शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मंत्रोपचाराने रंगला ‘तुळशी-शालिग्राम’ लग्नसोहळा

By admin | Updated: December 2, 2015 01:56 IST

तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल

दोन हजार पाहुणे : अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांचा अभिनव उपक्रमसालेकसा : तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा ‘तुळशी विवाह’ करून आपली अनोखी परंपरा कायम ठेवली. युवकांच्या हा अभिनव उपक्रम पंचक्रोशीत कौतुकाचा विषय झाला आहे.हा म्हणायला तुळशी विवाह असला तरी खऱ्याखुऱ्या विवाह सोहळ्यापेक्षा त्यात काहीही कमी नव्हते. पाहुणे मंडळींना रितसर निमंत्रण, दोन हजार वऱ्हाड्यांची उपस्थिती, स्वागत कमान, वैदिक मंत्रोपचार आणि मंगलाष्टके अशा थाटात तुळसी आणि शालिग्रामचा हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात शुक्रवारी पार पडला. हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाह केल्यानंतरच प्रत्यक्ष वर-वधूचे लग्न कार्य पार पाडण्याला सुरुवात केली जाते. ही परंपरा आपल्या देशात हजारो वर्षापासून सुरू असून आजही लोक तुळशी विवाह घेण्याची वाट बघत असतात. प्रत्येक घरी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावण्यात येते. परंतु ते लग्नकार्य घरची व शेजऱ्यांकडील मंडळींपर्यंत मर्यादित असते.अर्धनारेश्वरालय (हलबीटोला) येथील १५ नवयुवकांनी मात्र तुळशी विवाह करण्याची अभिनव परंपरा सुरू केली आहे. यंदा त्यांनी संपूर्ण गावाला निमंत्रण देत आपआपल्या इष्ट मित्रांना तसेच अधिकारी, पदाधिकारी वर्ग आणि भाविकांना व विविध संघटनांना सुद्धा आमंत्रित केले. आमंत्रणाला मान देत विविध ठिकाणावरुन जवळपास दोन हजार पाहुणे मंडळी आली. या सर्वांचे त्या नवयुवकांनी आपली संस्कृती व लग्न समारंभाचा वारसा जपत स्वागत केले. भेटीगाठी घेतल्या. प्रवेशद्वारावर सर्वांचे स्वागत करण्यात आले. एकमेकांची ओळख करून घेतली. या सोहळ्यासाठी लग्नमंडप सजविण्यात आला होता. त्यात तुळशी आणि शालीग्रामच्या नावाचे धर्माकोल लावण्यात आले. वर-वधूची जागा निर्धारित करण्यात आली. लग्न विधी व मंत्रोपचार विधी पार पाडण्यासाठी लांजी (म.प्र.) येथील ककोडी येथून पंडित विश्वनाथ तिवारी आले होते. त्यांनी हिंदू वैदिक पद्धतीनुसार विधीवत लग्न सोहळा पार पाडला. सर्व मंत्रोपचार, पूजन व मंगलाष्टके इत्यादीनंतर तुळशी व शालीग्राम यांना लग्नमाळ घालण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुरेश शेंडे, उपाध्यक्ष गोविंद वरखडे, सचिव बाजीराव तरोणे, कोषाध्यक्ष दुर्गाप्रसाद शाहू, सदस्य पवन पटले, चेतन बिसेन, विद्यार्थी पात्र श्रीनुवई, रमेश फरकुंडे, संतोष कापसे, मुनेश्वर कापसे, टोनेंद्र बिसेन, भरत शाहू, नवीन भेंडारकर, लोकेश कोरे, सजित सांगोळे व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)गोरगरिबांचे लग्न लावून देणारया सोहळ्यासाठी वधू आणि वर पक्ष तयार करण्यात आले होते. त्यातून वर-वधूच्या मामाची भूमिका पार पाडत दोघांनी अंत:पट पकडून ठेवला होता. मंगलाष्टके नंतर लग्न गीते, बँड वाजा, नृत्य इत्यादींची मन मोहून टाकणारी प्रस्तुती सादर केली. सर्व दोन हजार पाहुण्यांसाठी नवयुवकांनी पंगत लावून जेवणासाठी सोय करुन दिली. याप्रसंगी त्या नवयुवकांनी आपल्या इच्छा, भावना व्यक्त करीत परिसरात एखाद्या कुटुंबात गरिबीमुळे समस्या निर्माण होत असेल अशा कुटुंबाचे लग्न ते नवयुवक या ठिकाणी आपल्या मदतीने पार पाडून देतील, असे सांगण्यात आले.