शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

११४ गावांत विकास शांती यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:26 IST

जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त ११४ गावांत जिल्हा पोलिसांकडून २४ ते २७ जुलैदरम्यान विकास शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी जनतेशी समन्वय : नक्षलवाद्यांच्या कृत्यांना आळा घालणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त ११४ गावांत जिल्हा पोलिसांकडून २४ ते २७ जुलैदरम्यान विकास शांती यात्रा सुरू करण्यात आली आहे. नक्षल शहीद सप्ताहाच्या पूर्वी चार दिवस विकास शांती यात्रा जिल्ह्यातील नक्षलग्रस्त असलेल्या गावांत भ्रमण करणार आहे.जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त गावांत नक्षलवाद्यांना गावबंदी करण्यासाठी पोलीस विभागाची योजना आहे. या नक्षलग्रस्त गावातील जनता भयमुक्त रहावी, यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी त्यांना विकासाच्या मार्गावर नेण्याचा संकल्प केला आहे. आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य पोलीस विभाग करीत आहे. आदिवासी तरूणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे, व्यायाम शाळा व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना, वृध्दांना श्रावण बाळ योजनेचा लाभ या यात्रेच्या माध्यमातून दिला जाणार आहे.या शांतीयात्रेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहेत. गावागावातील महात्मा गांधी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या प्रत्येक कामात सहकार्य करण्याची भूमिका ठेवली.गोंदिया जिल्ह्यातील ११४ पैकी ४८ ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेने नक्षलवाद्यांना आपल्या गावात बंदी करून विकासात्मक कार्याचे पाऊल उचचले. उर्वरित ६६ गावांत नक्षलवाद्यांना बंदी करण्यासाठी पोलीस विभागाने विकास शांती यात्रा सुरू केली आहे.जिल्ह्यातील शंभर टक्के गावांत नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा मानस बांधून त्या दिशेने नक्षल शहीद सप्ताहाच्या पूर्वी म्हणजेच २४ ते २७ जुलै या कालावधीत नक्षलग्रस्त गावात विकास शांती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत जि.प., पं.स., सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पाटबंधारे, महिला आर्थिक विकास महामंडळ अशा शासनाच्या सर्व विभागांचा सहभाग होता.गणूटोला एओपी अंतर्गत येणाºया या गावात स्वत: पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी विकास शांती यात्रेत सहभाग घेतला.इतर पोलीस अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले होते.