शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मतदार हा लोकशाहीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:28 IST

मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी (दि.२५) आयोजित कार्यक्र मात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी भु-संपादन राहुल खांडेभराड, उपविभागीय अधिकारी देवरी रविंद्र राठोड, उपविभागीय अधिकारी तिरोडा गंगाधर तलपाळे, तहसीलदार राहुल सारंग, जिल्हा नियोजन अधिकारी मृणाली भूत, सहायक अधीक्षक राजेन्द्र पटले, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर उपस्थित होते.बलकवडे म्हणाल्या, मतदारांच्या विविध शंका, प्रश्न, अडी-अडचणी मार्गी लावण्याकरीता १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. कार्यालयीन दिवशी कामकाजाच्या वेळेवर या क्र मांकावर फोन करु न मतदारांनी आपल्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले. हा क्र मांक १९५० टोल फ्री असून बी.एस.एन.एल लँंडलाईन, बी.एस.एन.एल मोबाईल, आयडीया, व्होडाफोन या आपरेटर यांना निशुल्क करण्यात आला आहे. लवकरच इतर मोबाईलधारकांना ही सुविधा उपलब्ध करु न देण्यात येईल. मतदारांनी तहसील कार्यालय, बी.एल.ओ या संकेत स्थळावर भेट देऊन घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोंदिया तालुक्यात प्रभात फेरी काढुन संदेश देण्यात आला. त्यांनतर इंदिरा गांधी स्टेडीयम येथे उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, प्रश्नमंच, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध स्पर्धेत प्रथम, द्वीतीय व तृतीय क्र मांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.या कार्यक्रमात सुभाष बहुउद्देशीय विकास संस्था चिखली या कलापथकाच्या माध्यमातून जागरुक मतदार नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजन चौबे यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी