शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मतदार हा लोकशाहीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:28 IST

मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी (दि.२५) आयोजित कार्यक्र मात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी भु-संपादन राहुल खांडेभराड, उपविभागीय अधिकारी देवरी रविंद्र राठोड, उपविभागीय अधिकारी तिरोडा गंगाधर तलपाळे, तहसीलदार राहुल सारंग, जिल्हा नियोजन अधिकारी मृणाली भूत, सहायक अधीक्षक राजेन्द्र पटले, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर उपस्थित होते.बलकवडे म्हणाल्या, मतदारांच्या विविध शंका, प्रश्न, अडी-अडचणी मार्गी लावण्याकरीता १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. कार्यालयीन दिवशी कामकाजाच्या वेळेवर या क्र मांकावर फोन करु न मतदारांनी आपल्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले. हा क्र मांक १९५० टोल फ्री असून बी.एस.एन.एल लँंडलाईन, बी.एस.एन.एल मोबाईल, आयडीया, व्होडाफोन या आपरेटर यांना निशुल्क करण्यात आला आहे. लवकरच इतर मोबाईलधारकांना ही सुविधा उपलब्ध करु न देण्यात येईल. मतदारांनी तहसील कार्यालय, बी.एल.ओ या संकेत स्थळावर भेट देऊन घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोंदिया तालुक्यात प्रभात फेरी काढुन संदेश देण्यात आला. त्यांनतर इंदिरा गांधी स्टेडीयम येथे उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, प्रश्नमंच, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध स्पर्धेत प्रथम, द्वीतीय व तृतीय क्र मांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.या कार्यक्रमात सुभाष बहुउद्देशीय विकास संस्था चिखली या कलापथकाच्या माध्यमातून जागरुक मतदार नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजन चौबे यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी