शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

पांदण रस्त्यासाठी शेतकऱ्याची पाणी टाकीवर चढून वीरुगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 22:37 IST

सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास  तहसीलदारांनी त्याची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संदीपने पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत आंदोलन  मागे घेतले. प्राप्त माहितीनुसात मुंडीपार येथील शेतकरी यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. परिणामी त्यांना विविध समस्यांना तोंड  द्यावे लागत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील मुंडीपार शेतकरी युवक संदीप राजेंद्र सरजारे (वय २६) याने सोमवारी (दि. १४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावातीलच राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पाण्याच्या टाकीवरून चढून शेतात जाणारा पाणंद रस्ता करून देण्याच्या  मागणीला घेऊन वीरुगिरी केली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास  तहसीलदारांनी त्याची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संदीपने पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत आंदोलन  मागे घेतले.   प्राप्त माहितीनुसात मुंडीपार येथील शेतकरी यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. परिणामी त्यांना विविध समस्यांना तोंड  द्यावे लागत आहे. त्यामुळे ते शेतात जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात यावा यासाठी मागील पाच वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतीची कामे कशी करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  अनेकदा संबंधित विभागाकडे न्याय मागूनही न्याय न मिळाल्याने या प्रकाराने संतापलेल्या संदीपने सोमवारी (दि. १४) गावातीलच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत पाणी टाकीवरून खाली उतरणार नाही, असा पवित्रा संदीपने घेतला होता. यातच आठ तासांचा अल्टिमेटम देत, आठ तासांच्या आत न्याय न मिळाल्यास पाणी टाकीवरून उडी घेणार, असा इशारा प्रशासनाला दिला होता. या घटनेची माहिती मिळताच गोरेगावचे तहसीलदार सचिन गोसावी, पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक घटनास्थळी दाखल. त्यांनी संदीपला पाणी टाकीवरून खाली उतरण्याची विनंती केली; पण जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाहीे तोपर्यंत पाणी टाकीवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका संदीपने घेतली होती. यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. 

संदीपच्या वडिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मुंडीपार येथील सहा शेतकऱ्यांच्या विरोधात संदीपच्या वडिलाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे; पण याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. मागील पाच वर्षांपासून शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्रस्त झालेल्या संदीपला अखेर संतापून आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.

प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे पाणंद रस्त्याच्या न्याय मागणीसाठी संदीप पाण्याच्या टाकीवर चढला होता. याची दखल तालुका प्रशासनाने घेतल्यानंतर संदीपला पाण्याच्या टाकीवरून उतरण्याची विनंती करण्यात आली. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पोहोचून जागेची पाहणी केली. त्यानंतर तहसीलदारांनी संदीपला लवकरच शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्याची व्यवस्था करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर संदीप पाण्याच्या टाकीवरून खाली उतरला. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.  

टॅग्स :Farmerशेतकरी