शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून भारत बटालियन नागपुरातच

By admin | Updated: August 9, 2014 00:55 IST

नक्षलवादाच्या बिमोडासाठी केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्यात भारत बटालियन उभारली. मात्र या बटालियनच्या जवानांसाठी निवासस्थानाची सोय नसल्यामुळे ....

 गोंदिया : नक्षलवादाच्या बिमोडासाठी केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्यात भारत बटालियन उभारली. मात्र या बटालियनच्या जवानांसाठी निवासस्थानाची सोय नसल्यामुळे या बटालियन मधील ६७५ जवानांना नागपूर येथे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या बटालियनच्या वसाहतीसाठी शासनाने १३ कोटी रूपये मंजूर केले आहे.गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवण्याची शक्यता अधिक असते. जिल्ह्यातील बेरोजगारांना नक्षलवादी आपल्या चळवळीकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. असे घडू नये म्हणून शासनाने सन २००९ मध्ये भारत राखील बटालियन २, राज्यराखीव पोलीस बल गट क्र.१५ बिरसी कॅम्प या नावाने ओळखले जाते. या बटालियनमध्ये ६७५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात ३५० युवक गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील आहेत. शासनाने ६७५ तरूणांना या बटालियनमध्ये २३ जानेवारी २०१० पासून रूजू केले. या बटालियन मधील जवानांचे १० महिन्याचे प्रशिक्षण पुणे जिल्ह्यातील दौंड येथे घेण्यात आले. या राज्य राखीव दलातील बल गट क्र. १२ हिंगोली येथे तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले होते आता त्यांनाही नागपुरातच ठेवण्यात आले आहे. गोंदियाच्या बिरसी येथे या बटालियनच्या वसाहतीसाठी जागा पाहण्यात आली. वसाहतीची जागा दोन ठीकाणी आहे. परसवाडा नजीक व बिरसी येथे अश्या वेगवेगळ्या दोन ठीकाणी जागा असल्यामुळे पोलिस महासंचालकांनी त्या ठीकाणी वसाहत उभारण्यास मनाई केली होती. परंतु आता जागेचा तिढा सुटला. एकाच ठीकाणी वसाहत उभारले तर सोईस्कर होईल ही बाब ओळखल्याने जमीन पाहण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कोसे यांनी सांगितले. राहण्याची जागा नसल्यामुळे या बटालियन मधील जवानांना नागपूर येथे ठेवण्यात आले. गोंदियापासून नागपूरचे अंतर २५० किमी आहे. जिल्ह्यात एखादी घटना घडल्यास त्या जवानांना येण्यासाठी बराच वेळ वाया जाईल. भारत बटालियनच्या जवानांच्या वसाहतीसाठी १५० एकर जागा गोंदियापासून १८ किमी अंतरावर आहे. शासनाने शासनाने या भारत बटालियनसाठी १३ कोटी रूपये मंजूर केले आहे. लवकरच या वसाहतीचे बांधकाम सुरू होणार असल्याचे दोन वर्षापुर्वी पोलीस अधीक्षक कोसे यांनी सांगितले होते. परंतु आताही या जवानांना नागपूर येथेच ठेवण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागासाठी शासनाने विशेष महानिरीक्षक गडचिरोली परीक्षेत्र गडचिरोली यांचे पद निर्माण केले. मात्र हे कार्यालय देखील नागपूरला आहे. गु्रप १३ हे वडसा-गडचिरोली करीता तयार करण्यात आले. परंतु हे कार्यालय देखील १९९३ पासून नागपूर येथेच आहे. (तालुका प्रतिनिधी)