शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने गावे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी (दि.२९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सिंचन प्रकल्प आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील गावांना बसला आहे.

ठळक मुद्देडांगोर्ली, कोरणी, कासात मदत कार्य सुरु: आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू दाखल : नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोंदिया तालुक्यातील डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला, रामाटोला, चांदोरी खुर्द गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आली आहे. वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.बुधवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारी सकाळपर्यंत कायम होता. तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी (दि.२९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे सिंचन प्रकल्प आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील गावांना बसला आहे. डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राम्हणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आले आहे. बाघ इटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडल्याने बाघ आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. डांर्गोली आणि कोरणी, कासा, पुजारीटोला या गावातील अर्धी घरे पाण्याखाली आली होती. ग्रामपंचायत आणि शाळांमध्ये सुध्दा पाणी साचले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना दुसरीकडे पावसाने कहर केल्याने नागरिकांवर नैसर्गिक आणि कृत्रिम संकट ओढावले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने डांर्गोली, काटी, कोरणी, ढिवरटोला या गावांमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. कोरणी येथील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरक्षित स्थळी हलविले. तर ढिवरटोला येथील १४० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमूने मदत कार्य सुरू केले होते.२४ महसूल मंडळात अतिवृष्टीजिल्ह्यात मागील चौवीस तासात २५२४.२० मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरी ७६.४३ मिमी पाऊस पडला. तर ३३ महसूल मंडळापैकी २४ महसूल मंडळात ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर