शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

केशोरी बाजार परिसरात अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव मोठ्या गावापैकी एक गाव असून, येथे दर सोमवारला आठवडी बाजार भरविला ...

केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव मोठ्या गावापैकी एक गाव असून, येथे दर सोमवारला आठवडी बाजार भरविला जातो. येथील आठवडी बाजार भरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असली तरी, बाजारातील व्यवस्थापन एका बाजार ठेकेदारास दिले आहे. या परिसरातील १५ ते २० लहान-लहान खेड्यांमधील लोक वस्तू व भाजीपाला घेण्यासाठी येत असतात. साहित्य विक्रीसाठी ग्रामपंचायतकडून तशी व्यवस्था करून दिली असली तरीही कोंबड्यांचे मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून पाहिजे तशी स्वच्छता ठेवली जात नसल्यामुळे बाजार परिसरात कोंबड्यांची पंख पसरली आहेत. याकडे संबंधित बाजार ठेकेदारांनी लक्ष देऊन बाजार परिसरातील स्वच्छता ठेवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.’

कोरोना महामारीच्या भीतीने येथील आठवडी बाजार मार्च २०२० पासून प्रशासनाने बंद ठेवले होते; परंतु अलीकडे कोरोना महामारीचा प्रभाव कमी होताच येथील आठवडी बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे. भाजीपाला दुकान वगळता इतर भागात कोंबड्या व मत्स्य व्यावसायिकांची दुकाने थाटली आहेत. त्या भागात सगळीकडे अस्वच्छता व कोंबड्यांचे पंख पसरलेली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आठवडी बाजार परिसरात जि.प. प्राथमिक शाळा, पोलीस स्टेशन बँक, वन विभागाची कार्यालये असून, येथील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना पसरत असलेल्या कोंबड्यांच्या पंखामुळे त्रास सोसावा लागत आहे. कोरोना संसर्गाची भीती कायम असतानाच आता नव्याने निर्माण झालेला ‘बर्ड फ्लू’ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन बाजार भरविणाऱ्या कंत्राटदाराला सूचना देऊन बाजार परिसरात स्वच्छता राहील, याची व्यवस्था करण्यास सांगावे. प्रत्येक दुकानदारांकडून कराच्या माध्यमातून वर्षापोटी लाखो रुपये जमा करीत असतो. त्यामधून स्वच्छता ठेवण्यासाठी काही पैसा खर्च करून बाजार परिसरातील पसरलेल्या कोंबड्यांची पंखं उचलून स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.