शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुुरेपुर प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:01 IST

पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य करायचे आहे. अंत्योदयाच्या तत्वावर चालून अंतिम घटकापर्यंत विकासाला घेऊन जायचे आहे. ज्या विश्वासाने जनतेने निवडून दिले आहे, त्या विश्वासावर खरे उतरून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.

ठळक मुद्देसुनील मेंढे : भाजपतर्फे सत्कार व आभार मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास’ या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य करायचे आहे. अंत्योदयाच्या तत्वावर चालून अंतिम घटकापर्यंत विकासाला घेऊन जायचे आहे. ज्या विश्वासाने जनतेने निवडून दिले आहे, त्या विश्वासावर खरे उतरून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी केले.भारतीय जनता पक्ष गोंदिया ग्रामीण व शहर मंडळाच्या संयुक्तवतीने गुरूवारी (दि.१३) आयोजित आभार मेळाव्यात बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य विनोद अग्रवाल, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, जि.प. सभापती शैलजा सोनवाने, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, दिपक कदम, संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, धनंजय तुरकर, पन्नालाल मचाडे, परसराम हुमे, दिलीप गोपलानी, विनोद किराड प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी खासदार मेंढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना खा. मेंढे यांनी, कुठलीही समस्या असो संपर्क करावा. भंडारा येथे जनसंपर्क कार्यालय असून लवकरच गोंदिया येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र मोठा असून प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेऊन हा विजय मिळविला आहे. तशीच मेहनत भविष्यातील विधानसभा निवडणुकीसाठी घ्यावी. सध्या जिल्हा परिषद आसोलीची निवडणूक सुरू असून कार्यकर्त्यांनी विजय संपादन करण्यासाठी पूर्ण ताकतीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.जिल्हाध्यक्ष पटले यांनी, मिळालेल्या यशावर हुरडुन न जाता आपले बुथ मजबुत करण्यासाठी सातत्याने कार्य करावे असे मत मांडले. याप्रसंगी विनोद अग्रवाल यांंनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रामीण मंडळ अध्यक्ष तुरकर यांनी मांडले. संचालन दिपक कदम यांनी. आभार मुकेश चन्ने यांनी मानले. कार्यक्रमाला नगर परिषद, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य, सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा