शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

वाजपेयींचे गोंदिया जिल्ह्याशी घनिष्ठ नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:03 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे होते.

ठळक मुद्देजिल्ह्याला तीनदा भेट : कार्यकर्त्यांशी जुळली होती नाळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी (दि.१६) वयाच्या ९३ व्या वर्षी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला. जिल्ह्यातही शोककळा पसरली होती. जनसंघाचे कार्यक्षेत्र गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे होते. यामुळे भाजपाच्या अनेक नेत्यांची जिल्ह्यात तेव्हा रेलचेल होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गोंदिया जिल्ह्याला निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तीनदा भेट दिली. त्यांचे जिल्ह्यातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांशी घनिष्ठ नाते संबंध होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वच जण नि:शब्द झाले. अनेकांनी त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. कार्यकर्त्यांशी थेट नाड असणार नेता म्हणजे वाजपेयी असल्याच्या भावना व्यक्त केल्या.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे १९७८ मध्ये निवडणूक प्रचारार्थ प्रथम गोंदिया येथे आले होते. त्यानंतर माजी खासदार खुशाल बोपचे यांच्या निवडणूक प्रचारार्थ १९९१ आणि १९९६ मध्ये नारायणदास सराफ यांच्या प्रचारार्थ ते गोंदियाला आले होते. या वेळी गोंदिया येथील सध्याच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली होती. या वेळी त्यांनी जिल्ह्यातील अनेक भाजपाच्या जेष्ठ नेत्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. गोंदिया येथील विश्रामगृहात त्यांनी तेव्हा स्थानिक पत्रकार आणि भाजपा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. डॉ. राधेश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली होती. तर आमगाव येथील माजी खासदार महादेवराव शिवणकर यांच्या निवासस्थानी भेट देवून कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. निवडणूक प्रचारार्थ त्यांची जिल्ह्यात झालेली भाषणे अद्यापही जिल्हावासीयांच्या स्मरणात आहेत. भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयी यांच्या योगदानामुळेच भारतीय जनता पक्षाचा विस्तार झाला. गोरगरीब, शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.मौत की उमर क्या हैदो पल भी नहीजिंदगी का सिल सिलाआज है कल नहीया कवितेच्या चार ओळी आजही जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या स्मरणात आहेत. यावरुन त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची कार्यकर्त्यांवर किती छाप होती हे दिसून येते. अटलबिहारी वाजपेयी यांनी जिल्ह्याला केवळ तीनदा भेट दिली असली तरी या महान नेत्याच्या भेटीच्या आठवणी अद्यापही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आजही स्मरणात आहे. त्यामुळे त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांजवळ शब्द नव्हते. यावरुन या महान नेत्याचे कार्य कळत असल्याचे डॉ. राधेश्याम अग्रवाल (बबली) यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी