शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

वरुणराजाची अवकृपा कायम

By admin | Updated: July 18, 2014 00:09 IST

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असला तरिही वरुणराजाने अद्यापही आपली दमदार हजेरी लावली नाही. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी आतापर्यंत जिल्ह्यातील

केवळ आठ टक्के रोवण्या : पाऊस लांबल्यास परिस्थिती बिकटगोंदिया : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असला तरिही वरुणराजाने अद्यापही आपली दमदार हजेरी लावली नाही. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ आठ टक्केच रोवणीची कामे पूर्ण झाली असून अजूनही ९२ टक्के रोवण्या शिल्लक आहेत. पाऊस लांबल्याने रोवणीची कामे पूर्णत: खोळंबली आहेत. जिल्ह्यातील शेती आजही बऱ्याच प्रमाणात वरथेंबी पावसावर अवलबंून आहे. त्यामुळे पाऊस समाधानकारक पडल्यास उत्पन्न चांगले होते हे आजवरचे चित्र आहे. मात्र यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिल्याने आधी पेरणी व आता रोवणीचे कामे खोळबंली आहेत. शेतकरी बांधव १५ जुलै पासून रोवणीच्या कामाला सुरुवात करतात. रोवणी करण्याची अंतीम मुदत १५ आॅगस्ट पर्यंत असते. यापेक्षा उशीर झाल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असते. यावर्षी मात्र अद्याप केवळ आठ टक्के रोवणी झाली असून अजूनही ९२ टक्के रोवण्या शिल्लक आहेत. यामुळेच शेतकऱ्यांनी आवत्यांवर भर दिला असून सुमारे ६० टक्के आवत्या झाल्या आहेत. तर पावसाचे प्रमाण देखील सरासरी १८५ आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार आतापर्यंत ५५० मिमी. पाऊस झाला असता तर रोवणीचे चित्र चांगले असते. मात्र यावर्षी दररोज ढगाळ वातावरण राहत असून पाऊस पडत नसल्याने चिंता वाढली आहे. येत्या आठ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास धानाच्या पऱ्ह्यावर किड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांचीच केवळ रोवणीची कामे सुरु आहे. तर जवळपास ९२ टक्के शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळी परिस्थितीची टांगती तलावर कायम आहे. (शहर प्रतिनिधी)