शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

अखेर जिल्ह्यात युरिया पोहोचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ऐन रोवणीच्या कालावधी युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणी अडचणी आल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर लोकप्रतिनिधीनी सुध्दा यावरुन कृषी विभाग आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात १४०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची युरियाची अडचण आता पूर्णपणे दूर झाली आहे.

ठळक मुद्देयुरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई। शेतकऱ्यांची अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऐन रोवणीच्या कालावधी युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणी अडचणी आल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर लोकप्रतिनिधीनी सुध्दा यावरुन कृषी विभाग आणि प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात १४०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची युरियाची अडचण आता पूर्णपणे दूर झाली आहे.कृषी विभागाने यंदा १४ हजार मेट्रीक टन युरियाची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चार हजार मेट्रीक टन युरियाचा पुरवठा कमी झाला.त्यामुळे ऐन रोवणीच्या कालावधी युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची ओरड वाढली होती.या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील काही मोठ्या विक्रेत्यांनी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करुन काळाबाजार केला. त्यामुळे शेतकऱ्यांना एका युरियाच्या चुंगडीमागे १०० रुपये अतिरिक्त मोजावे लागत होते.लोकमतने हा मुद्दा लावून धरत आणि युरियाचा होत असलेला काळाबाजार उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने त्याची गांर्भियाने दखल घेतली.आ.विनोद अग्रवाल यांनी सुध्दा यावरुन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रासायनिक खतांचा काळाबाजार करुन शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले.शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात १४०० मेट्रीक टन युरियाची रॅक लागली. यावेळी आ.अग्रवाल यांनी स्वत: रेल्वे मालधक्का परिसरात जावून पाहणी केली तसेच संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुध्दा युरियाचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. विशेष म्हणजे लोकमतने हा मुद्दा सातत्याने लावून धरल्याबद्दल त्यांनी लोकमतचे सुध्दा आभार मानले. लोकमतने या मुद्दाकडे लक्ष वेधल्याने शेतकऱ्यांना युरिया मिळण्याची अडचण दूर झाली असून आणखी १२०० मेट्रीक टन युरिया जिल्ह्याला प्राप्त होणार आहे.जिल्ह्यात निर्माण झालेली युरियाची टंचाई आणि होत असलेल्या काळाबाजाराचा मुद्दा लोकमतने लावून धरला याचीच दखल घेत आपण सुध्दा संबंधित कंपनी आणि जिल्हा प्रशासनाला याकडे गांर्भियाने लक्ष देवून युरियाची टंचाई दूर करुन काळाबाजार करणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.- विनोद अग्रवाल, आमदार.

टॅग्स :agricultureशेती