शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

इटखेडा येथील सरपंचाविरूद्धचा निर्णय वैध

By admin | Updated: May 7, 2014 18:44 IST

इटखेडा येथील सरपंच जनार्धन मेश्राम यांचेवर सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला. याविरूध्द त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांचेकडे विवाद अर्ज दाखल केला.

 अर्जुनी/मोरगाव : इटखेडा येथील सरपंच जनार्धन मेश्राम यांचेवर सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला. याविरूध्द त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांचेकडे विवाद अर्ज दाखल केला. हा अर्ज फेटाळण्यात आला असून इटखेडा येथील सरपंचाविरूध्द पारित अविश्वास ठराव व घोषीत निर्णय वैध ठरविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार इटखेडा/इसापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २१ आॅक्टो. २०१२ रोजी झाली. या ग्रामपंचायतमध्ये ९ सदस्य आहेत.

सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदावर जनार्धन मेश्राम हे निवडून आले. ते गावाबाहेर असतांना २४ फेब्रु. रोजी त्यांचे गैरहजेरीत इतर ८ सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. तत्पूर्वी १७ फेब्रु.रोजी सरपंच विरूध्द अविश्वास प्रस्तावाची नोटीस इतर सदस्यांनी तहसीलदारांना दिली होती. तहसीलदार संतोष महाले यांनी १८ फेब्रु. रोजी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावली. सरपंच मेश्राम यांचे घराला कुलूप लावले असल्याने त्यांचे घरात दर्शनी भागात नोटीस चिपकवून तीन साक्षीदारांच्या सह्या घेण्यात आल्याने अप्पर जिल्हाधिकार एन.के. लोणकर यांनी ही कार्यवाही नियमानुसार योग्य असल्याचे ठरविले.

अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर सरपंच मेश्राम यांनी १ ते ५ मुद्यावर अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल केली होती. अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३५ (३-ब) अंतर्गत सरपंच मेश्राम यांनी दाखल केलेला विवाद अर्ज फेटाळून लावला. अर्जदार सरपंच मेश्राम यांनी तहसीलदार, उपसरपंच वासुदेव उईके व इतर ७ सदस्य तसेच ग्रामसचिव यांचेविरूध्द अर्ज दाखल केला.