शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

कोरोनाचा प्रकोपाचा शेतकरी ठरतोय बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 5:00 AM

गोंदिया जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी शेतकरी काही गुंठ्यात नगदी पिके घेतात. वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, चवळी, कोबी ही भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतली जातात. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. मात्र यावर्षी नेमक्या याच काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. विवाह सोहळे रद्द करावे लागले. अनेकांनी भाजीपाल्याची मागणी नोंदवली होती.संचारबंदीमुळे घराबाहेर निघून बाजारात एवढा उत्पादित भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. अशातच उभ्या झाडावरच वांगी पिकली. अखेर हेमने या शेतकºयाला सुमारे ६ क्विंटल वांगी फेकून द्यावी लागली.कोरोनाचा यापद्धतीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देविवाह समारंभ रद्द झाल्याने वांगी फेकली । मोठे आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वांगी हे नगदी पीक आहे. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. काही आॅर्डर पण घेतले. मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे विवाह समारंभ रद्द झाले. प्रतीक्षा करता करता वांगी झाडावरच पिकली. अन अखेर ती शेताबाहेर फेकून देण्याची वेळ बाकटी येथील भास्कर हेमने या शेतकऱ्यावर आली.गोंदिया जिल्ह्यात धान हे मुख्य पीक आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार करता यावेत, यासाठी शेतकरी काही गुंठ्यात नगदी पिके घेतात. वांगी, मिरची, टमाटर, भेंडी, चवळी, कोबी ही भाजीपाल्यासारखी नगदी पिके घेतली जातात. लग्नसराईत प्रचंड मागणी असते. मात्र यावर्षी नेमक्या याच काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला.विवाह सोहळे रद्द करावे लागले. अनेकांनी भाजीपाल्याची मागणी नोंदवली होती.संचारबंदीमुळे घराबाहेर निघून बाजारात एवढा उत्पादित भाजीपाला विकणे शक्य झाले नाही. अशातच उभ्या झाडावरच वांगी पिकली. अखेर हेमने या शेतकºयाला सुमारे ६ क्विंटल वांगी फेकून द्यावी लागली.कोरोनाचा यापद्धतीने शेतकऱ्यांना फटका बसत आहे.हेमने यांनी दोन एकर शेतीत टमाटर, वांगी व मिरची पिकांची लागवड केली आहे. या पिकाचे काय होणार या विवंचनेत ते अडकले आहेत. शेतकरी मोठा असो की लहान,शेती कोरडवाहू असो की बागायती. शेतात धान असो की भाजीपाला. आज जिल्ह्यातील एकही शेतकरी विवंचनेतून सुटलेला नाही. शेतकºयांच्या नशिबात काय लिहिले आहे तेच कळत नाही. काल परवापर्यंत हाच शेतकरी खुश होता. मात्र कोरोनासारखे संकट घोंगावेल व आपली अशी दैना होईल असे या शेतकºयाला वाटले नव्हते.या भाजीपाला पिकविणाºया शेतकºयांचे हाल आहेत. कधी कधी त्याने बाजारात माल आणण्यासाठी खर्च केलेल्या भाड्याचेही पैसे त्याला माल विकून मिळत नाही. अशाही अवस्थेत शेतकरी कसाबसा उत्पादन घेतो.त्यातही असे येणारे विघ्न शेतकºयांचे कंबरडे मोडतात हे नक्की.यंदा खरीप आणि रब्बी हंगामात शेतकरी सातत्याने नैसर्गिक संकटाला तोंड देत आहे. नैसर्गिक संकटातून सावरत असतानाच शेतकºयांना आता कोरोनारुपी संकटाला तोंड द्यावे लागत असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :agricultureशेती