शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

रमा ग्रामसंघाच्या वतीने गांडूळखत निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:22 IST

बोंडगावदेवी : आजघडीला प्रत्येक क्षेत्रात महिला वर्ग आघाडीवर दिसत आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यात महिला वर्गाला कुणीही अडवू शकत ...

बोंडगावदेवी : आजघडीला प्रत्येक क्षेत्रात महिला वर्ग आघाडीवर दिसत आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यात महिला वर्गाला कुणीही अडवू शकत नाही. याचा प्रत्यय तालुक्यातील चान्ना (बाक्टी) येथील रमा ग्रामसंघाच्या सहभागी महिलांनी गावात गांडूळखत निर्मिती प्रकल्प उभारून प्रत्यक्षात आणून दाखविला.

तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अर्जुनी-मोरगाव, स्वराज प्रभाग संघ बोंडगावदेवीअंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत चान्ना या गावामध्ये २०१६ मध्ये रमा ग्रामसंघाची निर्मिती करण्यात आली. ग्रामसंघात २८ महिला बचत गट संलग्न असून, ३०५ महिलांचा सहभाग आहे. ग्रामीण भागातील महिला स्वयंस्फूर्त होऊन त्यांचा जीवनस्तर उंचावा गावामध्ये रोजगार मिळाला. महिलांच्या हातामध्ये कारभार देऊन संघाच्या माध्यमातून उद्योग निर्मिती होऊन कुटुंबाच्या चरितार्थास हातभार लागावा, महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. सेंद्रिय शेतीला चालना मिळावी म्हणून राष्ट्रीय आर्थिक परिवर्तन प्रकल्पच्या माध्यमातून शेतकरी महिलांचे सेंद्रिय शेतीचे गट तयार करण्यात आले. महिलांनी सेंद्रिय शेती करण्यास पुढाकार घ्यावा यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत तालुक्यात सेंद्रिय गटाची स्थापना करण्यात आली. ग्रामसंघाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. चान्ना येथील रमा ग्रामसंघाने गांडूळखत निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा मनोमन चंग बांधला.

......

ग्रामपंचायतीने दिले शेड तयार करून

ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत गांडूळखत निर्मिती प्रकल्प शेड गावाबाहेर बांधण्यात आले. ग्रामसंघाने ग्रामपंचायतीला गांडूळखत निर्मितीसाठी शेडची मागणी केली. ग्रामसंघाच्या महिलांची दृढ इच्छा पाहून ग्रामपंचायतीने शेड उपलब्ध करून दिले. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाची गटाकडून सभासद शुल्काच्या स्वरूपातून उभारणी करण्यात आली.

...........

...अशी होतेय गांडूळ निर्मिती

गांडूळखताला लागणारा सर्व कच्चा माल गावामधून खरेदी केला. शेणखत, पालापाचोळा मोठ्या प्रमाणात मिळाला. उच्चप्रतीचे गांडूळ जमा करून शेणखतामध्ये मिसळवले. आवश्यकतेनुसार वेळोवेळी गांडुळांना पाणीपुरवठा केला. गांडूळखत तयार होण्याचा कालावधी ४० ते ५० दिवसांचा असतो. एका फेरीला दहा हजार रुपये खर्च येतो. ५ ते ६ टन खत निर्माण होतो. गांडुळांची संख्याही वाढते. खत विक्री केल्यानंतर संपूर्ण खर्च वजा केला असता २५ हजार शुद्ध नफा ग्रामसंघाला मिळतो.

.....

गांडूळखतातून रोजगार निर्मिती

महिला ग्रामसंघाच्या वतीने निर्मिती केलेले गांडूळखत शनिवार विक्रीसाठी लाखांदूर तालुक्यात पोहोचविण्यात आले. याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक रेशीम नेवारे, शहारे, भेंडारकर, रिता दडमल, बोंडगावदेवी प्रभागाच्या प्रभारी व्यवस्थापक अर्चना रामटेके, ग्रामसंघाच्या सरिता रामटेके, निर्मला मरस्कोल्हे, मंगला शेंडे, आशा फुंडे, सविता राखडे, शीला लोगडे, संगीता गायकवाड, हेमलता सोनवाने, श्वेता डोंगरवार, चित्रकला शेंडे, सत्यफुला फुंडे इत्यादी पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.