शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
8
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
9
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
10
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
11
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
12
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
13
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
14
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
15
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
16
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
17
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
18
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
19
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
20
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा ६ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्यामुळे रब्बी हंगामातील धानपीक संकटात आले आहे. शनिवारी (दि. ...

गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्यामुळे रब्बी हंगामातील धानपीक संकटात आले आहे. शनिवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे ६ हजार हेक्टरमधील कापणी केलेल्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अवकाळीचे संकट कायम आहे.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्येसुध्दा पुरेसा पाणीसाठा होता. तर रब्बी पिकांना अनुकूल असे वातावरण होते. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात ६६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. मागील तीन-चार वर्षांतील हा सर्वाधिक आकडा होय. सुदैवाने यंदा रब्बी धानाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने धानाची वाढ सुध्दा चांगली झाली होती. खरीप हंगामापेक्षा रब्बीतील धानाची स्थिती चांगली होती. त्यामुळे यंदा रब्बीचे बंपर उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणीसुध्दा सुरू केली असून जवळपास ६ हजार हेक्टरमधील धान कापणी करून बांध्यामध्ये पडला आहे. या धानाला शनिवारी दुपारच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची चिंता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. अवकाळी पावसाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नसून हवामान विभागाने पुन्हा पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस गारपिटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट कायम आहे.

........

तूतार्स धान कापणी नको

सध्या रब्बी हंगामातील धान कापणी जोरात सुरू आहे. मात्र अवकाळी पावसाचे संकट कायम असल्याने तूर्तास काही दिवस धान कापणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे धानाची कापणी करून तसेच कापणी केलेला धान सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.

...............

नुकसानीचे पंचनामे केले सुरू

मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस जिल्ह्यात हजेरी लावत आहे. शनिवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

.......