शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लागतोय कस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला घेऊन सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका लांबल्याने अनेक उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. बुधवारी (दि.१५) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी गुरुवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू केली. प्रचारासाठी आता केवळ तीनच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचताना नेत्यांसह उमेदवारांचासुद्धा कस लागत आहे. ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती; मात्र याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाने या निवडणुका ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर बुधवारी (दि.१५) सर्वोच्य न्यायालयाने सुनावणी करीत ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ओबीसी जागा वगळूनच आता निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे; पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे क्षेत्र मोठे असल्याने केवळ तीन दिवसांच्या कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांसह नेत्यांचासुद्धा कस लागत आहे. 

दोन दिवस दिग्गजांच्या सभा जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी यावेळी कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. खा. प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे शुक्रवारी उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेसुद्धा प्रचारासाठी जिल्ह्यात येणार आहेत.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद