शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

सोमवारपासून सर्वच व्यवहार अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

शासनाने सोमवारपासून पाचस्तरीय अनलॉक करण्याची घोषणा केली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.७) जिल्ह्यातील संपूर्ण व्यवहार सुरळीतपणे चालू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध सोमवारपासून आता पूर्णपणे शिथिल होणार आहेत. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. पूर्णपणे अनलॉक करण्यात येत असले तरी जिल्हावासीयांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

ठळक मुद्देशासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचना : निबर्बंध होणार पूर्णपणे शिथिल: जिल्हावासीयांना दिलासा

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे तर १८ जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने सोमवारपासून पाचस्तरीय अनलॉक करण्याची घोषणा केली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे. त्यामुळे सोमवारपासून (दि.७) जिल्ह्यातील संपूर्ण व्यवहार सुरळीतपणे चालू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू केलेले निर्बंध सोमवारपासून आता पूर्णपणे शिथिल होणार आहेत. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. पूर्णपणे अनलॉक करण्यात येत असले तरी जिल्हावासीयांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. शासनाने यासंदर्भात काढलेल्या शासकीय परिपत्रकात म्हटले आहे की अनलॉक करण्यासाठी जे पाच टप्पे ठरविण्यात आले आहेत, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्हा पहिला टप्प्यात बसत असल्याने निर्बंध शिथिल करीत सोमवारपासून जिल्हा अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी (दि.५) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुध्दा पार पडली. त्यात जिल्ह्यात कुठले निर्बंध शिथिल करायचे यावर चर्चा करण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने सर्वच छोटे मोठे व्यवसाय आणि उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अर्थचक्रसुध्दा बिघडले आहे. त्यामुळे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी उद्योग आणि व्यवसायांची गाडी रुळावर आणण्यासाठी सोमवारपासून जिल्ह्यात पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे.  

नियमांचे करावे लागणार काटेकोरपणे पालन - कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याने सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात येत आहे. निर्बंध पूर्णपणे शिथिल झाल्याने नागरिकांनी बिनधास्तपणे न वागता पूर्वी इतकीच काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन व्यावसायिक आणि नागरिकांना पण करावे लागणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आदी गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. 

काय राहील सुरू - अत्यावश्यक सेवेसह सर्वच प्रकारची व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू, किरकोळ वस्तू विक्रीची दुकाने, सुपर बाजार, हाॅटेल्स, रेस्टारंट व इतर दुकाने- सलून, जीम, उद्याने, चित्रपटगृह, बाजारपेठा, - सर्वच प्रकारची वाहतूक शंभर टक्के सुरू, एसटी बसेस पूर्ण क्षमतेेने सुरू - प्रार्थना स्थळे, मंदिर, चर्च,- सर्वच प्रकारच्या फेरीवाल्यांना वस्तूंची विक्री करण्याची परवानगी. 

जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट २.५ टक्के असून ऑक्सिजन बेड सुध्दा केवळ ४.८ टक्के भरले आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश होत असल्याने सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करुन जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सुरळीत व्हावे, आर्थिक गाडी रुळावर यावी, यादृष्टीनेच निर्णय घेण्यात येणार आहे. - राजेश खवले, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार