शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

भाजीपाल्याला महागाईचा तडका

By admin | Updated: April 8, 2016 01:37 IST

डाळीने डोळ््यात पाणी आणले असून ताटातून वरण गायब झाले आहे. त्यापाठोपाठ आता भाज्यांनाही महागाईचा तडका लागल्याने भाज्याही ताटातून गायब होताना दिसत आहे.

भाज्यांचे दर ३० रूपयांवरच : भाव ऐकूनच फुटतो घाम गोंदिया : डाळीने डोळ््यात पाणी आणले असून ताटातून वरण गायब झाले आहे. त्यापाठोपाठ आता भाज्यांनाही महागाईचा तडका लागल्याने भाज्याही ताटातून गायब होताना दिसत आहे. आजघडीला बाजारात ३० रूपयांच्या आत एकही भाजी नाही. त्यामुळे भाज्यांचे भाव ऐकताच घाम फुटू लागला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ््यात भाज्यांची आवकडही कमी होत असल्याने घ्यावे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. महागाईमुळे आज सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. प्रत्येकच वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने काय घ्यावे व काय सोडावे असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. यात दैनंदिना जीवनातल्या अन्य वस्तूवरील नाहक खर्च कमी करता येईल. मात्र जेवण सोडता येणार नाही. महागाईमुळे मात्र आता दोनच्या ऐवजी एकच वेळ जेवण करण्याची पाळी आली आहे. त्यात भाजीपालाही महागाईच्या या कचाट्यातून सुटलेला नाही. त्यामुळे आता जेवणाच्या ताटातून भाज्याही गायब होऊ लागल्या आहेत. चारही बाजूंनी सर्वसामान्यांची फसगत झाली आहे. काय खावे अशा प्रश्न पडू लागला आहे. आजघडीला भाज्यांचे दर ऐकताच धडकी भरू लागली आहे. कारण बाजारात ३० रूपयांच्या आत एकही भाजी दिसत नाही. पूर्वी खिशात पैसे घेऊन थैली भर भाजी येत होती, असे जुने लोक सांगतात. आता मात्र थैलीत पैसे घेऊन खिशात येणार एवढी भाजी मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)