शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

ठिंबक सिंचनातून ‘खोबा’ बनले भाजी उत्पादक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:42 IST

सध्या शेती करणे शेतकऱ्यांसाठी सोपे नाही. परंतु जेव्हा त्याची ईच्छाशक्ती दृढ असेल व शासकीय सहकार्य

आत्मा प्रकल्पाची मदत : १४५ क्विंटल उत्पादनातून १.३० लाखांचे उत्पन्नदेवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या शेती करणे शेतकऱ्यांसाठी सोपे नाही. परंतु जेव्हा त्याची ईच्छाशक्ती दृढ असेल व शासकीय सहकार्य मिळत असेल तर ओसाड भूमिमध्येसुद्धा पीक घेतले जावू शकते. हा यशस्वी प्रयोग देवरी तालुक्यातील कवलेवाडा-पिंडकेपार येथील शेतकरी हिरालाल लहानू खोबा यांनी सिद्ध करून दाखवून शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. कृषी विभागाद्वारे २०१३-१४ मध्ये तालुक्याच्या सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनाच्या आधारावर भाजीपाला लागवडीसाठी निवड करण्यात आली. तालुक्यात प्रशिक्षणाचे आयोजन करून भाजीची शेती करण्यासाठी जानजागृती करण्यात आली. शेती शाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाने हिरालाल यांना शहरी क्षेत्रात भाजी पुरवठा योजनेचे महत्व पटवून दिले. ठिंबक सिंचन योजनेतून पाण्याच्या बचतीबाबत माहिती देण्यात आली. खोबा यांना भाजीच्या शेतीसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले. त्यांनी आत्मा अंतर्गत जैन इरिगेशनचा दौरा करून तेथील ठिंबक सिंचनाचे प्रशिक्षण घेतले. तसेच वाराणसी येथेसुद्धा जावून प्रशिक्षण घेतले. खोबा यांच्या शेताचा दौरा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्य काळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी. शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आत्माचे संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. सर्व अधिकारी चिखलाची तमा न बाळगता खोबा यांच्या शेतात गेले व भाजी शेतीचे निरीक्षण केले. पारंपरिक धान शेतीला बगल देवून खोबा यांनी भाजीपाल्याची लागवड करुन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवल्याबद्दल कौतुक केले. पूर्वी धानाचे पीककवलेवाडा येथील खोबा सुरूवातीला ते धानाची शेती करीत होते. त्यात नफा होत नसल्याने त्यांनी सुधारित तंत्राचा अभ्यास केला. कमी वेळेत व कमी पाण्यात अधिक लाभासाठी ठिंबक सिंचनातून भाजीपाला पीक लावण्याचा निर्धार केला. ०.८० हेक्टरमध्ये ठिंबक सिंचानाचे यंत्र बसविले. त्यावर त्यांनी ६२ हजार ०१७ रूपयांचा खर्च केला. ठिंबक सिंचनातून त्यांनी वांगी, टमाटर, भेंडी, कारले व चवळीच्या शेंगाची लागवड केली. खत-बियाणे व औषधांवर ३० हजार रूपये खर्च झाले. या हंगामात ऋतूत त्यांनी ३० क्विंटल भिंडी, ५० क्विंटल वांगी, ४० क्विंटल टमाटर, १० क्विंटल चवळी व १५ क्विंटल वालाचे उत्पादन घेवून एक लाख ३० हजार रूपयांच्या भाजीपाल्याची विक्री केली. त्यांना एक लाख रूपयांचा नफा झाला.आठवड्यातून चार बाजारखोबा यांनी सांगितल्यानुसार, ते पूर्वी चार एकरात धान शेती करीत होते. आता पाऊन एकरमध्ये भाजी पीक घेतले जात आहे. आठवड्यातून चार वेळा ते आपले उत्पादन बाजारात नेतात. प्रत्येक वेळी तीन हजार रूपयांची विक्री होते. भाजीला लागणाऱ्या पाण्यासाठी १०० फूट खोल बोअरवेल खोदली. अशाच प्रकारे परसराम गरीबसिंह बागडेरिया यांनीसुद्धा एक एकरमध्ये भाजीचे पीक लावले आहे. त्यांना ५० हजार रूपयांचा लाभ मिळत आहे. खोबा यांच्यानुसार, शासनाद्वारे काही मदत देण्यात आली नाही. राहण्यासाठी व्यवस्था नाही. शेतीच्या कंपाऊंडसाठी तारांची आवश्यकता आहे.