शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

संततधार पावसाने गावे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी (दि.२९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सिंचन प्रकल्प आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील गावांना बसला आहे.

ठळक मुद्देडांगोर्ली, कोरणी, कासात मदत कार्य सुरु: आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू दाखल : नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला, रामाटोला, चांदोरी खुर्द गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आली आहे. वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.बुधवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारी सकाळपर्यंत कायम होता. तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी (दि.२९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सिंचन प्रकल्प आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील गावांना बसला आहे. डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आले आहे. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने बाघ आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. डांर्गोली आणि कोरणी, कासा, पुजारीटोला या गावातील अर्धी घरे पाण्याखाली आली होती. ग्रामपंचायत आणि शाळांमध्ये सुध्दा पाणी साचले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना दुसरीकडे पावसाने कहर केल्याने नागरिकांवर नैसर्गिक आणि कृत्रिम संकट ओढावले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने डांर्गोली, काटी, कोरणी, ढिवरटोला या गावांमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. कोरणी येथील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरक्षित स्थळी हलविले. तर ढिवरटोला येथील १४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमूने मदत कार्य सुरू केले होते.२४ महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात मागील चौवीस तासात २५२४.२० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ७६.४३ मिमी पाऊस पडला. तर ३३ महसूल मंडळापैकी २४ महसूल मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर