शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

अवकाळी पावसाचा ६ हजार हेक्टरमधील रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्यामुळे रब्बी हंगामातील धानपीक संकटात आले आहे. शनिवारी (दि. ...

गोंदिया : मागील चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सातत्याने हजेरी लावत असल्यामुळे रब्बी हंगामातील धानपीक संकटात आले आहे. शनिवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे ६ हजार हेक्टरमधील कापणी केलेल्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अवकाळीचे संकट कायम आहे.

मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्येसुध्दा पुरेसा पाणीसाठा होता. तर रब्बी पिकांना अनुकूल असे वातावरण होते. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात ६६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. मागील तीन-चार वर्षांतील हा सर्वाधिक आकडा होय. सुदैवाने यंदा रब्बी धानाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळाल्याने धानाची वाढ सुध्दा चांगली झाली होती. खरीप हंगामापेक्षा रब्बीतील धानाची स्थिती चांगली होती. त्यामुळे यंदा रब्बीचे बंपर उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणीसुध्दा सुरू केली असून जवळपास ६ हजार हेक्टरमधील धान कापणी करून बांध्यामध्ये पडला आहे. या धानाला शनिवारी दुपारच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची चिंता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. अवकाळी पावसाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नसून हवामान विभागाने पुन्हा पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस गारपिटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट कायम आहे.

........

तूतार्स धान कापणी नको

सध्या रब्बी हंगामातील धान कापणी जोरात सुरू आहे. मात्र अवकाळी पावसाचे संकट कायम असल्याने तूर्तास काही दिवस धान कापणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. हवामान विभागाने पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे धानाची कापणी करून तसेच कापणी केलेला धान सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.

...............

नुकसानीचे पंचनामे केले सुरू

मागील तीन-चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस जिल्ह्यात हजेरी लावत आहे. शनिवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

.......