शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दोन लाख क्विंटल धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:00 IST

जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरीप हंगामात खरेदी केलेला तब्बल दोन लाख क्विंटल धान उघड्यावरच पडून आहे. रविवारी (दि.१३) झालेल्या वादळी पावसाचा या धानाला काही प्रमाणात फटका बसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास महामंडळ : नुकसानीनंतर धडा नाहीच

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरीप हंगामात खरेदी केलेला तब्बल दोन लाख क्विंटल धान उघड्यावरच पडून आहे. रविवारी (दि.१३) झालेल्या वादळी पावसाचा या धानाला काही प्रमाणात फटका बसल्याची माहिती आहे. उघड्यावर धान ठेवल्यामुळे दरवर्षी लाखो रुपयांचा फटका बसत असताना देखील शासनाने खरेदी केलेले धान साठवून ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.आदिवासी विकास मंडळातंर्गत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. आदिवासी व दुर्गम भागातील शेतकºयांच्या शेतमालाला शासकीय हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी केली जाते.यंदा या मंडळातंर्गत ४३ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर १० फेब्रुवारीपर्यंत २ लाख ६३ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेला धान अद्यापही धान खरेदी केंद्राबाहेर उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवण्यात आला आहे. या विभागाचे सर्वाधिक केंद्र ग्रामीण भागात असल्याने या विभागाला गोदामे मिळत नसल्याचे या विभागाचे अधिकारी सांगतात. त्यामुळे अद्यापही खरेदी केलेले तब्बल दोन लाख क्विंटल धान खरेदी केंद्राबाहेर उघड्यावर पडून आहेत. रविवारी (दि.) झालेल्या वादळी पावसाचा फटका या धानाला बसल्यानंतर धानाच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला. आदिवासी विकास महामंडळातंर्गत दरवर्षी जिल्ह्यात ७ ते ८ लाख क्विंटल धान खरेदी केली जाते. मात्र खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी या विभागाला गोदामाची व्यवस्था करुन दिली जात नसल्याने कोट्यवधी रुपयांचा धान उघड्यावर पडून राहतो. यापैकी बरेच धान खराब देखील होत असल्याची माहिती आहे. या विभागाने खरेदी केलेला धान उघड्यावरच राहिल्याने शेकडो क्विंटल धान खराब झाला होता. तेव्हा या मुद्दावरुन चांगला गदारोळ झाला होता. मात्र यानंतरही शासनाने यापासून कसालाच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे. उघड्यावर असलेल्या धाना संदर्भात या विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी केलेला धान केंद्रावर ताडपत्री झाकून ठेवला असल्याचे सांगितले.शासनाची घोषणा फोलसहा महिन्यापूर्वी राज्य सरकारने आदिवासी विकास मंडळातंर्गत खरेदी केल्या जाणाºया धानाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गोदामाची व्यवस्था करुन देण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र अद्यापही गोदामे उपलब्ध करुन न दिल्याने कोट्यवधी रुपयांचा धान उघड्यावरच पडून आहे. त्यामुळे शासनाची घोषणा फोल ठरल्याचे चित्र आहे.