शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बावीस नव्हे,वीस-दोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 21:44 IST

मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्या वाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश लोकांना ही पध्दती चुकीची वाटत आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

ठळक मुद्देसंख्या वाचनाची नवी पद्धत : समजलेले अंक अक्षरात लिहिताना गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्या वाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश लोकांना ही पध्दती चुकीची वाटत आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. भाषा सौंदर्यावर जसा हा परिणाम करणारा बदल आहे, तसा व्यावहारिकदृष्ट्याही प्रतिकुल ठरेल अशी खंतही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा नवा बदल घोकमपट्टीऐवजी समज वाढविणारा असल्याने स्वागतही झाले आहे.पारंपरिक संख्या वाचनाच्या पद्धतीतून अनेक पिढ्या शिकल्या आहेत. मग त्यांना जोडाक्षरे अन् गणिताची भीती नव्हती का? असा सवाल शिक्षकांचा आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे या पद्धतीमुळे नामशेष होतील. परिणामी, ही पद्धत भाषा सौंदर्यात कशी बसणार, अशी खंत व्यक्त केली जात आहे. नवी पद्धत दाक्षिणात्य असून इंग्रजीच्या धर्तीवर आहे. सुरुवातीला ही पद्धत गोंधळाची वाटत असली तरी गणिती कल्पकतेला वाव देणारी आणि भाषा सौंदर्यावर शून्य परिणाम करणारी ठरेल,असा विश्वासही गणित तज्ज्ञांचा आहे. यावर तिव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.अंक वाचणाच्या नवीन पध्दतीची गरज का?पारंपारीक पध्दतीनुसार अनेक पिढ्यांनी अंकवाचन शिकले. मग नवी पध्दती आणण्याची गरज का आहे. ही पध्दती आधीपासूनच अमंलात का आणली गेली नाही. ही पध्दती लागू करण्याच्या पूर्वी शिक्षकांचे प्रशिक्षण नाही. थेट अभ्यासक्रमात करण्यात आलेला बदल गोंधळ निर्माण करणारा आहे.-प्रकाश ब्राम्हणकर, विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती.मूळ संख्येत कायमस्वरूपी बदल न करता विद्यार्थ्यांना संख्या समजण्यासाठी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ही पध्दत योग्य आहे. त्यामुळे या पध्दतीचा इतका संभ्रम करण्याची गरज नाही. इंग्रजीच्या तालवार चालण्यासाठी ही पध्दत आहे. त्यामुळे क्रमाने वाचन होण्यास मदत होईल. फक्त समजाण्यासाठी याचा वापर व्हावा.-एल.यू. खोब्रागडे, मुख्याध्यापक, कारंजा.काळानुसार अभ्यासक्रम बदल होणे गरजेचे आहे. वीस-दोन अशी संकल्पना विद्यार्थ्यांना शिकविणे आणि त्यांना कळणे सोपे जाणार आहे. मूळ संख्यानामात कायमस्वरुपी बदल न करता विद्यार्थ्यांना संख्या कळण्यासाठी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ही पद्धत योग्य आहे. या बदलात गणिती कल्पकतेला खूप चालना मिळेल.-अनिरूध्द मेश्राम, जिल्हा सरचीटणीस शिक्षक संघ.काळानुरूप गणित विषयात बदल होत असला तरी पारंपारीक असलेल्या संकल्पना आपण दूर सारू शकत नाही. अशा बदलामुळे विद्यार्थ्यांना समजायला संकल्पना सोप्या असल्या तरी अंकाचा जो पारंपारीक ढाचा आहे तो ढासळल्याशिवाय राहणार नाही. अशा बदलांचे वाईट असे दूरगामी परिणाम सर्वांना भोगावे लागतील.- किशोर डोंगरवार, सहसचिव, शिक्षक समिती.शिकविणाऱ्यांना वळण जुने असते. त्यामुळे नवीन संकल्पना स्वीकारताना चुकल्यासारखे वाटते. परंतु, सवय झाल्यानंतर अंगवळणी पडते. संख्यावाचनाची नवी पद्धत अंगवळणी पडेल. त्यामुळे या पद्धतीचा इतका संभ्रम करण्याची गरज नाही. नवे धोरण-नव्या संकल्पना विचारपूर्वकच अंमलात आणल्या जातात. ते स्वीकारणे अपरिहार्य असते. भाषा सौंदर्य मात्र या नव्या पद्धतीतून लोप पावणार आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे कालबाह्य होतील, अशी भीती आहे.-प्रभा गायधने, शिक्षीका, जि.प. बोरकन्हारनव्या पद्धतीमुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. पारंपरिक संख्या वाचनाची पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे. यातून भाषा सौंदर्य जोडाक्षरांचेही ज्ञान विद्यार्थ्यांना होते. ७६ रुपये किलोने एखादी वस्तू घ्यायची असेल तर ७०-६ म्हणायचे का? व्यावहारिकदृष्ट्या नवी पद्धत योग्य वाटत नाही. १ ते १०० पर्यंत आकडे लिहिण्याची व वाचण्याची जी पद्धत गॅझेटमध्ये आहे, तीच पद्धत अभ्यासक्रमात हवी. - विरेंद्रकुमार कटरे, सहशिक्षक बलमाटोला.विद्यार्थ्यांना काही अंक लिहिता येत नाहीत म्हणून बालभारतीने संख्यावाचनात बदल करून संख्येच्या नावाची ओळख नाहिशी करण्याचा हा प्रकार आहे. दुसरीच्या संख्यावाचनातील बदल चुकीचा आहे. त्यामुळे शिकविण्यासाठी अडचणीचे ठरेल. बावन ऐवजी पन्नास-दोन, त्रेचाळीसऐवजी चाळीस-तीन असे वाचने म्हणजे बावन, त्रेचाळी ही संख्येच्या नावाची मुळ ओळख नाहिशी करणे होईल. - शरद उपलपवार, मुख्याध्यापक जि.प. शाळा पदमपूर.

जुनीच पद्धती अत्यंत चांगली आहे. ही पद्धती मुलांना गोंधळात टाकणारी आहे. बोलायला सोपे म्हणून वेगळे सांगाल पण व्यवहारात ते येणार नाही तर त्यात पुन्हा संभ्रम निर्माण होईल. त्या संख्येला अक्षरात कसे लिहावे हा प्रश्न विद्यार्थ्यांना होईल. -सुनील श्रीवास्तव,राज्याध्यक्ष महाराष्ट्र गणीत अध्यापक मंडळ.

टॅग्स :Educationशिक्षण