शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
4
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
5
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
6
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
7
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
8
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
9
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
10
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
11
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
12
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
13
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
14
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
15
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
16
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
17
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
18
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
19
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
20
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?

ठिंबक सिंचनातून ‘खोबा’ बनले भाजी उत्पादक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:42 IST

सध्या शेती करणे शेतकऱ्यांसाठी सोपे नाही. परंतु जेव्हा त्याची ईच्छाशक्ती दृढ असेल व शासकीय सहकार्य

आत्मा प्रकल्पाची मदत : १४५ क्विंटल उत्पादनातून १.३० लाखांचे उत्पन्नदेवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सध्या शेती करणे शेतकऱ्यांसाठी सोपे नाही. परंतु जेव्हा त्याची ईच्छाशक्ती दृढ असेल व शासकीय सहकार्य मिळत असेल तर ओसाड भूमिमध्येसुद्धा पीक घेतले जावू शकते. हा यशस्वी प्रयोग देवरी तालुक्यातील कवलेवाडा-पिंडकेपार येथील शेतकरी हिरालाल लहानू खोबा यांनी सिद्ध करून दाखवून शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. कृषी विभागाद्वारे २०१३-१४ मध्ये तालुक्याच्या सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनाच्या आधारावर भाजीपाला लागवडीसाठी निवड करण्यात आली. तालुक्यात प्रशिक्षणाचे आयोजन करून भाजीची शेती करण्यासाठी जानजागृती करण्यात आली. शेती शाळा व प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाने हिरालाल यांना शहरी क्षेत्रात भाजी पुरवठा योजनेचे महत्व पटवून दिले. ठिंबक सिंचन योजनेतून पाण्याच्या बचतीबाबत माहिती देण्यात आली. खोबा यांना भाजीच्या शेतीसाठी अनुदान उपलब्ध करुन दिले. त्यांनी आत्मा अंतर्गत जैन इरिगेशनचा दौरा करून तेथील ठिंबक सिंचनाचे प्रशिक्षण घेतले. तसेच वाराणसी येथेसुद्धा जावून प्रशिक्षण घेतले. खोबा यांच्या शेताचा दौरा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्य काळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी. शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आत्माचे संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. सर्व अधिकारी चिखलाची तमा न बाळगता खोबा यांच्या शेतात गेले व भाजी शेतीचे निरीक्षण केले. पारंपरिक धान शेतीला बगल देवून खोबा यांनी भाजीपाल्याची लागवड करुन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवल्याबद्दल कौतुक केले. पूर्वी धानाचे पीककवलेवाडा येथील खोबा सुरूवातीला ते धानाची शेती करीत होते. त्यात नफा होत नसल्याने त्यांनी सुधारित तंत्राचा अभ्यास केला. कमी वेळेत व कमी पाण्यात अधिक लाभासाठी ठिंबक सिंचनातून भाजीपाला पीक लावण्याचा निर्धार केला. ०.८० हेक्टरमध्ये ठिंबक सिंचानाचे यंत्र बसविले. त्यावर त्यांनी ६२ हजार ०१७ रूपयांचा खर्च केला. ठिंबक सिंचनातून त्यांनी वांगी, टमाटर, भेंडी, कारले व चवळीच्या शेंगाची लागवड केली. खत-बियाणे व औषधांवर ३० हजार रूपये खर्च झाले. या हंगामात ऋतूत त्यांनी ३० क्विंटल भिंडी, ५० क्विंटल वांगी, ४० क्विंटल टमाटर, १० क्विंटल चवळी व १५ क्विंटल वालाचे उत्पादन घेवून एक लाख ३० हजार रूपयांच्या भाजीपाल्याची विक्री केली. त्यांना एक लाख रूपयांचा नफा झाला.आठवड्यातून चार बाजारखोबा यांनी सांगितल्यानुसार, ते पूर्वी चार एकरात धान शेती करीत होते. आता पाऊन एकरमध्ये भाजी पीक घेतले जात आहे. आठवड्यातून चार वेळा ते आपले उत्पादन बाजारात नेतात. प्रत्येक वेळी तीन हजार रूपयांची विक्री होते. भाजीला लागणाऱ्या पाण्यासाठी १०० फूट खोल बोअरवेल खोदली. अशाच प्रकारे परसराम गरीबसिंह बागडेरिया यांनीसुद्धा एक एकरमध्ये भाजीचे पीक लावले आहे. त्यांना ५० हजार रूपयांचा लाभ मिळत आहे. खोबा यांच्यानुसार, शासनाद्वारे काही मदत देण्यात आली नाही. राहण्यासाठी व्यवस्था नाही. शेतीच्या कंपाऊंडसाठी तारांची आवश्यकता आहे.