शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दोन दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

By admin | Updated: February 20, 2015 01:23 IST

आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोल्यापासून ३ किमी अंतरावर असलेल्या तेलीटोला वळणावर बुधवारी रात्री पुन्हा एक अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण ठार..

साखरीटोला : आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोल्यापासून ३ किमी अंतरावर असलेल्या तेलीटोला वळणावर बुधवारी रात्री पुन्हा एक अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. आजपर्यंत अनेक बळी घेणाऱ्या या वळणावर अपघातांची मालिका सुरूच असून सदर वळण मृत्युचा सापळा झाले आहे. दि. १८ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान भरधाव मोटारसायकलची वळणावर असलेल्या झाडाला धडक बसली. यामुळे दोन इसम जागीच ठार झाले तर एकाला गंभीर दुखापत झाल्याने नागपूरला हलविण्यात आले आहे. मृतकांमध्ये शंकर धनुराम पाचे (२१) मु. सतोना, सोनू उर्फ नरेश पाचे (२१) मु.बालाघाट यांचा समावेश आहे. ताराचंद धर्मू पाचे (२५) मु.सतोना जि. गोंदिया हा इसम गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त मोटारसायकल होंडा कंपनीची असून नव्याने खरेदी करण्यात आली होती. तिघे मित्र साखरीटोला तेथे फिरायला आले होते. तेथून हरदोलीकडे परत जाताना तेलीटोला वळणावर मोटरसायकल चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर असलेल्या झाडाला जोरदार धडक बसली. त्यामुळे गंभीर दुखापत होवून बराच वेळपर्यंत तिघेही घटनास्थळीच पडून होते. त्यात दोघांचा बळी गेला. सालेकसा पोलिसांना याची माहिती मिळताच रात्रीच्या १२ वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनाकरिता पाठविण्यात आले. या घटनेने सदर वळण हे नवीन वाहनधारकांसाठी मृत्युचे कारण बनत असल्याची प्रचिती आली. पुन्हा सदर वळणावर अपघात घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)नियोजित पत्नीला भेटायला मित्रासह गेला होताया अपघातातील गंभीर जखमी ताराचंद धर्मू पाचे याचे काही दिवसांपूर्वीच हरदोली येथील बालाराम पाचे यांच्या मुलीशी लग्न जुळले आहे. त्यामुळे ताराचंद व त्याचे दोन सोबती सासूरवाडीला महाशिवरात्रीनिमित्त आले होते. बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान तिघेही साखरीटोल्याला फिरायच्या निमित्ताने आले होते. पण तेथून परत जाताना त्यांच्यातील दोघांवर काळाने झडप घातली. एका दुचाकीवर तिघेजण बसणे त्यांना महागात पडले.बांधकाम विभाग अजूनही निद्रावस्थेतअनेकदा या वळणावर बरेच अपघात होऊन कित्येक जणांचा हकनाक बळी जात असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याबाबत काही घेणे-देणे नसल्याचे जाणवते. इतके अपघात होऊनही या ठिकाणी ‘अपघातप्रवण स्थळ’ अशी सूचना देणारा फलकही लावण्यात आलेला नाही. अतिवळण असल्याने येथे अपघात होतात. जर सदर वळणाचे सरळीकरण झाले तर अपघात टाळता येतील. याबाबतीत ‘लोकमत’ने अनेक वेळा बातमीच्या माध्यमातून जागृती केली आहे. मात्र अधिकारी निद्रावस्थेत आहेत. त्यामुळे सदर वळणाचे सरळीकरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सालेकसाचे अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, ओबीसी आघाडीचे पप्पू राणे, पृथ्वीराज शिवणकर, मुलचंद कटरे, धनजित बैस यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.