शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वैनगंगा नदीच्या पुरामुळे 'ती' गावे अद्यापही पाण्याखालीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 13:26 IST

मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी या गावांना पुराचा वेढा कायम आहे.

गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही तालुक्यांतील २० गावे शुक्रवारपासून पाण्याखालीच आहे. रविवारी (दि.३०) सुद्धा ही गावे पाण्याखालीच होती. मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी या गावांना पुराचा वेढा कायम आहे.गोंदिया तालुक्यातील डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राह्मणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला तर तिरोडा तालुक्यांतील रामाटोला, धापेवाडा, ढिवरटोला, चांदोरी खुर्द या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आले आहे.चांदोरी खुर्द येथील मुलचंद भोयर, रवी भोयर, हरिश्चंद्र भोयर, बिसन सोनेवाने, किसन सोनेवाने, रुपलाल जमईवार, तिलकसाव जमईवार, दिलीप भगत, गिरधारी, जमईवार, डुलीचंद तुंबा, मुना तुंबा, भिवराम तुंबा, कालुतुंबा, भरत तुंबा यांच्या घरांमध्ये पाणी साचले होते. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या गावांमधील पूरपरिस्थिती कायम आहे. तर काही गावातील नागरिकांनी आपल्या घरांच्या छतावर आश्रय घेतला होता. गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चम्मूने पुराचा वेढा असलेल्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य रविवारी सकाळपासूनच सुरू केले.