शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

शालेय विद्यार्थ्यांवर गावाच्या कारभाराची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 21:52 IST

शालेय विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मतदान घेवून शालेय मंत्रिमंडळ गठीत केले जात आहे. याच धर्तीवर एक दिवसाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा कारभार हाकण्याची जबाबदारी चक्क शालेय विद्यार्थ्यावर सोपविण्याचा उपक्रम देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायने राबविला.

ठळक मुद्देओवारा ग्रामपंचायत अभिनव उपक्रम। निर्णयाची अंमलबजावणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मतदान घेवून शालेय मंत्रिमंडळ गठीत केले जात आहे. याच धर्तीवर एक दिवसाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा कारभार हाकण्याची जबाबदारी चक्क शालेय विद्यार्थ्यावर सोपविण्याचा उपक्रम देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायने राबविला. असा अनोखा प्रयोग राबविणारी कदाचित ओवारा ग्रामपंचायत राज्यातील एकमेव ग्रामपंचायत असावी.ग्रामीण भागाचा कारभार हाकण्याची जबाबदारी ही त्या गावच्या ग्रामपंचायतीवर असते.यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची निवड केली जाते. लोकप्रतिनिधींवर गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावाचा विकास करण्याची जबाबदारी असते. मात्र, स्थानिक राजकारणामुळे या लोकनियुक्त प्रतिनिधींना बरेचदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम गावातील विकास कामांवर होत असतो. राज्यघटनेत ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावाच्या विकासाचा आराखडा हा लोकांच्या सहमतीने ग्रामसभेत मंजूर केला जातो. मात्र, आज देखील ग्रामीण भागात ग्रामसभांना लोकांची उपस्थिती फार कमी असते. यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे ओवारा येथील उपसरपंच कमल येरणे यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना हा अनुभव येण्यासाठी गावचे सरपंच हिरामन टेकाम यांच्यासह सह सर्व सदस्यांनी प्रस्ताव पारीत करून एक दिवसाचा कारभार हा शालेय विद्यार्थ्यांवर सोपवून त्यांच्यामध्ये ग्राम विकासाची जाणीव निर्माण करून विकास कामात येणाºया अडचणी आणि गावाचा कारभार कसा चालवायचा याची माहिती दिली.एकाच दिवसात अनेक प्रस्ताव पारितया नवनियुक्त शालेय लोकप्रतिनिधींनी २४ जुलैला एक दिवस ग्रामपंचायतचा कारभार सांभाळला. सरपंच निलेश कोडवते, उपसरपंच साक्षी बिसेन यांनी सर्व सदस्यांनी गावाची संपूर्ण पाहणी केली. यानंतर झालेल्या सभेत गावातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. सभेत पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, ग्रामीणांचे आरोग्य, रस्ते विकास, सांडपाण्याची विल्हेवाट, गटारे आदी विषयांवर अनेक प्रस्ताव पारित केले.निवडणूक घेऊन निवडगावाचा कारभारा एक दिवस विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासाठी आणि सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची निवड ही लोकशाही पध्दतीने शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक घेऊन घेण्यात आला. यामध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. निवडणुकीत सरपंच म्हणून निलेश कोडवते,उपसरंपच म्हणून साक्षी बिसेन या निवडून आल्या. सदस्यांमध्ये प्रेरणा मेश्राम, सोनल खरवडे, प्रशांत गजभिये, दिनेश तुरकर, मनिषा भिमटे, संध्या टेकाम, सोहीत ऊईके आणि दुर्गा बिसेन हे विद्यार्थी विजयी झाले.निर्णयांची करणार अंमलबजावणीओवाराचे सरपंच हिरामन टेकाम व उपसरपंच कमल येरणे यांनी एक दिवसाच्या कार्यकारिणीने गावाच्या विकासासंदर्भात घेतलेल्या अनेक विधायक निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन ओवारवासीयांना दिले. या अभिनव उपक्र माचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीgram panchayatग्राम पंचायत