शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याला महागाईचा तडका

By admin | Updated: April 8, 2016 01:37 IST

डाळीने डोळ््यात पाणी आणले असून ताटातून वरण गायब झाले आहे. त्यापाठोपाठ आता भाज्यांनाही महागाईचा तडका लागल्याने भाज्याही ताटातून गायब होताना दिसत आहे.

भाज्यांचे दर ३० रूपयांवरच : भाव ऐकूनच फुटतो घाम गोंदिया : डाळीने डोळ््यात पाणी आणले असून ताटातून वरण गायब झाले आहे. त्यापाठोपाठ आता भाज्यांनाही महागाईचा तडका लागल्याने भाज्याही ताटातून गायब होताना दिसत आहे. आजघडीला बाजारात ३० रूपयांच्या आत एकही भाजी नाही. त्यामुळे भाज्यांचे भाव ऐकताच घाम फुटू लागला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ््यात भाज्यांची आवकडही कमी होत असल्याने घ्यावे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. महागाईमुळे आज सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. प्रत्येकच वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने काय घ्यावे व काय सोडावे असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. यात दैनंदिना जीवनातल्या अन्य वस्तूवरील नाहक खर्च कमी करता येईल. मात्र जेवण सोडता येणार नाही. महागाईमुळे मात्र आता दोनच्या ऐवजी एकच वेळ जेवण करण्याची पाळी आली आहे. त्यात भाजीपालाही महागाईच्या या कचाट्यातून सुटलेला नाही. त्यामुळे आता जेवणाच्या ताटातून भाज्याही गायब होऊ लागल्या आहेत. चारही बाजूंनी सर्वसामान्यांची फसगत झाली आहे. काय खावे अशा प्रश्न पडू लागला आहे. आजघडीला भाज्यांचे दर ऐकताच धडकी भरू लागली आहे. कारण बाजारात ३० रूपयांच्या आत एकही भाजी दिसत नाही. पूर्वी खिशात पैसे घेऊन थैली भर भाजी येत होती, असे जुने लोक सांगतात. आता मात्र थैलीत पैसे घेऊन खिशात येणार एवढी भाजी मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)