शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बावीस नव्हे,वीस-दोन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 21:44 IST

मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्या वाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश लोकांना ही पध्दती चुकीची वाटत आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

ठळक मुद्देसंख्या वाचनाची नवी पद्धत : समजलेले अंक अक्षरात लिहिताना गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुलांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी, यासाठी इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात अचानक संख्या वाचनात केलेल्या बदलामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बहुतांश लोकांना ही पध्दती चुकीची वाटत आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. भाषा सौंदर्यावर जसा हा परिणाम करणारा बदल आहे, तसा व्यावहारिकदृष्ट्याही प्रतिकुल ठरेल अशी खंतही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा नवा बदल घोकमपट्टीऐवजी समज वाढविणारा असल्याने स्वागतही झाले आहे.पारंपरिक संख्या वाचनाच्या पद्धतीतून अनेक पिढ्या शिकल्या आहेत. मग त्यांना जोडाक्षरे अन् गणिताची भीती नव्हती का? असा सवाल शिक्षकांचा आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे या पद्धतीमुळे नामशेष होतील. परिणामी, ही पद्धत भाषा सौंदर्यात कशी बसणार, अशी खंत व्यक्त केली जात आहे. नवी पद्धत दाक्षिणात्य असून इंग्रजीच्या धर्तीवर आहे. सुरुवातीला ही पद्धत गोंधळाची वाटत असली तरी गणिती कल्पकतेला वाव देणारी आणि भाषा सौंदर्यावर शून्य परिणाम करणारी ठरेल,असा विश्वासही गणित तज्ज्ञांचा आहे. यावर तिव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.अंक वाचणाच्या नवीन पध्दतीची गरज का?पारंपारीक पध्दतीनुसार अनेक पिढ्यांनी अंकवाचन शिकले. मग नवी पध्दती आणण्याची गरज का आहे. ही पध्दती आधीपासूनच अमंलात का आणली गेली नाही. ही पध्दती लागू करण्याच्या पूर्वी शिक्षकांचे प्रशिक्षण नाही. थेट अभ्यासक्रमात करण्यात आलेला बदल गोंधळ निर्माण करणारा आहे.-प्रकाश ब्राम्हणकर, विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती.मूळ संख्येत कायमस्वरूपी बदल न करता विद्यार्थ्यांना संख्या समजण्यासाठी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ही पध्दत योग्य आहे. त्यामुळे या पध्दतीचा इतका संभ्रम करण्याची गरज नाही. इंग्रजीच्या तालवार चालण्यासाठी ही पध्दत आहे. त्यामुळे क्रमाने वाचन होण्यास मदत होईल. फक्त समजाण्यासाठी याचा वापर व्हावा.-एल.यू. खोब्रागडे, मुख्याध्यापक, कारंजा.काळानुसार अभ्यासक्रम बदल होणे गरजेचे आहे. वीस-दोन अशी संकल्पना विद्यार्थ्यांना शिकविणे आणि त्यांना कळणे सोपे जाणार आहे. मूळ संख्यानामात कायमस्वरुपी बदल न करता विद्यार्थ्यांना संख्या कळण्यासाठी संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ही पद्धत योग्य आहे. या बदलात गणिती कल्पकतेला खूप चालना मिळेल.-अनिरूध्द मेश्राम, जिल्हा सरचीटणीस शिक्षक संघ.काळानुरूप गणित विषयात बदल होत असला तरी पारंपारीक असलेल्या संकल्पना आपण दूर सारू शकत नाही. अशा बदलामुळे विद्यार्थ्यांना समजायला संकल्पना सोप्या असल्या तरी अंकाचा जो पारंपारीक ढाचा आहे तो ढासळल्याशिवाय राहणार नाही. अशा बदलांचे वाईट असे दूरगामी परिणाम सर्वांना भोगावे लागतील.- किशोर डोंगरवार, सहसचिव, शिक्षक समिती.शिकविणाऱ्यांना वळण जुने असते. त्यामुळे नवीन संकल्पना स्वीकारताना चुकल्यासारखे वाटते. परंतु, सवय झाल्यानंतर अंगवळणी पडते. संख्यावाचनाची नवी पद्धत अंगवळणी पडेल. त्यामुळे या पद्धतीचा इतका संभ्रम करण्याची गरज नाही. नवे धोरण-नव्या संकल्पना विचारपूर्वकच अंमलात आणल्या जातात. ते स्वीकारणे अपरिहार्य असते. भाषा सौंदर्य मात्र या नव्या पद्धतीतून लोप पावणार आहे. गणिताची बडबड गीते आणि गाणे कालबाह्य होतील, अशी भीती आहे.-प्रभा गायधने, शिक्षीका, जि.प. बोरकन्हारनव्या पद्धतीमुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. पारंपरिक संख्या वाचनाची पद्धत अतिशय उत्कृष्ट आहे. यातून भाषा सौंदर्य जोडाक्षरांचेही ज्ञान विद्यार्थ्यांना होते. ७६ रुपये किलोने एखादी वस्तू घ्यायची असेल तर ७०-६ म्हणायचे का? व्यावहारिकदृष्ट्या नवी पद्धत योग्य वाटत नाही. १ ते १०० पर्यंत आकडे लिहिण्याची व वाचण्याची जी पद्धत गॅझेटमध्ये आहे, तीच पद्धत अभ्यासक्रमात हवी. - विरेंद्रकुमार कटरे, सहशिक्षक बलमाटोला.विद्यार्थ्यांना काही अंक लिहिता येत नाहीत म्हणून बालभारतीने संख्यावाचनात बदल करून संख्येच्या नावाची ओळख नाहिशी करण्याचा हा प्रकार आहे. दुसरीच्या संख्यावाचनातील बदल चुकीचा आहे. त्यामुळे शिकविण्यासाठी अडचणीचे ठरेल. बावन ऐवजी पन्नास-दोन, त्रेचाळीसऐवजी चाळीस-तीन असे वाचने म्हणजे बावन, त्रेचाळी ही संख्येच्या नावाची मुळ ओळख नाहिशी करणे होईल. - शरद उपलपवार, मुख्याध्यापक जि.प. शाळा पदमपूर.

जुनीच पद्धती अत्यंत चांगली आहे. ही पद्धती मुलांना गोंधळात टाकणारी आहे. बोलायला सोपे म्हणून वेगळे सांगाल पण व्यवहारात ते येणार नाही तर त्यात पुन्हा संभ्रम निर्माण होईल. त्या संख्येला अक्षरात कसे लिहावे हा प्रश्न विद्यार्थ्यांना होईल. -सुनील श्रीवास्तव,राज्याध्यक्ष महाराष्ट्र गणीत अध्यापक मंडळ.

टॅग्स :Educationशिक्षण