शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लागतोय कस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला घेऊन सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका लांबल्याने अनेक उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. बुधवारी (दि.१५) सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी गुरुवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू केली. प्रचारासाठी आता केवळ तीनच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचताना नेत्यांसह उमेदवारांचासुद्धा कस लागत आहे. ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषद ४३, पंचायत समिती ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने १९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती; मात्र याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे निवडणूक आयोगाने या निवडणुका ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर बुधवारी (दि.१५) सर्वोच्य न्यायालयाने सुनावणी करीत ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ओबीसी जागा वगळूनच आता निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे; पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे क्षेत्र मोठे असल्याने केवळ तीन दिवसांच्या कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांसह नेत्यांचासुद्धा कस लागत आहे. 

दोन दिवस दिग्गजांच्या सभा जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी यावेळी कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. खा. प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे शुक्रवारी उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेसुद्धा प्रचारासाठी जिल्ह्यात येणार आहेत.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद