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी यांनी योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे ही योजना खंडीतपणे सुरू राहीली. यात नागरिकांना या योजनेने शुद्ध पाण्यासाठी घाम गाळण्यास भाग पाडले. योजनेवरील खर्च व मिळणारा निधी अपूर्ण असल्याने ही योजना अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या योजनेत समाविष्ठ ४८ गावांपैकी फक्त २६ गावे पाण्याचा उपभोग घेत आहे. परंतु निरंतर व जलशुद्ध देण्यासाठी ही योजना यशस्वी न ठरल्याने २२ गावांनी यातून माघार घेतली. या योजनेचे पाणी पुरवठा खंडित होते. दुरुस्ती अभावी अशुद्ध पाणी पुरवठा हे या योजनेचे मुख्य कारण आहे.आमगावसह ३७ गावांतील पाणी पूर्ततेसाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने नियंत्रण स्वत:कडे ठवले आहे. परंतु या गावांमध्ये शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासन स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालता आली नाही. तालुक्यात जुनीच जल वाहिनींच्या माध्यमाने आजही पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दुरुस्ती अभावी व निरंतर खोदकामांमुळे अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे नागरिकांना मिळणारा पाणी घाणीच्या स्वरुपात मिळतो. गाव पातळीवर असलेली जलकुंभात नदी, नाले पात्रातील जलपुरवठ्यावरुन सरळ जलकुंभात पाण्याचे साठवण करण्यात येते. तेच पाणी शुद्धीकरण न करता सरळ नागरिकांना पुरवठा केला जातो. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी दुसऱ्या स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ग्रामपंचायतच्या सहकार्याने नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी कोणतीच केंद्रीय योजना हाती घेतली नाही. प्राधिकरणाच्या योजना स्वत:कडे घेऊन त्या योजनांची विल्हेवाट लावण्याचे कार्य पुढे केले. त्यामुळे या योजनाही अखेरची घरघर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज शुद्ध पाणी मिळण्याऐवजी खंडित व अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास सदर विभाग हतबल ठरला आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील २६ गावे तर आमगावसह ३७ स्वतंत्र पाणी पुरवठा योजना गावपातळीवर शुद्ध पाणी पुर्ततेसाठी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. पावसाळ्यात पूर्तता होणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी आहे.