शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

शालेय विद्यार्थ्यांवर गावाच्या कारभाराची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 21:52 IST

शालेय विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मतदान घेवून शालेय मंत्रिमंडळ गठीत केले जात आहे. याच धर्तीवर एक दिवसाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा कारभार हाकण्याची जबाबदारी चक्क शालेय विद्यार्थ्यावर सोपविण्याचा उपक्रम देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायने राबविला.

ठळक मुद्देओवारा ग्रामपंचायत अभिनव उपक्रम। निर्णयाची अंमलबजावणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी प्रत्येक शाळांमध्ये मतदान घेवून शालेय मंत्रिमंडळ गठीत केले जात आहे. याच धर्तीवर एक दिवसाचा सरपंच आणि ग्रामपंचायतचा कारभार हाकण्याची जबाबदारी चक्क शालेय विद्यार्थ्यावर सोपविण्याचा उपक्रम देवरी तालुक्यातील ओवारा ग्रामपंचायने राबविला. असा अनोखा प्रयोग राबविणारी कदाचित ओवारा ग्रामपंचायत राज्यातील एकमेव ग्रामपंचायत असावी.ग्रामीण भागाचा कारभार हाकण्याची जबाबदारी ही त्या गावच्या ग्रामपंचायतीवर असते.यासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची निवड केली जाते. लोकप्रतिनिधींवर गावकऱ्यांना विश्वासात घेऊन गावाचा विकास करण्याची जबाबदारी असते. मात्र, स्थानिक राजकारणामुळे या लोकनियुक्त प्रतिनिधींना बरेचदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम गावातील विकास कामांवर होत असतो. राज्यघटनेत ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावाच्या विकासाचा आराखडा हा लोकांच्या सहमतीने ग्रामसभेत मंजूर केला जातो. मात्र, आज देखील ग्रामीण भागात ग्रामसभांना लोकांची उपस्थिती फार कमी असते. यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे ओवारा येथील उपसरपंच कमल येरणे यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना हा अनुभव येण्यासाठी गावचे सरपंच हिरामन टेकाम यांच्यासह सह सर्व सदस्यांनी प्रस्ताव पारीत करून एक दिवसाचा कारभार हा शालेय विद्यार्थ्यांवर सोपवून त्यांच्यामध्ये ग्राम विकासाची जाणीव निर्माण करून विकास कामात येणाºया अडचणी आणि गावाचा कारभार कसा चालवायचा याची माहिती दिली.एकाच दिवसात अनेक प्रस्ताव पारितया नवनियुक्त शालेय लोकप्रतिनिधींनी २४ जुलैला एक दिवस ग्रामपंचायतचा कारभार सांभाळला. सरपंच निलेश कोडवते, उपसरपंच साक्षी बिसेन यांनी सर्व सदस्यांनी गावाची संपूर्ण पाहणी केली. यानंतर झालेल्या सभेत गावातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. सभेत पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, ग्रामीणांचे आरोग्य, रस्ते विकास, सांडपाण्याची विल्हेवाट, गटारे आदी विषयांवर अनेक प्रस्ताव पारित केले.निवडणूक घेऊन निवडगावाचा कारभारा एक दिवस विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासाठी आणि सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची निवड ही लोकशाही पध्दतीने शालेय विद्यार्थ्यांची निवडणूक घेऊन घेण्यात आला. यामध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. निवडणुकीत सरपंच म्हणून निलेश कोडवते,उपसरंपच म्हणून साक्षी बिसेन या निवडून आल्या. सदस्यांमध्ये प्रेरणा मेश्राम, सोनल खरवडे, प्रशांत गजभिये, दिनेश तुरकर, मनिषा भिमटे, संध्या टेकाम, सोहीत ऊईके आणि दुर्गा बिसेन हे विद्यार्थी विजयी झाले.निर्णयांची करणार अंमलबजावणीओवाराचे सरपंच हिरामन टेकाम व उपसरपंच कमल येरणे यांनी एक दिवसाच्या कार्यकारिणीने गावाच्या विकासासंदर्भात घेतलेल्या अनेक विधायक निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन ओवारवासीयांना दिले. या अभिनव उपक्र माचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीgram panchayatग्राम पंचायत