शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

२० वर्षापूर्वीचे निवारे कुचकामी

By admin | Updated: July 19, 2014 23:59 IST

सालेकसा तालुक्याच्या निर्मितीला ३३ वर्षे लोटली आहेत. परंतू इतक्या वर्षात या तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, पाऊस अंगावर घेत भर रस्त्यावरच बसगाड्यांची

विजय मानकर - सालेकसासालेकसा तालुक्याच्या निर्मितीला ३३ वर्षे लोटली आहेत. परंतू इतक्या वर्षात या तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, पाऊस अंगावर घेत भर रस्त्यावरच बसगाड्यांची वाट पाहात उभे राहावे लागते. या परिसरातील इतर गावात बनलेल्या प्रवासी निवाऱ्यांची एवढी दुर्दशा झाली आहे की तिथे प्रवाशांना बसणेही शक्य नाही. २० वर्षापूर्वी बांधलेले अनेक ठिकाणी निवारे आता कुचकामी ठरत आहे. तालुका मुख्यालय असल्यामुळे जिल्हा व इतर तालुका कार्यालयांशी कार्यालयीन व इतर कामानिमित्त संपर्क व ये-जा करण्याचा व्याप वाढला. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली व बस आणि इतर प्रवासी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. आज परिस्थिती अशी आहे की, प्रवाशांच्या व वाहनांच्या रांगा लागल्या असतात परंतु प्रवाशांना थांबण्यासाठी किंवा बसेसना सोयीस्कर जागेवर ठेवण्यासाठी बस स्थानक बनले नाही. तालुक्याचे ठिकाण असूनही बस स्थानक नसलेल्या मोजक्याच तालुक्यांमध्ये सालेकसाचा समावेश होतो. जवळपास २० वर्षांपूर्वी तालुक्यात सालेकसा आणि गोवारीटोला या दोन ठिकाणी प्रवासी निवारे बनविण्यात आले होते. परंतु ते एकदा बनविल्यानंतर त्यांची दुरुस्ती व देखभाल कधीच करण्यात आली नाही. परिणामी गोवारीटोला येथील प्रवासी निवारा एवढा जीर्ण झाला की, त्याची तूटफूट होऊन घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे तो प्रवाशांच्या कामाचा राहीला नाही. सालेकसा येथील प्रवासी निवारा असा आहे की, तेथे प्रवासी न बसता तो सडकछाप मजनुंचा अड्डा बनलेला आहे. तालुका ठिकाण असल्याने प्रवाशांची संख्या शेकडोच्या संख्येत असते. मात्र छोटासा प्रवासी निवारा असताना तो ही सोयीस्कर नाही. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांची तर मोठी फजिती होते. प्रसंग आल्यावर रस्त्यावरील दुकानात आसरा घ्यावा लागतो. परंतु दुकानवालेसुद्धा प्रवाशांना आसरा देत नाही. जास्त वेळ थांबू देत नाही. नाईलाजाने प्रवाशांना रस्त्यावर वेळ काढून बस किंवा खासगी वाहनांची वाट बघावी लागते. कालांतराने सालेकसा-आमगाव आणि सालेकसा-चांदसूरज मार्गावर, साकरीटोला मार्गावर तसेच साकरीटोला मार्गावर काही ठिकाणी प्रवाशी निवारे बनविण्यात आले. परंतू ते आता कुचकामी ठरले आहेत.पानगाव येथील प्रवासी निवारा मुख्य चौकापासून दूर असून तेथे प्रवासी थांबत नाही. याचा गैरकायदा घेत शेजारच्या शेतकऱ्याने प्रवासी निवाऱ्यात शेतीउपयोगी सामान ठेवले आहे. त्यात नेहमी म्हशी, रेडेही बांधून ठेवतो. त्यामुळे निवारा प्रवाशांचा की जनावरांचा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.