शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मतदार हा लोकशाहीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:28 IST

मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी (दि.२५) आयोजित कार्यक्र मात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी भु-संपादन राहुल खांडेभराड, उपविभागीय अधिकारी देवरी रविंद्र राठोड, उपविभागीय अधिकारी तिरोडा गंगाधर तलपाळे, तहसीलदार राहुल सारंग, जिल्हा नियोजन अधिकारी मृणाली भूत, सहायक अधीक्षक राजेन्द्र पटले, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर उपस्थित होते.बलकवडे म्हणाल्या, मतदारांच्या विविध शंका, प्रश्न, अडी-अडचणी मार्गी लावण्याकरीता १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. कार्यालयीन दिवशी कामकाजाच्या वेळेवर या क्र मांकावर फोन करु न मतदारांनी आपल्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले. हा क्र मांक १९५० टोल फ्री असून बी.एस.एन.एल लँंडलाईन, बी.एस.एन.एल मोबाईल, आयडीया, व्होडाफोन या आपरेटर यांना निशुल्क करण्यात आला आहे. लवकरच इतर मोबाईलधारकांना ही सुविधा उपलब्ध करु न देण्यात येईल. मतदारांनी तहसील कार्यालय, बी.एल.ओ या संकेत स्थळावर भेट देऊन घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोंदिया तालुक्यात प्रभात फेरी काढुन संदेश देण्यात आला. त्यांनतर इंदिरा गांधी स्टेडीयम येथे उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, प्रश्नमंच, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध स्पर्धेत प्रथम, द्वीतीय व तृतीय क्र मांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.या कार्यक्रमात सुभाष बहुउद्देशीय विकास संस्था चिखली या कलापथकाच्या माध्यमातून जागरुक मतदार नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजन चौबे यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी