शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रोपचाराने रंगला ‘तुळशी-शालिग्राम’ लग्नसोहळा

By admin | Updated: December 2, 2015 01:56 IST

तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल

दोन हजार पाहुणे : अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांचा अभिनव उपक्रमसालेकसा : तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल असा ‘तुळशी विवाह’ करून आपली अनोखी परंपरा कायम ठेवली. युवकांच्या हा अभिनव उपक्रम पंचक्रोशीत कौतुकाचा विषय झाला आहे.हा म्हणायला तुळशी विवाह असला तरी खऱ्याखुऱ्या विवाह सोहळ्यापेक्षा त्यात काहीही कमी नव्हते. पाहुणे मंडळींना रितसर निमंत्रण, दोन हजार वऱ्हाड्यांची उपस्थिती, स्वागत कमान, वैदिक मंत्रोपचार आणि मंगलाष्टके अशा थाटात तुळसी आणि शालिग्रामचा हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात शुक्रवारी पार पडला. हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाह केल्यानंतरच प्रत्यक्ष वर-वधूचे लग्न कार्य पार पाडण्याला सुरुवात केली जाते. ही परंपरा आपल्या देशात हजारो वर्षापासून सुरू असून आजही लोक तुळशी विवाह घेण्याची वाट बघत असतात. प्रत्येक घरी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावण्यात येते. परंतु ते लग्नकार्य घरची व शेजऱ्यांकडील मंडळींपर्यंत मर्यादित असते.अर्धनारेश्वरालय (हलबीटोला) येथील १५ नवयुवकांनी मात्र तुळशी विवाह करण्याची अभिनव परंपरा सुरू केली आहे. यंदा त्यांनी संपूर्ण गावाला निमंत्रण देत आपआपल्या इष्ट मित्रांना तसेच अधिकारी, पदाधिकारी वर्ग आणि भाविकांना व विविध संघटनांना सुद्धा आमंत्रित केले. आमंत्रणाला मान देत विविध ठिकाणावरुन जवळपास दोन हजार पाहुणे मंडळी आली. या सर्वांचे त्या नवयुवकांनी आपली संस्कृती व लग्न समारंभाचा वारसा जपत स्वागत केले. भेटीगाठी घेतल्या. प्रवेशद्वारावर सर्वांचे स्वागत करण्यात आले. एकमेकांची ओळख करून घेतली. या सोहळ्यासाठी लग्नमंडप सजविण्यात आला होता. त्यात तुळशी आणि शालीग्रामच्या नावाचे धर्माकोल लावण्यात आले. वर-वधूची जागा निर्धारित करण्यात आली. लग्न विधी व मंत्रोपचार विधी पार पाडण्यासाठी लांजी (म.प्र.) येथील ककोडी येथून पंडित विश्वनाथ तिवारी आले होते. त्यांनी हिंदू वैदिक पद्धतीनुसार विधीवत लग्न सोहळा पार पाडला. सर्व मंत्रोपचार, पूजन व मंगलाष्टके इत्यादीनंतर तुळशी व शालीग्राम यांना लग्नमाळ घालण्यात आली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुरेश शेंडे, उपाध्यक्ष गोविंद वरखडे, सचिव बाजीराव तरोणे, कोषाध्यक्ष दुर्गाप्रसाद शाहू, सदस्य पवन पटले, चेतन बिसेन, विद्यार्थी पात्र श्रीनुवई, रमेश फरकुंडे, संतोष कापसे, मुनेश्वर कापसे, टोनेंद्र बिसेन, भरत शाहू, नवीन भेंडारकर, लोकेश कोरे, सजित सांगोळे व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)गोरगरिबांचे लग्न लावून देणारया सोहळ्यासाठी वधू आणि वर पक्ष तयार करण्यात आले होते. त्यातून वर-वधूच्या मामाची भूमिका पार पाडत दोघांनी अंत:पट पकडून ठेवला होता. मंगलाष्टके नंतर लग्न गीते, बँड वाजा, नृत्य इत्यादींची मन मोहून टाकणारी प्रस्तुती सादर केली. सर्व दोन हजार पाहुण्यांसाठी नवयुवकांनी पंगत लावून जेवणासाठी सोय करुन दिली. याप्रसंगी त्या नवयुवकांनी आपल्या इच्छा, भावना व्यक्त करीत परिसरात एखाद्या कुटुंबात गरिबीमुळे समस्या निर्माण होत असेल अशा कुटुंबाचे लग्न ते नवयुवक या ठिकाणी आपल्या मदतीने पार पाडून देतील, असे सांगण्यात आले.