शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दोन दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

By admin | Updated: February 20, 2015 01:23 IST

आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोल्यापासून ३ किमी अंतरावर असलेल्या तेलीटोला वळणावर बुधवारी रात्री पुन्हा एक अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण ठार..

साखरीटोला : आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोल्यापासून ३ किमी अंतरावर असलेल्या तेलीटोला वळणावर बुधवारी रात्री पुन्हा एक अपघात होऊन दुचाकीवरील दोघे जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. आजपर्यंत अनेक बळी घेणाऱ्या या वळणावर अपघातांची मालिका सुरूच असून सदर वळण मृत्युचा सापळा झाले आहे. दि. १८ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान भरधाव मोटारसायकलची वळणावर असलेल्या झाडाला धडक बसली. यामुळे दोन इसम जागीच ठार झाले तर एकाला गंभीर दुखापत झाल्याने नागपूरला हलविण्यात आले आहे. मृतकांमध्ये शंकर धनुराम पाचे (२१) मु. सतोना, सोनू उर्फ नरेश पाचे (२१) मु.बालाघाट यांचा समावेश आहे. ताराचंद धर्मू पाचे (२५) मु.सतोना जि. गोंदिया हा इसम गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त मोटारसायकल होंडा कंपनीची असून नव्याने खरेदी करण्यात आली होती. तिघे मित्र साखरीटोला तेथे फिरायला आले होते. तेथून हरदोलीकडे परत जाताना तेलीटोला वळणावर मोटरसायकल चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वळणावर असलेल्या झाडाला जोरदार धडक बसली. त्यामुळे गंभीर दुखापत होवून बराच वेळपर्यंत तिघेही घटनास्थळीच पडून होते. त्यात दोघांचा बळी गेला. सालेकसा पोलिसांना याची माहिती मिळताच रात्रीच्या १२ वाजता पंचनामा करून मृतदेह शवविच्छेनाकरिता पाठविण्यात आले. या घटनेने सदर वळण हे नवीन वाहनधारकांसाठी मृत्युचे कारण बनत असल्याची प्रचिती आली. पुन्हा सदर वळणावर अपघात घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. (वार्ताहर)नियोजित पत्नीला भेटायला मित्रासह गेला होताया अपघातातील गंभीर जखमी ताराचंद धर्मू पाचे याचे काही दिवसांपूर्वीच हरदोली येथील बालाराम पाचे यांच्या मुलीशी लग्न जुळले आहे. त्यामुळे ताराचंद व त्याचे दोन सोबती सासूरवाडीला महाशिवरात्रीनिमित्त आले होते. बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान तिघेही साखरीटोल्याला फिरायच्या निमित्ताने आले होते. पण तेथून परत जाताना त्यांच्यातील दोघांवर काळाने झडप घातली. एका दुचाकीवर तिघेजण बसणे त्यांना महागात पडले.बांधकाम विभाग अजूनही निद्रावस्थेतअनेकदा या वळणावर बरेच अपघात होऊन कित्येक जणांचा हकनाक बळी जात असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र याबाबत काही घेणे-देणे नसल्याचे जाणवते. इतके अपघात होऊनही या ठिकाणी ‘अपघातप्रवण स्थळ’ अशी सूचना देणारा फलकही लावण्यात आलेला नाही. अतिवळण असल्याने येथे अपघात होतात. जर सदर वळणाचे सरळीकरण झाले तर अपघात टाळता येतील. याबाबतीत ‘लोकमत’ने अनेक वेळा बातमीच्या माध्यमातून जागृती केली आहे. मात्र अधिकारी निद्रावस्थेत आहेत. त्यामुळे सदर वळणाचे सरळीकरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सालेकसाचे अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, ओबीसी आघाडीचे पप्पू राणे, पृथ्वीराज शिवणकर, मुलचंद कटरे, धनजित बैस यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.