शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

वैष्णोदेवीचे दर्शन राहिले अपुरे

By admin | Updated: November 8, 2014 01:25 IST

गोंदिया येथून विशेष रेल्वेगाडीने वैष्णोदेवीची यात्रा करायला जाण्यासाठी स्थानिक रेल्वे स्थानकावर हजारो यात्रेकरू गोळा झाले.

गोंदिया : गोंदिया येथून विशेष रेल्वेगाडीने वैष्णोदेवीची यात्रा करायला जाण्यासाठी स्थानिक रेल्वे स्थानकावर हजारो यात्रेकरू गोळा झाले. गुरूवारच्या रात्री या भाविकांसाठी एक विशेष गाडी आली. मात्र या गाडीत भोजनयान डबा नसल्यामुळे यात्रेकरूंनी रेल्वेस्थानकावर गोंधळ घातला. रेल्वे विभागाच्या विरोधात असंतोष व्यक्त करीत यात्रा न करताच यात्रेकरूंना घरी परतावे लागले.रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे यात्रेकरूंना नाहक त्रास झाला. यात्रेचे आयोजन श्री गंज वॉर्ड मा वैष्णोदेवी सेवा समिती करते. या प्रकारामुळे या आयोजन समितीला मोठे नुकसान सहन करावे लागले. याचा फटका रेल्वे विभागालाही बसणार आहे.विशेष म्हणजे श्री गंजवार्ड मॉ वैष्णोदेवी सेवा समिती मागील अनेक वर्षापासून कमी तिकीटमध्ये वैष्णोदेवी दर्शनासाठी विशेष गाडीची सोय करते. या वर्र्षी ६ ते १२ नोव्हेंबर दरम्यान १८ बोगी असलेल्या एका विशेष गाडीचे आयोजन करण्यात आले होते. महिनाभरापूर्वी यासाठी बुकिंग करण्यात आली होती. यासाठी ६९ लाख रूपये रेल्वे विभागाला देण्यात आले. रेल्वेने ६ नोव्हेंबरला एक विशेष रेल्वेगाडी गोंदिया रेल्वे स्टेशनवर पाठविली. परंतु यात्रेकरू रात्री रेल्वे स्थानकाच्या प्लेटफार्म नंबर ५ वर पोहचले. त्यांनी त्या गाडीची पाहणी केल्यावर त्या गाडीत भोजनयान नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. भोजनयानच्या ठिकाणी वातानुकूलित ओवन पेन्ट्रीकार लावण्यात आली होती. त्या कक्षात फक्त भोजन को गरम व ताजे ठेवण्याची व्यवस्था होती. परंतु भोजन तयार करण्यासाठी व्यवस्था नव्हती. यामुळे संतापलेल्या यात्रेकरूंनी असंतोष व्यक्त केला. रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना बोलावून आपली तक्रार केली. परंतु यासंदर्भात आपण काहीच करू शकणार नाही, असे त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी या विशेष गाडीला शुक्रवारच्या पहाटे ३.५५ वाजता रद्द करण्यात आले. यात्रेकरू रेल्वे स्थानकावरून घरी परतले.या घटनेची माहिती मिळताच खा. नाना पटोले रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी तब्बल तीन तास यात्रेकरूंसाठी दुसऱ्या रेल्वेगडाीची सोय करण्याचा प्रयत्न केला. रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली. परंतु यात तोडगा निघाला नाही. विशेष म्हणजे या गाडीने वैष्णोदेवीची यात्रा करणाऱ्यांमध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश होता. रेल्वे विभागाखच्या अनागोंदी कारभारामुळे यात्रेकरूंना रात्रभर रेल्वे स्थानकावर राहावे लागले.७ नोव्हेंबरच्या दुपारी फलाट क्र.५ चे निरीक्षण करण्यासाठी आयोजन समितीने मोठ्या प्रमाणात सोय करण्यात आली होती. पाण्याची बॉटल, पाऊच, रजई, गादी व खाण्याचे पदार्थ तिथे आढळले. हे सर्व साहित्य आयोजकांना परत न्यावे लागले. यात्रा आयोजन समितीचे अध्यक्ष रमाकांत अग्रवाल यांच्याशी संपर्क केल्यावर ते म्हणाले, तीर्थयात्री त्या गाडीने यात्रेला गेले असते तर त्यांना खूप त्रास झाला असता. समितीकडून १५०० यात्रेकरूंसाठी रस्त्यात भोजनाची सोय करणे शक्य नव्हते. यामुळे रेल्वेगाडी रद्द करावी लागली. यामुळे समितीला मोठे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. ठराविक कार्यक्रमानुसार यात्रेकरूंसाठी हॉटेल व बसांची बुकिंग या आधीच करण्यात आली होती. त्या बुकिंगचे पैसे मिळणे आता शक्य नाही. (तालुका प्रतिनिधी)