शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

युरियाची कोंडी अखेर सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टरवर खरिपातील धानाची लागवड करण्यात येणार आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ४० टक्के रोवण्या आटोपल्या आहेत. ६० टक्के रोवण्या शिल्लक आहे. धानाच्या रोवणी दरम्यान शेतकऱ्यांना सर्वाधिक युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने काही प्रमाणात रोवणीची कामे खोळंबली आहेत.

ठळक मुद्देदोन दिवसात येणार २६०० मेट्रिक टन युरिया : शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात मागणीपेक्षा युरियाचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी रोवणीच्या कामावर याचा परिणाम झाल्याने शेतकरी अडचणीत आले होते. लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने याची दखल घेत युरियाची तातडीने मागणी केली आहे. शनिवारी (दि.२५) जिल्ह्यात २६०० मेट्रिक टन युरियाची रॅक लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युरियाची कोंडी आता पूर्णपणे सुटणार आहे.जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टरवर खरिपातील धानाची लागवड करण्यात येणार आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील ४० टक्के रोवण्या आटोपल्या आहेत. ६० टक्के रोवण्या शिल्लक आहे. धानाच्या रोवणी दरम्यान शेतकऱ्यांना सर्वाधिक युरियाची गरज असते. मात्र जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने काही प्रमाणात रोवणीची कामे खोळंबली आहेत. तर काही बड्या विक्रेत्यांनी युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली असून ते २६६ रुपयांच्या युरियाची ३५० रुपयांना विक्री करीत असल्याच्या तक्रारीत सुध्दा वाढ झाली आहे.यंदा पावसाने ओढ दिल्याने आधीच संकटात असलेले शेतकरी युरियाच्या टंचाईमुळे अधिक अडचणीत आणले आहे. शेतकºयांच्या समस्येची दखल घेवून मागील तीन चार दिवसांपासून लोकमतने हा विषय लावून धरला होता.युरियाचा कसा काळाबाजार केला जात आहे ही बाब सुध्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने याची गांर्भियाने दखल घेतली. तसेच जिल्ह्यात निर्माण झालेली युरियाची कोंडी फोडण्यासाठी तातडीने संबंधित कंपन्याना पुरवठा करण्यास सांगितले. शुक्रवारी कृभंको कंपनीच्या १४०० मेट्रीक टन तर शनिवारी इफको कंपनीचा १२०० मेट्रीक टन युरियाची जिल्ह्यात रॅक लागणार आहे.त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी दीड हजार मेट्रीक टन युरियाची रॅक लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युरियाची पूर्णपणे टंचाई दूर होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.जिल्हा प्रशासन, कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडवरजिल्ह्यात खताचा काळाबाजार होवू नये तसेच अतिरिक्त दराने शेतकऱ्यांना खताची विक्री होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. युरियाचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. याच अंतर्गत आता वितरकांच्या गोदामांची सुध्दा तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात शनिवारपर्यंत २६०० मेट्रिक टन युरिया येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषी विभागाने आणखी ३५०० मेट्रिक टन युरियाची मागणी केली आहे. आता शेतकऱ्यांची कोंडी होणार नसून टंचाई पूर्णपणे दूर होईल. खताचा काळाबाजार करणाºया विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती