शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

कोलांटउड्या घेणाऱ्यांना मतदारांनी नाकारले

By admin | Updated: October 20, 2014 23:14 IST

जिल्ह्यात यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही विधानसभा मतदार संघात मोठी चुरस पहायला मिळाली. अनेक वर्षापासूनची युती आणि आघाडी एकाचवेळी तुटल्यानंतर सर्वांनी आपापल्या पक्षाची

रात्रीतून बदलविला पक्ष : एकाही उमेदवाराला विजयश्री नाहीगोंदिया : जिल्ह्यात यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही विधानसभा मतदार संघात मोठी चुरस पहायला मिळाली. अनेक वर्षापासूनची युती आणि आघाडी एकाचवेळी तुटल्यानंतर सर्वांनी आपापल्या पक्षाची ताकद आजमावून पाहिली. परंतू अनपेक्षितपणे झालेल्या घडामोडींमुळे बेसावध असलेल्या पक्षांना ऐनवेळी योग्य उमेदवार मिळणे कठीण झाल्याने दुसऱ्या पक्षातील असंतुष्टांना आयात करावे लागले. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या घेणाऱ्या अशा आयारामांना मतदारांनी मात्र स्पष्टपणे नाकारले आहे.यावेळी चारही मतदार संघांमध्ये पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी भारतीय जनता पक्षात होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश पाहता यावेळी विजयाची संधी आहे हे हेरून भाजपात इच्छुकांची गर्दी प्रत्येक मतदार संघातच होती. मात्र गोंदियात खुलेआमपणे पुढे येऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची हिंमत कोणत्याही पदाधिकाऱ्याने केली नाही. शिवाय इतर पक्षात जाऊन तिकीट मिळण्याची संधीही नव्हती. मात्र तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या मतदार संघांमध्ये मात्र भाजपमधील असंतुष्टांनी अगदी रात्रीतून शिवसेनेचा तंबू गाठत त्या पक्षाचे तिकीट मिळविले. त्यात तिरोडा मतदार संघातून आतापर्यंत भाजपशी एकनिष्ठ असलेले, माजी जि.प.उपाध्यक्ष राहिलेले पंचम बिसेन, अर्जुनी मोरगाव मतदार संघात पाच वर्षापूर्वी भाजपवासी झालेल्या जि.प.सदस्य किरण मेश्राम, तर देवरी मतदार संघात भाजपच्या आदिवासी आघाडीचे महामंत्री असलेले मुलचंद गावराने यांनी शिवसेनेच्या तिकीटवर नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर भाजपचे गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेले रमेश ताराम यांनी आपले तिकीट कटताच राष्ट्रवादी काँग्रेसचा तंबू गाठत तिकीट पदरी पाडून घेतले. परंतू या एकाही आयारामांना मतदारांनी साथ दिली नाही.रात्रीतून पक्षबदल करून दुसऱ्या पक्षाच्या नावावर निवडणूक लढणाऱ्या या चारही उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते घेतली ती देवरी मतदार संघात राष्ट्रवादीच्या तिकीटवर लढलेले रमेश ताराम यांनी. त्यांना ३५ हजार ९११ मते मिळाली. तरीही त्यांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले. मात्र शिवसेनेच्या तिकीटवर लढणाऱ्या इतर उमेदवारांना अपेक्षित मतेही मिळाली नाहीत. किरण कांबळे यांना १५ हजार ३३६ मतांसह चौथे स्थान, पंचम बिसेन यांना ११ हजार ९७८ मतांसह पाचवे स्थान, तर मुलचंद गावराने यांना ९ हजार १७४ मतांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. (जिल्हा प्रतिनिधी)